AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाळी अधिवेशनावरही पावसाचे सावट, आमदारांना जायचंय मतदारसंघात, अधिवेशनाला चार दिवस सुट्टी

राज्यात पावसाचे प्रमाण वाढले असून काही ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. आमदार आपल्या मतदारसंघात जाऊन तेथील नुकसानीचा आढावा घेऊन त्यानंतर ती माहिती सभागृहाला अवगत करून देतील.

पावसाळी अधिवेशनावरही पावसाचे सावट, आमदारांना जायचंय मतदारसंघात, अधिवेशनाला चार दिवस सुट्टी
VIDHAN BHAVANImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jul 27, 2023 | 4:55 PM

मुंबई । 27 जुलै 2023 : राज्यात पावसाने अनेक जिल्ह्याना झोडपले आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले आहे तर काही जिल्ह्यांमध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने आमदारांना आपापल्या मतदारसंघात जाता येत नाही. आढावा घेता येत नाही. त्यामुळे अनेक आमदारांनी अधिवेशन लवकर संपवा अशी मागणी केली होती. विरोधी पक्षाच्या आमदारांनी अधिवेशन पूर्ण काळ चालविण्याची मागणी करत सरकार अधिवेशनापासून पळ काढत असल्याचा आरोप केला. त्यावर आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला.

कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये पावसाळी अधिवेशनाला चार दिवस सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विरोधी पक्षांचे गटनेते उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

आज घेण्यात आलेल्या निर्णयानुसार शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार असे चार दिवस अधिवेशन होणार नाही. तर, पुढील बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार असे तीन दिवस अधिवेशन होणार आहे. विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात पावसाचे प्रमाण वाढले असून काही ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. आमदार आपल्या मतदारसंघात जाऊन तेथील नुकसानीचा आढावा घेऊन त्यानंतर ती माहिती सभागृहाला अवगत करून देतील. राज्यातील एकूण नुकसानीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात सर्विस्तर निवेदन करून नुकसानग्रस्तांसाठी मोठी मदत जाहीर करतील अशी माहिती विधानभवनातील सूत्रांनी दिली.

युद्धाची भिती अन् पाकचा शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांमध्ये धास्ती
युद्धाची भिती अन् पाकचा शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांमध्ये धास्ती.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन.
..त्याशिवाय पर्याय नाही, जरांगे पाटलांकडून इशारा देत चलो मुंबईचा नारा
..त्याशिवाय पर्याय नाही, जरांगे पाटलांकडून इशारा देत चलो मुंबईचा नारा.
'त्या' झिपलाइन ऑपरेटरची NIA कडून चौकशी झाल्यानंतर वडिलांकडून मोठा दावा
'त्या' झिपलाइन ऑपरेटरची NIA कडून चौकशी झाल्यानंतर वडिलांकडून मोठा दावा.
पाकिस्तानकडून युद्धबंदीचं उल्लंघन; आखनूर भागात गोळीबार
पाकिस्तानकडून युद्धबंदीचं उल्लंघन; आखनूर भागात गोळीबार.
हिंदू हो क्या?, हल्ल्याच्या आदल्या दिवशी दहशतवाद्यांनी विचारलं अन्...
हिंदू हो क्या?, हल्ल्याच्या आदल्या दिवशी दहशतवाद्यांनी विचारलं अन्....
पंतप्रधान मोदींच्या 5 मोठ्या बैठका; निर्णयाकडे देशाचं लक्ष
पंतप्रधान मोदींच्या 5 मोठ्या बैठका; निर्णयाकडे देशाचं लक्ष.
पहलगाम हल्ल्याचा मुद्दा ब्रिटिश संसदेत उपस्थित; शांततेचं आवाहन
पहलगाम हल्ल्याचा मुद्दा ब्रिटिश संसदेत उपस्थित; शांततेचं आवाहन.
'शत्रू हल्ल्याआधी 10 वेळा विचार करेल', नवाज शरीफच्या मुलीची दर्पोक्ती
'शत्रू हल्ल्याआधी 10 वेळा विचार करेल', नवाज शरीफच्या मुलीची दर्पोक्ती.
या गोष्टीत धर्म, जात, पात भाषा आणायच्या नाहीत - शरद पवार
या गोष्टीत धर्म, जात, पात भाषा आणायच्या नाहीत - शरद पवार.