AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मृत्यूनंतरही हालअपेष्टा थांबेनात ! पुलाच्या दुर्दशेमुळे मृतदेह जेसीबीने आणण्याची वेळ

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील पुर्णा नदीवरील पुलाचे काम न झाल्यामुळे गावकऱ्यांना मृतदेह चक्क जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या मदतीने गावात आणावा लागला. या घटनेचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे.

मृत्यूनंतरही हालअपेष्टा थांबेनात ! पुलाच्या दुर्दशेमुळे मृतदेह जेसीबीने आणण्याची वेळ
AURANGABAD DEAD BODY
Follow us
| Updated on: Sep 09, 2021 | 6:07 PM

औरंगाबाद : माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहाची कसलीही हेळसांड न होऊ देता त्यावर विधीवत अंत्यसंस्कार केले जातात. पूजाअर्चा तसेच सगळे सोपस्कार पार पाडले जातात. मात्र, मृतेदह आणण्यासाठी रस्ताच नसला तर काय करावे ? मृतदेहावर अत्यंसंस्कार कसे करावे ? सध्या पुलाचे काम न झाल्यामुळे तसेच नदीला पूर आल्यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी येणाऱ्या अडचणी विषद करणारी एक घटना समोर आली. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील पुर्णा नदीवरील पुलाचे काम न झाल्यामुळे गावकऱ्यांना मृतदेह चक्क जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या मदतीने गावात आणावा लागला. या घटनेचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. (aurangabad sillod villagers brought dead body in jcb and tractor due to flood and broken pool)

मृतदेह आणण्यासाठी जेसीबी आणि ट्रकचा उपयोग

मिळालेल्या माहितीनुसार सिल्लोड जिल्ह्याातील आमठाण परिसरात एका माणासाचा मृत्यू झाला. मागील दोन दिवसांपासून औरंगाबादेत मुसळधार पाऊस बरसतोय. या पावसामुळे पुर्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. तर दुसरीकडे या नदीवरील पुलाचे कामही झालेले नाही. त्याचा फटका येथील लोकांना बसत आहे. या परिसरात एका मणासाचा मृत्यू झाल्यामुळे त्याला गावात अंत्यसंस्कारासाठी आणायचे होते. मात्र पुलाचे बांधकाम न झाल्यामुळे मृतदेहाची वाहतूक करण्यासाठी गावकऱ्यांना थेट ट्रॅक्टर आणि जेसीबीच्या मदत घ्यावी लागली. आधीच नदीवरील पुलाचे बांधकाम झालेले नाही. त्यातही नदीला पूर आल्यामुळे नागरिकांना मृतदेहावर अंत्यसंकस्कार करण्यासाठी हे पाऊल उचलावे लागले.

तरुणाचा मृतदेह थेट खाटेवरून नेण्याची वेळ

अशीच एक घटना सिल्लोड तालुक्यातील वाघदवाडी येथे घडली होती. या गावात रस्ताच नसल्यामुळे अपघातात मृत्यू झालेल्या एका तरुणाचा मृतदेह थेट खाटेवरून नेण्याची वेळ आली होती. या प्रसंगाचे काही फोटो नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

मृतदेह चक्क खाटेवर टाकून न्यावा लागला

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील वाघदवाडी गावात तुषार मेहेर या तरुणाचा 28 ऑगस्ट रोजी अपघातामुळे मृत्यू झाला होता. या गावामध्ये मागील कित्येक वर्षांपासून रस्ताच नाही. तसेच सध्या पावसाळा असल्यामुळे जी पायवाट आहे, तीसुद्धा अतिशय बिकट झाली असून या मार्गावर पाणी साचले होते. या दयनीय परिस्थितीमुळे येथील ग्रामस्थांवर मृत तरुण तुषार मेहेर याचा मृतदेह चक्क खाटेवर टाकून न्यावा लागला होता. सिल्लोड शहरातील वळण रस्त्यावर या तरुणाचा अपघातात मृत्यू झाला होता.

इतर बातम्या :

Dr. BAMU विद्यापीठाच्या पीआरओचा प्रताप, विद्यार्थिनीशी अश्लिल चॅटिंगचा आरोप, विनयभंगाचा गुन्हा दाखल

Festival Special: औरंगाबादचं आराध्य दैवत संस्थान गणपतीची उत्सवमूर्ती तयार, मूर्तीकार बगले कुटुंबियांचा मान

Aurangabad Crime: खिशात मोबाइल, काखेत ट्रान्समीटर, कानात मख्खी एअरफोन, औरंगाबादेत पोलिस चालक परीक्षेत हायटेक कॉपी केल्याचे उघड

(aurangabad sillod villagers brought dead body in jcb and tractor due to flood and broken pool)

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत.
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'.
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली.
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.