Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वीजबिल थकल्याने विजपुरवठा खंडित केला; बिडमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या

गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथील तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कृष्णा गायके असे या 23 वर्षीय शेतकऱ्याचे नाव आहे.

वीजबिल थकल्याने विजपुरवठा खंडित केला; बिडमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 29, 2021 | 11:50 AM

बीड : गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथील तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कृष्णा गायके असे या 23 वर्षीय शेतकऱ्याचे नाव आहे. त्याने आपल्याच शेतातील झाडाल गळफास घेऊन जीवन संपवले. कृष्णाने आत्महत्या का केली याचे नेमके कारण समोर आलेले नाही. मात्र वीजपुरवठा खंडीत करण्यात आल्याने, पाण्याभावी पीक सुकून गेले होते. याच कारणातून त्यांने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

पीक सुकल्याने आत्महत्या

बीड जिल्ह्यात महावितरणकडून वीजबिल वसुलीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे वीजेचे बिल थकले आहे, अशा शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात येत आहे. वीज नसल्याने शेतातील पिकांना पाणी देता येत नाही. पाण्याभावी पिके सुकून चालल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. वीजबिल भरण्यासाठी काही मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी महावितरणकडे केली आहे. दरम्यान ऐन पिकांना पाणी देण्याच्या हंगामामध्येच वीजेची थकबाकी असल्याने गायके यांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता. याच निराशेमधून कृष्णा गायके यांनी आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

अतिवृष्टीचा पिकांना फटका 

अतिवृष्टी झाल्यामुळे खरीप हंगाम हातचा गेला, पावसामुळे पीक खराब झाल्याने आपला माल कवडीमोल भावाने विकण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली. यातून कसबसे सावरत शेतकऱ्यांनी रब्बीचा पेरा केला. मात्र यावेळीही पावसाने पाठ सोडली नाही, अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा पिकाला फटका बसला. अस्मानी संकटांशी सामना करत असताना आता शेतकऱ्यांना सुलतानी संकटांशी देखील सामना कारावा लागत आहे. महावितरणकडून वीजबिल थकलेल्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात येत असल्याने शेतकरी निराश झाले आहेत.

संबंधित बातम्या

अपघात इतका भीषण की चक्क गॅस कटर, जेसीबीने काढावा लागला मृतदेह; पिकअप अन् ट्रकची टक्कर, एकाचा जागीच मृत्यू

शाळांबाबत तळ्यात-मळ्यात, निर्णय आरोग्य विभाग घेणार; मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा नाही, टोपेंची माहिती

‘कोरोनाला रोखण्यासाठी जे आवश्यक ते सर्व करा,’ मुख्यमंत्री ठाकरेंचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.