Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra lockdown Package : अजित पवार, राजेश टोपे, एकनाथ शिंदेंची बैठक, मृतदेह विल्हेवाटीवर चर्चा

महाराष्ट्रात 8 किंवा 14 दिवसांचा लॉकडाऊन लागणार हे निश्चित आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची बैठक होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Maharashtra lockdown Package : अजित पवार, राजेश टोपे, एकनाथ शिंदेंची बैठक, मृतदेह विल्हेवाटीवर चर्चा
अजित पवार
Follow us
| Updated on: Apr 12, 2021 | 12:22 PM

मुंबई : कोरोनाच्या विस्फोटामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन (Maharashtra lockdown) होणार हे जवळपास निश्चित आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे गेल्या दोन दिवसांपासून मॅरेथॉन बैठका घेत आहेत. दोन दिवसापूर्वी त्यांनी सर्वपक्षीय बैठकीत लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचं म्हटलं होतं. त्याशिवाय काल रविवार 11 एप्रिलला झालेल्या टास्कफोर्सच्या बैठकीत कडक लॉकडाऊनवर चर्चा झाली. त्यामुळे महाराष्ट्रात 8 किंवा 14 दिवसांचा लॉकडाऊन लागणार हे निश्चित आहे.

त्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची बैठक होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पण सध्या या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित आहेत. याशिवाय तिन्ही विभागाचे सचिवदेखील बैठकीत हजर आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या या बैठकीमध्ये मृतदेह विल्हेवाट, ऑक्सिजन लिक्विड प्लान्ट, आर्थिक पॅकेज यावर चर्चा होणार आहे. (CM Uddhav Thackeray meeting with Ajit Pawar on Maharashtra lockdown update may discuss on Lockdown relief package)

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत पॅकेजवर चर्चा

दरम्यान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत आर्थिक पॅकेजवरही चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. लॉकडाऊनचा फटका बसणाऱ्या कामगारवर्गाला आर्थिक पॅकेज देण्याची मागणी भाजपने लावून धरली आहे. आधी पॅकेज, मग लॉकडाऊन अशी भाजपची भूमिका आहे. त्यामुळे आज त्याबाबत काही ठरतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

लॉकडाऊन किती, 8 की 14 दिवस? 

कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) 11 एप्रिलला टास्क फोर्सची बैठक (task force meeting) घेतलीय. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात 8 दिवसांच्या कडक लॉकडाऊनची गरज असल्याचं मत व्यक्त केलं. मात्र टास्क फोर्समधील तज्ज्ञांनी निदान 14 दिवसांचा लॉकडाऊन लागू झाला तर परिस्थिती नियंत्रणात येईल, असं मत मांडलं. त्यामुळे टास्क फोर्सचे तज्ज्ञ देखील लॉकडाऊनच्या बाजूने आहेत.

यंत्रणांचा शक्तीपात नको, लॉकडाऊन आवश्यक : मुख्यमंत्री 

कोरोनाचा उद्रेक रोखून साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्रात 8 किंवा 14 दिवसांचा कडक लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तसे संकेत दिले आहेत. यंत्रणांचा शक्तीपात होऊ नये. निर्णय घेण्याची वेळ आली आहे, दुसरा पर्याय नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी 10 एप्रिलला सर्वपक्षीय बैठक (Maharashtra all party meeting) बोलावली होती.  महाराष्ट्राच्या लॉकडाऊनसंबंधात (Maharashtra lockdown) तब्बल सव्वा दोन तास खलबतं या बैठकीत झाली.

“लॉकडाऊन करायची वेळ आली आहे, कारण यंत्रणांचा शक्तीपात होऊ नये. निर्णय घेण्याची वेळ आली आहे, लॉकडाऊन हा एकमेव मार्ग नाही पण जगानेही तो स्वीकारला आहे”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. याशिवाय सर्वांच्या सूचना ऐकल्या, चांगल्या आहेत. पण निर्बंध आणि सूट दोन्ही एकाचवेळी शक्य नाही. येत्या दोन दिवसात निर्णय घेऊ, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

 पूर्ण लॉकडाऊनमुळे उद्रेक होईल : फडणवीस 

व्यापाऱ्यांचे गेले वर्ष त्यांचे वाया गेले. कर, वीज बिल कर्ज व्याज भरावे लागत आहेत. त्यामुळे जीवन चालवायचे कसे हा प्रश्न जनतेसमोर आहेत. हे सर्व लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, निर्बंध असायला हवेत, पण जनतेचा उद्रेक लक्षात घ्यायला हवा, असं देवेंद्र फडणवीस  म्हणाले.

संबंधित बातम्या 

CM Uddhav Thackeray Meeting With Task Force: राज्यात 8 दिवसांच्या कडक लॉकडाऊनची शक्यता, मुख्यमंत्र्यांचे मोठे संकेत   

Maharashtra lockdown All party meet Highlights : राज्यात 8 किंवा 14 दिवसांच्या लॉकडाऊनची शक्यता, मुख्यमंत्री म्हणाले, दुसरा पर्याय नाही! 

CM Uddhav Thackeray meeting with Ajit Pawar on Maharashtra lockdown update may discuss on Lockdown relief package

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.