AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्राजक्ता माळी आणि सुरेश धस वादात गुणरत्न सदावर्तेंची उडी, केली मोठी मागणी

शनिवारी प्राजक्ता माळी यांची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी सुरेश धस यांनी आपली माफी मागावी अशी मागणी केली, यावर आता गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

प्राजक्ता माळी आणि सुरेश धस वादात गुणरत्न सदावर्तेंची उडी, केली मोठी मागणी
Follow us
| Updated on: Dec 29, 2024 | 4:37 PM

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आमदार सुरेश धस हे अतिशय आक्रमकपणे आपली भूमिका मांडत आहेत. वाल्मिकी कराड यांना अटक करा, जोपर्यंत देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील होते आहे. दरम्यान सुरेश धस यांनी बोलताना तीन अभिनेत्रींचा उल्लेख केला. त्यामध्ये प्राजक्ता माळी यांचं नाव देखील होतं, त्यानंतर शनिवारी प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेऊन सुरेश धस यांना चांगलंच सुनावलं, सुरेश धस यांनी आपली माफी मागावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली, तर मी माफी मागणार अशी प्रतिक्रिया यावर सुरेश धस यांनी दिली आहे. दरम्यान या वादावर आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते? 

कला क्षेत्रातील महिलांना अपमानित करणे त्यांची खिल्ली उडवणे हे चुकीचं आहे. यामुळे सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी यांची माफी मागावी अशी मागणी गुणरत्न  सदावर्ते यांनी केली आहे. रश्मिका मंदाना असतील किंवा प्राजक्ता माळी असतील यांनी अल्पवधीत चांगलं काम करून आपल्या क्षेत्रात नाव कमावलं आहे. त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यामुळे कोणाला भेटायचं कोणाला नाही भेटायचं हा त्यांचा प्रश्न आहे, मात्र इथे जाणून -बूजन कलाकारांचा अपमान केला जात आहे, असा आरोप यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.

दरम्यान सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांकडून धमक्या येत असल्याचा आरोप देखील यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. सुरेश धस यांचे कार्यकर्ते मला धमकी देत आहेत, जीवे मारण्याची धमकी मला दिली आहे. हे अत्यंत वेदनादायी आहे. कालपासून मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. एक लक्षात ठेवा आता कुठेही राजेशाही आणि पाटीलकी चालत नाही. प्रशासन आणि पोलीस या धमक्यांची योग्य ती दखल घेतील, कारवाई होईल असं सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.
पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले
पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले.
मोठी बातमी! भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्धवस्त
मोठी बातमी! भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्धवस्त.
पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये वाजले सायरन
पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये वाजले सायरन.
कंदहारचा बदला पूर्ण! जैशचा दहशतवादी रौफ अझरचा खात्मा
कंदहारचा बदला पूर्ण! जैशचा दहशतवादी रौफ अझरचा खात्मा.
बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी पाकिस्तान हादरलं! पाकच्या नौदल तळाजवळ बॉम्ब
बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी पाकिस्तान हादरलं! पाकच्या नौदल तळाजवळ बॉम्ब.
ऑपरेशन सिंदूर अजून... मोदी सरकारचं मोठं वक्तव्य, आता पुढची पाऊलं काय?
ऑपरेशन सिंदूर अजून... मोदी सरकारचं मोठं वक्तव्य, आता पुढची पाऊलं काय?.
पाकिस्तानात स्फोटांची मालिका; 10 शहरांमध्ये 12 बॉम्बस्फोट
पाकिस्तानात स्फोटांची मालिका; 10 शहरांमध्ये 12 बॉम्बस्फोट.
मुरिदकेच्या हल्ल्याचा आवाज... परदेशी पत्रकाराचा दावा, सांगितलं वास्तव
मुरिदकेच्या हल्ल्याचा आवाज... परदेशी पत्रकाराचा दावा, सांगितलं वास्तव.
त्यांचा सल्ला ऐकायला हवा होता; अमित ठाकरेंनी व्यक्त केली खंत
त्यांचा सल्ला ऐकायला हवा होता; अमित ठाकरेंनी व्यक्त केली खंत.