AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जलयुक्त शिवार योजनेवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणाला डिवचलं, म्हणाले अडीच वर्षे…

महाविकास आघाडीला टोला लगावत असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जलयुक्त शिवार योजनेवरुन देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे.

जलयुक्त शिवार योजनेवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणाला डिवचलं, म्हणाले अडीच वर्षे...
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 13, 2023 | 11:50 AM

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी टीव्ही 9 मराठीच्या ( TV 9 Marathi ) व्यासपीठावरून महासंकल्प ( Mahasankalp ) मांडत असतांना शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाची असणारी जलयुक्त शिवार योजनेबद्दल भाष्य केलं आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना त्यांच्या सरकारने घेतलेल्या जलयुक्त शिवार ( Jalyukt Shiwar ) योजनेचं कौतुक केलं आहे. यावेळी मात्र महाविकास आघाडी सरकारने ती योजना रद्द केल्याचे सांगत आम्ही ती पुन्हा सुरू केल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे. शेती हा शास्वत विकास झाला पाहिजे. पीक पद्धतीत बदल झाला पाहिजे. पारंपरिक शेती बरोबर सेंद्रिय शेतीवर काम केलं पाहिजे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटलं आहे.

केंद्र सरकारने बजेटमध्ये सेंद्रिय शेतीसाठी तरतूद केली आहे. त्यामुळे सेंद्रिय शेतीला सुद्धा आम्ही मदत करणार आहोत, सेंद्रिय शेतीला लागणाऱ्या पाण्याचा मुद्दा सुद्धा आम्ही निकाली लावणार आहोत.

यामध्ये 18 ते 20 असे प्रकल्प होते ते आम्ही सुरुवातीला तीन-चार महिन्यात हाती घेतले आहे. सिंचन प्रकल्पाला मंजूरी देऊन अडीच ते पाच लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे. त्यामुळे शेतीला मोठी मदत होईल.

हे सुद्धा वाचा

जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू केली. पावसाचे पडणारे पाणी एक एक थेंब झिरपले पाहिजे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना ही जलयुक्त शिवार योजना सुरू झाली होती, तीचा आदर्श इतर राज्यांनी घेतला.

पण मागील सरकारने ती योजना बंद करून टाकली होती, ती आम्ही पुन्हा सुरू केली आहे. प्रभावीपणे आम्ही ती योजना राबवत आहे. पावसाचे जे पाणी आहे ते दुष्काळी भागात कसे वळविता येईल त्याचे काम आम्ही हात घेतले आहे.

शेतकऱ्यांना दोन पैसे मिळाले पाहिजे, सामूहिक शेती केली पाहिजे त्यासाठी आम्ही काही योजना आणणार आहोत, त्याचे ब्रँडिग आणि मार्केटिंगसाठी सरकार मदत करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी टीव्ही 9 मराठीच्या महाराष्ट्राच्या महासंकल्पमध्ये कृषी विषयावर भाष्य करत शेतकऱ्यांना मदत करणार आहोत आणि यापुढे काय योजना आहेत याचा संकल्प मांडला आहे.

याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत असतांना महाविकास आघाडीला चांगलाच टोला लगावला आहे.

मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?.
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा.
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा.
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी.
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा.
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?.
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?.
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा.
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे....
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे.....
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?.