AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीबद्दल मोठी बातमी, ठाकरे गटाला झटका देण्यासाठी शिंदे गटाचा मास्टर प्लॅन

सुप्रीम कोर्टात (Supreme Court) काय युक्तिवाद होतो हे पाहणं ते महत्त्वाचं ठरणार आहे. शिंदे गट येत्या 14 फेब्रुवारीच्या सुनावणीत काय भूमिका मांडणार याबाबतची माहिती 'टीव्ही 9 मराठीच्या हाती लागली आहे.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीबद्दल मोठी बातमी, ठाकरे गटाला झटका देण्यासाठी शिंदे गटाचा मास्टर प्लॅन
Follow us
| Updated on: Feb 09, 2023 | 10:40 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर दिल्लीत येत्या 14 फेब्रुवारीला महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे. कारण येत्या 14 फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. ही सुनावणी नियमित स्वरुपात सुरु होणार आहे. विशेष म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगात (Election Commission) शिवसेनेच्या नाव आणि चिन्हाविषयी सुनावणी पूर्ण झालीय. दोन्ही गटाचा युक्तिवाद पूर्ण झालाय. निवडणूक आयोगाकडून कधीही या प्रकरणाचा निकाल जाहीर होऊ शकतो. या घडामोडींदरम्यान सुप्रीम कोर्टात काय युक्तिवाद होतो हे पाहणं ते महत्त्वाचं ठरणार आहे. शिंदे गट येत्या 14 फेब्रुवारीच्या सुनावणीत काय भूमिका मांडणार याबाबतची माहिती ‘टीव्ही 9 मराठीच्या हाती लागली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गट येत्या 14 फेब्रुवारीच्या सुनावणीत नवाब रबिया केसचा संदर्भ देत युक्तिवाद करणार आहे. अपात्र आमदारांचं प्रकरण विधानसभा अध्यक्षकांकडे द्या, असा युक्तिवाद शिंदे गट करणार आहे. त्यासाठी शिंदे गटाच्या वकिलांकडून नबाव रबिया केसचा अभ्यास सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय.

हे सुद्धा वाचा

अपात्र आमदारांबद्दलचे अधिकार विधानसभा अध्यक्षकांकडे आहेत. त्यामुळे हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग केलं जावं. विधानसभा अध्यक्षांना त्याबद्दलचे निर्णय घेऊ द्यावे, अशी मागणी केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळालीय.

गेल्या सुनावणीवेळी ठाकरे गटाने हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे द्यावं, अशी मागणी केली होती. त्यानंतर आता शिंदे गट अपात्र आमदारांचं प्रकरण विधानसभा अध्यक्षकांडे वर्ग करण्याची मागणी करणार असल्याची माहिती मिळत आहे.

14 फेब्रुवारीच्या सुनावणीकडे देशाचं लक्ष

शिवसेनेच्या 14 फेब्रुवारीच्या सुनावणीकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. कारण एकनाथ शिंदे गटाने थेट पक्षातून बंडखोरी करत थेट पक्षावर दावा सांगण ही देशातील राजकारणातील दुर्मिळ घटना आहे. याआधी देखील काँग्रेससोबत असं घडलं आहे.

याशिवाय उत्तरेकडील राज्यांमध्ये अशा घटना घडल्या आहेत. पण शिवसेनेतली घटना आजच्या घडीसाठी सर्वात महत्त्वाची आहे. कारण या सुनावणीत जो निकाल येईल त्याच्या पार्श्वभूमीवर आगामी काळातील राजकीय घडामोडी घडणार आहेत.

सु्प्रीम कोर्टात 16 अपात्र आमदारांच्या याचिकेचा निकाल ठाकरे गटाच्या बाजूला लागला तर महाराष्ट्रातील शिंदे सरकार कोसळू शकतं. दुसरीकडे निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागला तर हा ठाकरे गटासाठी सर्वात मोठा फटका असेल.

मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?.
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा.
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा.
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी.
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा.
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?.
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?.
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा.
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे....
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे.....
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?.