Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतात कुटाराची गंजी झाकण्यासाठी गेला तो परतलाच नाही; 39 वर्षीय शेतकऱ्यासोबत नेमकं काय घडलं?

शेतकरी शेतात गेला होता. वादळ, वार सुटलं. यात तो सापडला. आपल्या कुटाराची गंजी व्यवस्थित करायला गेला. तेवढ्यात...

शेतात कुटाराची गंजी झाकण्यासाठी गेला तो परतलाच नाही; 39 वर्षीय शेतकऱ्यासोबत नेमकं काय घडलं?
Follow us
| Updated on: Apr 08, 2023 | 2:02 PM

बुलढाणा : हवामान खात्याचा अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. खरिपातील पीक हातातून गेल्यानंतर शेतकऱ्यांना रब्बी पिकाची मोठी आशा होती. परंतु गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने गहू, हरभरा हे पीक हातून निघून गेले. आता झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीमुळे कांदा, मका, ज्वारी, गहू यासह फळ पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे तात्काळ या नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

कुटाराची गंजी झाकण्यासाठी गेला होता

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील चितोडा येथे दुर्घटना घडली. 39 वर्षीय शेतकरी गोपाल महादेव कवळे यांच्यावर वीज पडली. यात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत शेतकरी गोपाळ कवळे हे त्यांच्या अंबिकापूर शिवारातील शेतात कुटाराची गंजी झाकण्यासाठी गेले होते.

हे सुद्धा वाचा

दरम्यान विजांचा कडकडाट सुरू होवून अंगावर वीज पडली. यात गोपाल कवळे यांचा मृत्यू झाला. याबाबत खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

शेतात काम करताना शेतकऱ्याचा मृ्त्यू

दुसऱ्या घटनेत, अमरावती जिल्ह्यात काल वादळी पावसासह गारपीट झाली. या अवकाळी पावसामुळे मात्र पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे नुकसान झाले. धामणगाव रेल्वे तालुक्यातील मलापूर गावात शेतात काम करत असताना एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. गोपाल करपती वय वर्षे 35 अशी मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.

शेतातील पिकांचे मोठे नुकसान

अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील कुऱ्हा, कौडण्यापूर गावात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील आमला, लोणी टाकळी, दहिगाव गावात चक्रीवादळ आले. अनेक घरांवरील तीन पत्रे व छप्पर उडाल्याने घरातील साहित्यांचे नुकसान झाले. या अवकाळी पावसामुळे मात्र काही प्रमाणात असलेला गहू, हरभरा तसेच टरबूज,कांदा, भाजीपाल्यासह संत्रा पिकांचे मोठं नुकसान झालं आहे.

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.