AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शपथविधीला ‘मविआ’च्या नेत्यांची दांडी, आठवलेंनी एका वाक्यात विषय संपवला, म्हणाले त्यांच्या मनात..

गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीला विरोधकांनी दांडी मारली, यावर प्रतिक्रिया देताना रामादास आठवले यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

शपथविधीला 'मविआ'च्या नेत्यांची दांडी, आठवलेंनी एका वाक्यात विषय संपवला, म्हणाले त्यांच्या मनात..
रामदास आठवलेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 06, 2024 | 5:52 PM

राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. तब्बल 231 जागा महायुतीने जिंकल्या. भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला. 132 विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार विजयी झाले. त्यानंतर गुरुवारी नव्या मंत्रिमंडाळाचा शपथविधी पार पडला. यावेळी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार देखील होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले आठवले? 

राज्यात महायुतीला मोठं यश मिळालं. संविधान बदलणार असा आरोप सातत्यानं विरोधकांकडून करण्यात येत होता. पण त्यांना त्यात यश आलं नाही. महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन झालं. आता विकास हाच आमचा ध्यास आहे. सर्व जाती- धर्माच्या लोकांना समान न्याय दिला जाईल असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान गुरुवारी झालेल्या शपथविधी सोहळ्याला विरोधी पक्षातील एकही नेता उपस्थित नव्हता. भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. शरद पवार यांना तर देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: फोन केला होता. मात्र तरी देखील महाविकास आघाडीतील नेते या कार्यक्रमासाठी उपस्थित नव्हते यावर देखील आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मनात आमच्याविषयी राग  आहे. पण आम्हाला विकास करायचा आहे. आमचं विकासाचं ध्येय आहे. महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहायला पाहिजे होते, मात्र ते राहिले नाहीत. यातून हेच दिसून येत की त्यांचा संविधानाला विरोध आहे, असं आठवले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान त्यांनी यावेळी बोलताना राहुल गांधी यांच्या सोलापूर लाँग मार्चवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आंदोलन करण्याचा अधिकार त्यांना आहे. लोकशाहीनं तो अधिकार त्यांना दिला आहे. ईव्हीएम मशीन त्यांनीच आणलं. जेव्हा लोकसभेत त्यांना यश मिळालं तेव्हा ईव्हीएमविरोधात आंदोलन केलं नाही. असा टोला यावेळी आठवले यांनी राहुल गांधी यांना लगावला आहे.

भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न
भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न.
भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं
भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं.
पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला
पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला.
MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य
MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO.
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?.
दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल
दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल.
मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?
मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?.
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य.
त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैश टॉप कमांडरचाही सहभाग, बघा ड्रोन दृश्य
त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैश टॉप कमांडरचाही सहभाग, बघा ड्रोन दृश्य.