Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वीजचोरांना महावितरणचा शॉक, सहा महिन्यात मराठवाड्यात 880 चोरांवर कारवाई, 5 कोटी दंड वसूल

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील संशयित वीजचोरांविरोधात ही कारवाई करण्यात आली.

वीजचोरांना महावितरणचा शॉक, सहा महिन्यात मराठवाड्यात 880 चोरांवर कारवाई, 5 कोटी दंड वसूल
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 02, 2021 | 2:12 PM

औरंगाबादः वीज महावितरण कंपनीने मागील सहा महिन्यांत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये वीज चोरांविरुद्ध मोठी मोहीम हाती घेतली आहे. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात वीजचोरीतील संशयितांची झडती घेण्यात आली. यात संशयित 1 हजार 829 वीज ग्राहकांच्या मीटरची तपासणी करून 880 वीज चोर पकडण्यात आले आहेत. या चोरांना 08 कोटी 48 लाख 15 हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आला असून 04 कोटी 90 लाख 49 हजार रुपये दंड वसूलदेखील करण्यात आला आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

सहा महिन्यांत 1,829 मीटरची तपासणी

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील संशयित वीजचोरांविरोधात ही कारवाई करण्यात आली. एप्रिल 2021 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत दक्षता व सुरक्षा अंमलबजावणी विभागामार्फत 1,829 वीज मीटरची तपासणी करण्यात आली. यावेळी आकडे टाकून वीज चोरी, मीटरमध्ये फेरफार करणे, सर्व्हिस वायर टॅप करणे आदी प्रकारांद्वारे 880 जणांनी वीज चोरी केल्याचे उघडकीस आले. या ग्राहकांना दंडाच्या अनुमानित रकमेच्या 08 कोटी 48 लाख रुपये बिलाची आकरणी करण्यात आली आहे. तसेच यापैकी 04 कोटी 90 लाख 49 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईत 19 वीज ग्राहकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. उर्वीत ग्राहकांनी दंड न भरल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदवले यांनी दिली.

वीजेच्या लपंडावामुळे उद्योजक त्रस्त

औरंगाबादमधील वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा, गंगापूर आणि लगतच्या अन्य भागांतील उद्योग क्षेत्रात सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे उद्योजक तर्स्त आहेत. यासंदर्भात उद्योग संघटना व उद्योजकांनी नुकतेच महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदवले, मुख्य अभियंता भुजंग खंदारे आणि अधीक्षक अभियंता-शहरी प्रकाश जमदाडे यांच्या उपस्थितीत झालेल्या संवाद बैठकीत नाराजी व्यक्त केली. या बैठकीत हेमंत कपाडिया व सीएमआयए एनर्जी सेल यांनी उद्योगांना वीजेशी संबंधित भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या.

इतर बातम्या- 

औरंगाबादमधील नवीन बीड बायपासचे काम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार, उद्घाटनाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येण्याची शक्यता

मुस्लिम आरक्षणासाठी 27 नोव्हेंबरला ‘चलो मुंबई’, खासदार इम्तियाज जलील यांचं आवाहन

VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक
VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक.
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं...
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं....
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं.
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका.
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन.
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल.
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल.
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?.
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक.
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?.