Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

3 मिनिटांचा उशीर झाल्याने सत्ता गेली, सदस्य पर्यटनाला, बहुमत नसूनही विरोधकांची सत्ता

चंद्रपूर जिल्ह्यात 3 मिनिटाचा उशीर झाला आणि सत्ता गमवल्याची घटना घडली आहे. (Chandrapur Tarada Gram Panchayat)

3 मिनिटांचा उशीर झाल्याने सत्ता गेली, सदस्य पर्यटनाला, बहुमत नसूनही विरोधकांची सत्ता
तारडा ग्रामपंचायत
Follow us
| Updated on: Feb 10, 2021 | 6:37 PM

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीत बहुमत असलेल्यांनी विलंब केल्यामुळे सत्ता गमवाल्याचा प्रकार समोर आला आहे. चंद्रपुरातील गोंडपिपरी तालुक्यातील तारडा ग्रामपंचायतीत हा प्रकार घडला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 3 मिनिटाचा उशीर झाला आणि सत्ता गमवल्याची घटना घडली आहे. (Chandrapur Tarada Gram Panchayat Member loose Sarpanch post due to delay by 3 minutes)

चंद्रपुरातील गोंडपिपरी तालुक्यातील तारडा ग्रामपंचायतीत बहुमत असलेल्यानी विलंबामुळे सत्ता गमावली आहे. यात 7 सदस्यांच्या ग्रामपंचायतीत 4 सदस्य पर्यटनाला गेले होते. मात्र त्याचवेळी 3 विरोधी सदस्यांनी वेळेत अर्ज भरले आहे. मात्र 3 मिनिटे उशिरा आलेल्या सदस्यांना अर्ज भरण्यास नकार देण्यात आला. तर दुसऱ्या दिवशी अधिकाऱ्यांनी केवळ एकच  अर्ज आल्याने अविरोध सरपंच घोषित झाले आहे.

अवघ्या 3 मिनिटांच्या फरकाने सरपंच पद हुकल्याचा अजब प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील तारडा ग्रामपंचायतीत झाला आहे.  गोंडपिपरी तालुक्यातील तारडा ग्रामपंचायतीत सरपंच आणि उपसरपंच पदाची निवडणूक होती. सोमवारी दुपारी 12 पर्यंत यासाठी अर्ज दाखल करायचा होता. यात 3 सदस्यांच्या अल्पमत पॅनलने आपले सरपंच-उपसरपंचपदाचे अर्ज वेळेत दाखल केले.

चंद्रपूर तारडा ग्रामपंचायतीतील नवे सरपंच

मात्र 7 सदस्यीय ग्रामपंचायतीत बहुमत असलेला 4 सदस्यीय गट सहलीला गेला होता. या गटाकडून माया गोंगले यांना सरपंचपदासाठी उमेदवार अर्ज दाखल करायचा होती. मात्र सरपंच आणि उपसरपंचपदाचा अर्ज दाखल करण्यासाठी ते ग्रामपंचायतीत 12 वाजून 3 मिनिटांनी पोहोचले.  हे सदस्य अर्ज भरण्यासाठी 3 मिनिटे उशिरा पोहोचले. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्ज भरू दिला नाही.

यामुळे केवळ 3  सदस्य असलेल्या शिवसेना समर्थित गटाला सरपंच आणि उपसरपंच पद निवडणूक न लढताच आयते अविरोध मिळाले. शिवसेना समर्थित पॅनलकडे अवघे 3 सदस्य असताना देखील तरुण उमरे यांना सरपंच पद मिळालं आहे. राजकारणात वेळेला किती महत्व असतं आणि अवघ्या काही मिनिटांच्या फरकाने काय अनर्थ घडू शकतो हे या उदाहरणाने दाखवून दिलं आहे.  (Chandrapur Tarada Gram Panchayat Member loose Sarpanch post due to delay by 3 minutes)

संबंधित बातम्या : 

‘गावाच्या विकासासाठी मित्र, मात्र राज्यात शत्रू’, कल्याणच्या मानिवली ग्रामपंचायतीत शिवसेना-भाजप युती

इंदापुरात रंगलंय ग्रामपंचायतीचं राजकारण, भाजपचा 38 तर राष्ट्रवादीचा 42 ग्रामपंचायतींवर दावा

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.