Maharashtra Rain: कोकणात मुसळधार, नद्या धोक्याच्या पातळीवर, जळगावात पुरात एक जण वाहून गेला

Maharashtra Rain: हवामान विभागाचा आज रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. सोमवारी सुद्धा हवामान खात्याचा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी दिली आहे. मुंबईत रविवारी मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक सखल भागात पाणी देखील साचले आहे.

Maharashtra Rain: कोकणात मुसळधार, नद्या धोक्याच्या पातळीवर, जळगावात पुरात एक जण वाहून गेला
Maharashtra Rain
Follow us
| Updated on: Jul 08, 2024 | 8:46 AM

राज्यात सर्वत्र पावसाचा जोर सुरु आहे. महाराष्ट्रात सोमवारी सर्वच जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. तसेच रत्नागिरी, पुणे, सातार या जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. सोमवारी सकाळी रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. परंतु रविवारी मध्यरात्रीपासून झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील पूर परिस्थिती निर्माण झाली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच नद्या अद्यापही धोक्याच्या पातळीवर आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील काजळी, अर्जुना, कोदावली, शास्त्री, मुचकुंदी नदी इशारा पातळीवर आली आहे. चांदेराई बाजारपेठेतील पाणी ओसरले आहे.

रत्नागिरीत शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

हवामान विभागाचा आज रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. सोमवारी सुद्धा हवामान खात्याचा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी दिली आहे. मुंबईत रविवारी मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक सखल भागात पाणी देखील साचले आहे.

मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील आंबोली सिजर रोड परिसरातील झोपडपट्टीतील अनेक घरात पाणी घुसल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे रविवारी मध्यरात्री झोपेत असलेल्या नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाल्याच दिसून आले. गटाराचे पाणी घरात शिरल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. घरातील सामान देखील पाण्यामुळे भिजून गेले आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या नुकसानीचा सामना देखील करावा लागत आहे. मुसळधार पावसानंतर कांदिवली गावात पाणी तुंबले आहे. कांदिवली गावात अनेक वाहने पाण्याखाली बुडाली आहेत.

जळगावात पुरात एक जण वाहून गेला

जळगाव शहरातील खंडेराव नगरात नाल्यात चेंडू घेण्यासाठी उतरलेल्या सहा वर्षीय चिमुकला हा पुराच्या पाण्यात वाहून गेला. या मुलाचा मृतदेह रविवारी राष्ट्रीय महामार्गावरील पोद्दार शाळेजवळील नाल्याजवळ अडकलेला आढळून आला. सचिन राहुल पवार (वय ६, रा.हरी विठ्ठल नगर, जळगाव) असे मयत झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.