AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | औरंगाबादकरांनो, शहर स्वच्छ ठेवले तरच अमृत योजनेचा निधी, नव्या पाणी पुरवठा योजनेच्या कामात अडथळ्याची शक्यता!

महापापिलका आणि महाराष्ट्र जीवर प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे दररोज येणाऱ्या पाण्यात 11 एमएलडी ची वाढ झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

Aurangabad | औरंगाबादकरांनो, शहर स्वच्छ ठेवले तरच अमृत योजनेचा निधी, नव्या पाणी पुरवठा योजनेच्या कामात अडथळ्याची शक्यता!
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: May 27, 2022 | 10:11 AM
Share

औरंगाबादः पाणी प्रश्नाने (water issue) पेटलेल्या औरंगाबादकरांना आता नवी पाणीपुरवठा (Water Supply Scheme) योजना कधी पूर्ण होतेय, याचीच प्रतीक्षा आहे. जीर्ण झालेल्या जुन्या पाणीपुरवठा योजनेतूनच विविध उपाययोजना करीत महापालिका प्रशासक शहरवासियांच्या (Aurangabad city) समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, शहरातील 1680 कोटींची नवी पाणीपुरवठा योजनेचं काम अत्यंत संथ गतीनं सुरु आहे. ही योजना आणि सातारा देवळाईसाठीच्या ड्रेनेजलाइन योजनेसाठी केंद्र सरकारच्या अमृत 2 योजनेतून निधी मिळावा, यासाठी स्थानिक प्रसासन व लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत आहेत. मात्र केंद्र सरकारच्या नवीन निकषानुसार, शहराचे रँकिंग चांगले असेल तरच या योजनेचा निधी मिळू शकेल. त्यामुळे आता मनपा प्रशासन व नागरिक स्वच्छतेबाबत किती जागरूक राहतात, यावर निधीचे भवितव्य अवलंबून असेल.

पाणी योजनेच्या बजेटमध्ये 400 कोटींची वाढ

राज्य शासनाने शहरासाठी 1680 कोटींची पाणीपुरवटा योजना मंजूर केली आहे. या योजनेचं काम सुरु झालं आहे, मात्र अत्यंत संथ गती असल्यामुळे योजना रखडतेय, तसा खर्चही वाढतोय. लोखंड आणि इतर साहित्याचे भाव वाढल्याने योजनेच्या खर्चात नुकतीच 400 कोटींची वाढ झाली आहे. मात्र निधीअभावी योजना रखडू नये, राज्य शासन व महापालिकेवरील बोजा कमी व्हावा, यासाठी केंद्राच्या अमृत-२ योजनेत तिचा समावेश करण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

पाणी समस्या सोडवण्यासाठी आणखी काय हालचाली?

  • -शहरातील पाणी प्रश्नाची दाहकता कमी करण्यासाठी हिमायतबाग येथील ऐतिहासिक शक्कर बावडी व इतर दोन विहिरींतूनही पाणी उपसा करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे.
  •  हे पाणी रोजाबाग येथील सेल्टिंग टँकमध्ये घेऊन शहरातील काही वसाहतींना पुरवले जाणार आहे.
  • हर्सूल तलावातून 4 ते 5 एमएलडी पाणी वाढवण्यासाठी नवीन पाइपलाइन टाकण्याचं काम सुरु आहेय
  • जायकवाडीच्या पंपहाऊसमधील एक पंप बदलून तिथे नवीन पंप बसवण्यात आला. त्यामुळे तिथूनही पाच एमएलडी पाणी वाढले.
  • हिमायतबाग परिसरातील शक्कर बावडी आणि इतर दोन मोठ्या विहिरींना मुबलक पाणी आहे. तेथूनही पाणी घेण्याचं ठरलं आहे. यासाठी 40 लाखांचा खर्च अपेक्षित आहे.
  • पाणी टंचाई कमी करण्यासाठी प्रशासकांनी प्रत्येक प्रभागासाठी एक पालक अधिकारी नियुक्त केला आहे.
  • अधिकारी पथकामुळेच सिडको एन5 आणि एन 7 जलकुंभावरील पाणीपुरवठा सुरळीत झाल्याचा दावा प्रशासन करीत आहे.
  • महापापिलका आणि महाराष्ट्र जीवर प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे दररोज येणाऱ्या पाण्यात 11 एमएलडी ची वाढ झाल्याचं सांगण्यात आलं आहे.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.