AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : भोंगे वाजवल्याने राग येत नाही, मग हनुमान चालिसा म्हटल्याने राग का येतो?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

भाजपकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) भूमिकेला पाठिंबा मिळतोय. तर हा धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, म्हणत महाविकास आघाडी यावर सडकून टीका करत आहे. त्यामुळे सध्या हनुमान चालीसा आणि मशीदीवरील भोंगे या दोन्ही गोष्टींवरून राजकारण रंगताना पहायला मिळतंय.

Devendra Fadnavis : भोंगे वाजवल्याने राग येत नाही, मग हनुमान चालिसा म्हटल्याने राग का येतो?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल
हनुमान चालीसा वाचल्यावर राग का येतो?-फडणवीसImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 10, 2022 | 7:37 PM

कोल्हापूर : राज्यात सध्या महाविकास आघाडी आणि भाजप पुन्हा मशीदीवरील भोंग्यांवरून (mosque loud speaker) आमनेसामने आले आहेत. भाजपकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) भूमिकेला पाठिंबा मिळतोय. तर हा धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, म्हणत महाविकास आघाडी यावर सडकून टीका करत आहे. त्यामुळे सध्या हनुमान चालीसा आणि मशीदीवरील भोंगे या दोन्ही गोष्टींवरून राजकारण रंगताना पहायला मिळतंय. देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) यावरून आता काही खोचक सवाल विचारले आहेत. भोंगे वाजवल्याने राग येत नाही, मग हनुमान चालिसा म्हटल्याने राग का येतो? असा थेट सवाल देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना विचारला आहे. त्यामुळे सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपमध्येही जोरदार खडाजंगी सुरू आहे. देवेंद्र फडणवीसांनी हिंदुत्वावरून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगेच शिवसेना स्टाईलने फडणवीसांचा समाचार घेतला आहे.

फडणवीस काय म्हणाले?

आज राम नवमी आहे. त्यानिमीत्ताने मनसेने शिवसेना भवनसमोरील रस्त्यावरच हनुमान चालीसा सुरू केली. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले हनुमान चालिसा ही आपली परंपरा आहे. काही लोकांना हनुमान चालिसाचा का राग येतो? भोंगे वाजल्याने राग येत नसेल तर हनुमान चालिसाने राग का येतो? असे म्हणत त्यांनी तिखट सवाल केले आहेत. एवढंच नाही तर भगव्या झेंड्यावरून देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला आहे. नाना पटोलेंना भगव्याची चीड का आहे. भगव्या झेंड्याचं नाव घेतल्यावर नाना पटोलेंना राग का येतो, असा सवालही फडणवीसांनी केला आहे. त्यामुळे सध्या जोरदार वातावरण तापलं आहे.

मनसेचीही सेनेवर जोरदार टीका

मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही हिंदुत्वावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांनी संपलेल्या पक्षावर मी प्रतिक्रिया देत नाही, असे खोचक उत्तर दिले होते, त्यावर बोलताना मनसे पक्ष संपला कि नाही जनता ठरवेल पण सेनेचे हिंदुत्व संपलं आहे, असा टोला देशपांडे यांनी लगावला आहे. आम्ही सेना भवनसमोर हनुमान चालीसा वाचली म्हणून यांना राग का येतो? आदित्य ठाकरेंनी आमच्या पक्षाबाबत बोलू नये. आधी शिवसेना ही मुस्लिम लीग सेना झाली का? हे पाहवं. असा टोला त्यांनी लगावला आहे. राज ठाकरेंची गुढी पाडव्याची सभा झाल्यापासून हा मशीदीवरील भोंग्यांचा आणि हनुमान चालीसा यांचा वाद पेटला आहे.

CM Uddhav Thackeray : मोदींनी रेशन दिलं पण आता रिकामा सिलेंडर वाजवायचा का? महागाईवरून मुख्यमंत्र्यांचा केंद्रावर निशाणा

Arvind Sawant : मुंबई केंद्रशासित करण्याची हिंमत करून दाखवा, मग बघाच, अरविंद सावंत यांचा इशारा

जनतेच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो, राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी – उद्धव ठाकरे

भारत - पाकिस्तान अटारी सीमेवरील दरवाजे पुन्हा उघडले
भारत - पाकिस्तान अटारी सीमेवरील दरवाजे पुन्हा उघडले.
LPG Gas : मे महिन्याच्या सुरुवातीलाच Good News... गॅस सिलिंडर स्वस्त
LPG Gas : मे महिन्याच्या सुरुवातीलाच Good News... गॅस सिलिंडर स्वस्त.
रायगडचं पालकमंत्रिपद गावगुंडाकडे नको, राऊतांचा नाव न घेता गोगावलेंना
रायगडचं पालकमंत्रिपद गावगुंडाकडे नको, राऊतांचा नाव न घेता गोगावलेंना.
चुन चुन के नंतर मारा,आधी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या; संजय राऊत बरसले
चुन चुन के नंतर मारा,आधी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या; संजय राऊत बरसले.
अखेर सत्य उघड! पहलगाम हल्ल्याचा कट पाकिस्तानचाच? एनआयएचा अहवाल तयार
अखेर सत्य उघड! पहलगाम हल्ल्याचा कट पाकिस्तानचाच? एनआयएचा अहवाल तयार.
हंडाभर पाण्यासाठी वणवण पायपीट; इगटपुरीत भीषण पाणी टंचाई
हंडाभर पाण्यासाठी वणवण पायपीट; इगटपुरीत भीषण पाणी टंचाई.
एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी
एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी.
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.