Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादमध्ये भर रस्त्यात वडाचं झाड कोसळलं, कारचं मोठं नुकसान!

दुपारी साधारण 1.15 वाजेच्या सुमारास रस्त्याजवळील भला मोठा वटवृक्ष निखळला. रस्त्यावरील एका कारवर तो पडल्यामुळे कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र काही वेळानंतर लगेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या मार्गावरून जाणार असल्याने आपत्कालीन पथक त्या ठिकाणी तातडीने आले आणि या मार्गावरून वृक्ष काढून टाकण्यात आला.

औरंगाबादमध्ये भर रस्त्यात वडाचं झाड कोसळलं, कारचं मोठं नुकसान!
औरंगाबादमधील मुकुंदवाडी भागात कारवर वटवृक्ष कोसळला. देवेंद्र फडणवीस थोडक्यात बचावले.
Follow us
| Updated on: Sep 16, 2021 | 6:36 PM

औरंगाबाद: आज केंद्रिय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांच्या नेतृत्वात औरंगाबादेत राष्ट्रीय पातळीवरील बँक अधिकाऱ्यांची अत्यंत महत्त्वाची बैठक संपन्न होत आहे. याकरिता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हेदेखील उपस्थित आहेत. मात्र फडणवीसांचे शहरात आगमन झाले, त्या वेळेआधीच एक मोठी दुर्घटना त्यांच्या मार्गावर घडली. दैव बलवत्तर आणि माजी मुख्यमंत्री या दुर्घटनेतून बचावले असेच म्हणावे लागेल. त्यांच्या मार्गातील एक महाकाय वडाचा वृक्ष कोसळून पडला. मात्र फडणवीस येण्याआधीच हा वृक्ष मार्गावरून तत्काळ काढून घेण्यात आला.

80 वर्षांपेक्षा जास्त वयाचा वड कोसळला

औरंगाबाद विमानतळापासून ताज हॉटेलकडे येणाऱ्या मार्गात मुकुंदवाडी परिसरातील एक महाकाय वटवृक्ष कोलमडून पडला. जालना रोडवरील मुकुंदवाडी परिसरातील संजयनगर कमानीजवळ ही घटना घडली. दुपारी साधारण 1.15 वाजेच्या सुमारास रस्त्याजवळील भला मोठा वटवृक्ष निखळला. रस्त्यावरील एका कारवर तो पडल्यामुळे कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र काही वेळानंतर लगेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या मार्गावरून जाणार असल्याने आपत्कालीन पथक त्या ठिकाणी तातडीने आले आणि या मार्गावरून वृक्ष काढून टाकण्यात आला.

महत्त्वाच्या बैठकीसाठी फडणवीस औरंगाबादेत

औरंगाबादमध्ये आज शहरातील ताज हॉटेलमध्ये देशातील राष्ट्रीयकृत बँकांचे अध्यक्ष, वित्तमंत्रालयातील महत्त्वाचे अधिकारी यांची बैठक संपन्न होत आहे. केंद्रिय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या नेतृत्वात प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील ही बैठक औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आली आहे. याच बैठकीला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार होते. फडणवीसांचा ताफा ज्या मार्गावरून जाणार, त्याच मार्गावर ही दुर्घटना घडल्याने ते बालंबाल बचावले, असे म्हणावे लागेल. ज्या कारवर हा वृक्ष पडला, त्या कारचे मोठे नुकसान झालेले असले तरी या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

मार्गावर अनेक जीर्ण वृक्ष

या परिसरातील नागरिकांनी सांगितले की, या मार्गावर अनेक वर्षांपासूनची वडाची झाडं आहेत. ती आता प्रचंड जूनी झाली असून कधीही कोलमडून पडू शकतात. आजच्या घटनेत कुणी जखमी झाले नसले तरी भविष्यात अशी घटना घडू नये, यासाठी महापालिकेने काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

इतर बातम्या- 

74 व्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिन सोहळ्यासाठी औरंगाबाद सज्ज, पोलिसांचे संचलन, उद्या सकाळी 9 वाजता ध्वजारोहण

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.