AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीन दिवसांनंतरही नुकसानीचे पंचनामे नाहीत, प्रशासन बांधावर कधी येणार?, शेतकऱ्यांमध्ये संताप

तीन दिवस उलटले तरीही प्रशासन आलेच नाही. कुणी मंत्री आला नाही. अधिकारी आला नाही. आमदारही आला नाही.

तीन दिवसांनंतरही नुकसानीचे पंचनामे नाहीत, प्रशासन बांधावर कधी येणार?, शेतकऱ्यांमध्ये संताप
Follow us
| Updated on: Jul 24, 2023 | 6:01 PM

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव जामोद तालुक्यात ढगफुटी झाल्याने प्रचंड नुकसान झाले. शेतीचे नुकसान तर झालेच अनेकांची घरंसुद्धा वाहून गेलीत. शेतीचे साहित्यसुद्धा वाहून गेलेत. मात्र नुकसानग्रस्त शेतकरी अद्यापही त्यांच्या बांधावर प्रशासन कधी येणार आणि नुकसानीचा पंचनामा कधी करणार, याची वाट पाहत आहेत. तीन दिवस उलटले तरीही प्रशासन आलेच नाही. कुणी मंत्री आला नाही. अधिकारी आला नाही. आमदारही आला नाही.

पांचाळातील शेतकरी पाहतात वाट

आता हे नुकसान कसे भरून काढावे, असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर आहे. या सगळ्या नुकसानीचा आणि प्रशासनाचा रिॲलिटी चेक आमच्या टीव्ही 9 क्या प्रतिनिधीने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केलाय. संग्रामपूर तालुक्यातील पांचाळा गावातील शेतकरी बांधावर प्रशासनाच्या वाट पाहत आहेत.

सव्वादोननंतर कृषी सहाय्यकांना आली जाग

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर,जळगाव जामोद तालुक्यातील शेतकऱ्यांचे ढगफुटीने प्रचंड नुकसान झाले. शेतकरी देशोधडीला लागला आहे. पंचनामे करण्यासाठी शेतकरी प्रशासनाची कालपासून वाट पाहत आहे. आजही संग्रामपूर तालुक्यातील पांचाला येथील शेतकरी सकाळपासून सव्वादोन वाजेपर्यंत कृषी सहाय्यकाची वाट पाहत बांधावर बसून होते. मात्र कृषी सहाय्यक काही आल्या नव्हत्या. सव्वादोन वाजता कृषी सहाय्यक आल्या आणि पंचनामा करण्यास सुरुवात केलीय.

स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

मात्र राज्याचे कृषी मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा बांधावर आलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांत संताप पाहायला मिळत आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी सुद्धा या मंत्र्यावर टीका केली. शेतकऱ्यांच्या बांधावर न आल्याने त्यांची लाज काढलीय. तत्काळ पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रशांत डीक्कर यांनी यावेळी केलीय.

मदत अद्याप मिळाली नाही

यवतमाळ : तीन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झाले. सर्वाधिक नुकसान हे महागाव, उमरखेड भागात झाले. या भागातील शेतकऱ्यांना भेट देत राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी शेतकऱ्यांना 5 हजार रुपये सानुग्रह मदत तात्काळ देण्याचे जाहीर केले. मात्र 24 तास उलटून अद्याप शेतकऱ्यांना मदत प्राप्त झाली नाही. पुरात अडकलेल्या महागावच्या आनंदनगर येथील 48 कुटुंबाना 5 हजार रुपये प्रमाणे मिळणारी मदत ही शासन जमा झाली. उद्या याचे वाटप केले जाणार आहे. मात्र या व्यतिरिक्त अनेक शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

भारत- पाकिस्तान दोघांनी शांतता राखावी; यूएनएससीचं आवाहन
भारत- पाकिस्तान दोघांनी शांतता राखावी; यूएनएससीचं आवाहन.
भारतात उद्या युद्धाचा सायरन वाजणार, आशियाई देशाचं मॉक ड्रिलकडे लक्ष
भारतात उद्या युद्धाचा सायरन वाजणार, आशियाई देशाचं मॉक ड्रिलकडे लक्ष.
आमच्या हाती काय बंदुका देणार? मॉक ड्रिलवरून राऊतांचा सरकारला खोचक सवाल
आमच्या हाती काय बंदुका देणार? मॉक ड्रिलवरून राऊतांचा सरकारला खोचक सवाल.
देशव्यापी मॉक ड्रिल, आपत्कालीन परिस्थितीत कराल? तज्ज्ञांनी सांगितलं...
देशव्यापी मॉक ड्रिल, आपत्कालीन परिस्थितीत कराल? तज्ज्ञांनी सांगितलं....
भारतासोबत युद्ध झालं तर अवघ्या 100 तासांत पाकिस्तानचे 5 तुकडे, कारण...
भारतासोबत युद्ध झालं तर अवघ्या 100 तासांत पाकिस्तानचे 5 तुकडे, कारण....
चोरीला गेलेलं बाळ सुखरूप आईच्या कुशीत, पोलिसांकडून 48 तासात शोध अन्...
चोरीला गेलेलं बाळ सुखरूप आईच्या कुशीत, पोलिसांकडून 48 तासात शोध अन्....
युद्धाची पूर्व तयारी, गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना आदेश; 7 मे रोजी...
युद्धाची पूर्व तयारी, गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना आदेश; 7 मे रोजी....
पाक पंतप्रधान गायब, पत्रकाराचा सवाल अन् उपपंतप्रधानांचं उत्तर बघा काय
पाक पंतप्रधान गायब, पत्रकाराचा सवाल अन् उपपंतप्रधानांचं उत्तर बघा काय.
मुंबईकरांनो... तुम्ही बेस्ट बसने प्रवास करतात? तुमच्यासाठी मोठी बातमी
मुंबईकरांनो... तुम्ही बेस्ट बसने प्रवास करतात? तुमच्यासाठी मोठी बातमी.
वैभवी देशमुखला मुख्यमंत्र्यांचं पत्र अन् बारावीचे गुण कळताच म्हणाले...
वैभवी देशमुखला मुख्यमंत्र्यांचं पत्र अन् बारावीचे गुण कळताच म्हणाले....