नशाबंदी मंडळाचे तीन वर्षांचे अनुदान प्रलंबित, 54 लाख रुपये तत्काळ वितरीत करण्याचे धनंजय मुंडे यांचे निर्देश

पूर्णवेळ कार्यरत असलेल्या या मंडळाचे 2018 पासूनचे 54 लाख 15 हजार अनुदान तात्काळ अदा करण्यात यावे, असे निर्देश सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज (4 ऑगस्ट) दिले.

नशाबंदी मंडळाचे तीन वर्षांचे अनुदान प्रलंबित, 54 लाख रुपये तत्काळ वितरीत करण्याचे धनंजय मुंडे यांचे निर्देश
DHANANJAY MUNDE
Follow us
| Updated on: Aug 04, 2021 | 8:26 PM

मुंबई : नशाबंदी मंडळ ही शासनाच्या व्यसनमुक्ती धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनामार्फत कार्यरत असलेली एकमेव अनुदानित संस्था आहे. राज्यातील भावी पिढी व्यसनाधीन होऊ नये, यासाठी ही संस्था काम करते. त्यामुळे पूर्णवेळ कार्यरत असलेल्या या मंडळाचे 2018 पासूनचे 54 लाख 15 हजार अनुदान तत्काळ अदा करण्यात यावे, असे निर्देश सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज (4 ऑगस्ट) दिले. (dhananjay munde grants 54 lakh rupees to Nashabandi Mandal Maharashtra)

याचबरोबर काळाची गरज ओळखून नशाबंदी संदर्भात मोठ्या प्रमाणात तरूणांचे प्रबोधन अत्यावश्यक असून त्याद्वारे महाराष्ट्राची प्रगती साध्य करता येणार आहे. नशाबंदी मंडळाचे (Nashabandi Mandal Maharashtra) काम आणि राज्याची व्याप्ती पाहता दरवर्षी वितरीत होणाऱ्या अनुदानात वाढ करून ती 30 लाखावरून 60 लाख इतकी करण्याच्या कार्यवाहीला गती देण्याचे निर्देश सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिले.

नशाबंदी मंडळ संस्थेच्या कामकाजासंदर्भात आढावा बैठक

मंत्रालयात नशाबंदी मंडळ या संस्थेच्या अनुदान व कामकाजा संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस अपर मुख्य सचिव अरविंद कुमार, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, सामाजिक न्याय विभागाचे सह सचिव दि.रा. डिंगळे आदिसह नशाबंदी मंडळाचे अध्यक्ष माजी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ राजेंद्र वेळुकर, कार्याध्यक्ष आयुक्त आर.के. गायकवाड, सरचिटणीस वर्षा विद्या विलास, कार्यकारिणी सदस्य प्रिया पाटील, डॉ. प्रभा तिरमारे, प्रिया पाटील हे उपस्थित होते.

स्वयंसेवी संघटनांना तीन कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद

यावेळी बैठकीदरम्यान बोलताना “नशाबंदी हा संवेदनशील विषय असून, याबाबत तरुणांमध्ये जागरुकता निर्माण होणे गरजेचे आहे. 2020-21 या आर्थिक वर्षातील एकूण देय अनुदानापैकी 14.85 हजार इतके अनुदान वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. 2021-22 या आर्थिक वर्षासाठी अंमली पदार्थ विरोधी मोहीम आणि व्यसनाधीन व्यक्तींचे पुनर्वसन करण्यासाठी स्वयंसेवी संघटनांना तीन कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.

तसेच व्यसनमुक्ती धोरणाअंतर्गत प्रत्येक महसुली विभागास दोन याप्रमाणे व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या 12 संस्थांना प्रत्येकी 11 लाख अशी एकूण एक कोटी 32 लाख याचबरोबर राष्ट्रीय महात्मा गांधी पुरस्कार व सातवे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलन या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी तीन कोटी रक्कम वितरीत करण्यात येत असल्याचे मुंडे यांनी यावेळी सांगितले.

इतर बातम्या :

Pune Lockdown : पुण्यातील दुकाने पोलिसांकडून बंद करण्यास सुरुवात, व्यापारी संतप्त, फतेचंद रांकांनी दुकान सुरुच ठेवलं

Maratha Reservation : 102 व्या घटना दुरुस्तीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, आता आरक्षणाचे अधिकार राज्यांना मिळणार

Ravi Kumar Dahiya | फायनलमध्ये एन्ट्री मारताच भारतात जल्लोष, रवीकुमार दहियाचे कुटुंबीय थिरकले, सोशल मीडियावर धुमाकूळ

(dhananjay munde grants 54 lakh rupees to nashabandi mandal maharashtra)

दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?.
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले.