Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वीजबिल भरा, नाही तर लाईट कट करणार!! औरंगाबादेत महावितरणच्या नावानं नागरिकांना कोण पाठवतंय मेसेजेस?

महावितरणच्या नावानं हे संदेश कोण पाठवतंय, याचा शोध घेतला पाहिजे, अशी मागणी ग्राहकांमधून होतेय. बनावट एसएमएस पाठवणाऱ्यांना शोध महावितरणनेच घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, असे ग्राहकांचे म्हणणे आहे.

वीजबिल भरा, नाही तर लाईट कट करणार!! औरंगाबादेत महावितरणच्या नावानं नागरिकांना कोण पाठवतंय मेसेजेस?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 1:38 PM

औरंगाबादः बनावट मेसेजेसद्वारे (Fake Messages) सामान्य नागरिकांना लुटण्याचे प्रकार सर्रास सुरु असतात. यातच आता महावितरणचे नावही समोर आले आहे.औरंगाबादेत  महावितरणच्या (MSEDCL) नावाने असे मेसेजेच पाठवले जात आहेत. ‘आपल्या वीजबिलाच्या पेमेंटमध्ये अडचण असल्याने आज रात्री 9.30 वाजता आपला वीजपुरवठा खंडित (Electricity Cut Off) करण्यात येणार आहे. करिता ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा’ असे एसएमएस नागरिकांना येत आहेत. या संदेशांनी नागरिकांसोबत महावितरणचीही झोप उडाली आहे. मात्र अशा प्रकारच्या संदेशांना अजिबात प्रतिसाद देऊ नका, या संदेशांचा आमच्याशी काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण महावितरतर्फे देण्यात आले आहे.

औरंगाबादेत अनेकांना संदेश

औरंगाबाद शहरातील अनेक नागरिकांना असे मेसेज आलले आहेत आपल्या वीजबिलात काही अडचण आहे रात्री 9.50 किंवा रात्री 9.30 वाजेपर्यंत सोबत दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधा, असे एसएमएस धुमाकूळ घालत आहेत. अनेकांनी यासंदर्भात महावितरणशी संपर्क केला. तर कुणी सदर मोबाइल नंबरवर फोन केला. त्यावर आम्ही इलेक्ट्रिसिटी बोर्डाकडून बोलत असून तत्काळ बिल भरा, अन्यथा वीजपुरवठा खंडित करण्यात येईल, असा दम दिला जात आहे. यामुळे अनेकांची चिंता वाढली आहे.

महावितरणकडून कोणते मेसेज येतात?

महावितरणकडून केवळ देखभाव व दुरूस्ती, वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्याचा संभाव्य कालावधी तसेच दरमहा वीजबिलांची रक्कम, वीजबिलाची रक्कम, देय दिनांक, वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीस आदींची माहिती पाठवण्यात येते. वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून नागरिकांना सध्या पाठवण्यात येणारे संदेश बनावट आहेत, व त्यातून आर्थिक फसगत होऊ शकते, असे स्पष्टीकरण महावितरणने दिले आहे. तसेच नागरिकांना काही शंका अथवा तक्रार असल्यास वीज ग्राहकाकंनी 1912, 1800-102-3435 किंवा 1800-233-3435 या टोलफ्री क्रमांकावर किंवा नजीकच्या कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहनही महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

कोण पाठवतंय मेसेज?

महावितरणच्या नावानं हे संदेश कोण पाठवतंय, याचा शोध घेतला पाहिजे, अशी मागणी ग्राहकांमधून होतेय. बनावट एसएमएस पाठवणाऱ्यांना शोध महावितरणनेच घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, असे ग्राहकांचे म्हणणे आहे.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.