AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूल, रस्ते गेले, 36 लाख हेक्टरवरील पीक पाण्यात, मराठवाड्यात तब्बल 4 हजार कोटींचं नुकसान

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अतिवृष्टीमुळे नेमके किती नुकसान झाले याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. त्यांनी मराठवाड्यातील 48 लाख हेक्टर पैकी 35 ते 36 लाख हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याची शक्यता आहे. एनडीआरएफच्या नॉर्मनुसार हे नुकसान 4 हजार कोटी रुपयांचे असावे, असं सांगितलं आहे.

पूल, रस्ते गेले, 36 लाख हेक्टरवरील पीक पाण्यात, मराठवाड्यात तब्बल 4 हजार कोटींचं नुकसान
हरियाणातील सुमारे 70 टक्के लोक शेतीशी संबंधित आहेत. देशात हरित क्रांती आणण्यात हरियाणाने महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे सांगितले जाते. येथे गहू, तांदूळ, ऊस, सूर्यफूल इत्यादी पिकांची लागवड केली जाते. सूर्यफूल लागवडीमध्ये देशात हरियाणा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर हे राज्य पशुपालनातही पुढे आहे.
Follow us
| Updated on: Oct 10, 2021 | 10:24 AM

औरंगाबाद : काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्याची मोठी दुर्दशा झाली. या भागात खरीप हंगाम पुरता पाण्यात गेला. अतिवृष्टी झाल्यानंतर विरोधी पक्षाचे नेते तसेच काही मंत्र्यांनी मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अतिवृष्टीमुळे नेमके किती नुकसान झाले याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. त्यांनी मराठवाड्यातील 48 लाख हेक्टर पैकी 35 ते 36 लाख हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याची शक्यता आहे. एनडीआरएफच्या नॉर्मनुसार हे नुकसान 4 हजार कोटी रुपयांचे असावे, असं सांगितलं आहे.

ओल्या दुष्काळाचा निर्णय मुख्यमंत्री स्तरावर

अजित पवार यांनी मराठवाड्यातील अतिवृष्टी तसेच झालेल्या नुकसानीविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच वेळ आली तर कर्ज काढू पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन दिले. “मराठवाड्यातील 48 लाख हेक्टर क्षैत्रापैकी 35 ते 36 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. एनडीआरएफच्या नॉर्मनुसार हे नुकसान 4 हजार कोटी रुपयांचे झाले असावे. पालकमंत्र्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. ओल्या दुष्काळाचा निर्णय मुख्यमंत्री स्तरावर होईल. मी मुख्यमंत्र्यांशी याबाबत बोलणार आहे. वेळप्रसंगी कर्ज काढू. पण मराठवाड्याच्या आणि राज्यातील कुठल्याच शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही,” असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.

19 तारखेपर्यंत आणखी पावसाचा अंदाज

तसेच मराठवाड्यात 32 ते 36 लाख हेक्टरवर नुकसान झाल्याच्या प्राथमिक आकडा येतोय. एनडीआरएफच्या नॉर्मप्रमाणे 4 हजार कोटींचे नुकसान झाल्याचे दिसतेय. बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. 19 तारखेपर्यंत अजून पावसाचा अंदाज आहे. एनडीआरएफच्या नॉर्मनुसार काम सुरु आहे. मुखमंत्र्यांना सोमवारी याबाबत आम्ही अहवाल देणार आहेत. तसेच नुकसानीविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत, असेदेखील अजित पवार म्हणाले.

पॅकेज जाहीर करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार 

तसेच पुढे बोलताना, रस्ते पूल सगळं वाहून गेलं. तलाव फुटले आहेत. नुकसानीचा पूर्ण अंदाज अजून आलेला नाही. मात्र, यंत्रणा काम करत आहे. यापूर्वी पीक विम्याचे पैसे आम्ही सोडलेले आहेत. आता केंद्रानेही पैसे द्यावेत. नुकसान झालेले शेतकरी तसेच इतर घटकांना मदत करण्यासंदर्भात पॅकेज जाहीर करण्याबाबत आम्ही चर्चा करणार आहेत. यावर मुख्यमंत्री स्तरावर निर्णय होईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

महाराष्ट्र बंदला पाठिंबा

तसे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे आता शेतकऱ्यांना पीककर्ज फेडणे शक्य नाही. त्यामुळे कर्जाचे पुनर्गठन करावे लागेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत सविस्तर सांगतील, असेदेखील पवार म्हणाले. तसेच सोमवारच्या महाराष्ट्र बंदला राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे. शेतकऱ्यांना चिरडणे याआधी कधीच घडलं नाही, असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली.

इतर बातम्या :

आयकर विभागानं पवार कुटुंबियांना टार्गेट केलंय का? फडणवीसांची पहिल्यांदाच सविस्तर प्रतिक्रिया

मोठी बातमी! एनसीबीनं ड्रग्जकांडात सोडलेल्यांमध्ये एकजण राष्ट्रवादी नेत्याच्या मुलाच्या जवळचा, फडणवीसांचा गौप्यस्फोट

Rain Update | पुण्यात पावसामुळे दाणादाण, सखल भागात पाणी साचलं, आगामी 4 दिवसांत राज्यात मुसळधार

पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक.
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?.
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर.
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?.
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'.
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?.
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय.
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल.
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान.
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?.