Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्यांचे किती, आमचे किती, मग असा का झाला निर्णय ? ठाकरे गटाच्या ‘या’ खासदाराने पुरावेच देत सांगितले

निवडणूक आयोगाचा निकाल आमच्याच बाजूने येईल असे काही केंद्राचे मंत्री, भाजपची मंडळी आणि मिंधे गटाचे आमदार सांगत होते ते कशाच्या आधारे ? त्यांना माहित होते की आमचा गुलाम तिथे बसला आहे.

त्यांचे किती, आमचे किती, मग असा का झाला निर्णय ? ठाकरे गटाच्या 'या' खासदाराने पुरावेच देत सांगितले
UDDHAV THACKERAY AND EKNATH SHINDEImage Credit source: TV9 NETWORK
Follow us
| Updated on: Feb 18, 2023 | 6:01 PM

मुंबई : सीबीआय, ईडी या सारख्या संस्था आधीच केंद्र सरकार आणि मोदी यांच्या गुलाम झाल्या आहेत. त्यात आणखी एक निवडणूक आयोगाची भर पडली आहे. निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची निवड कशी झाली माहित आहे का ? तिकडे सेवानियुक्त झाले आणि इकडे नियुक्ती झाली. कारण, त्यांना त्यांची सेवा करायची आहे. सुप्रीम कोर्टात २१ पासून सुनावणी सुरु होत आहे. त्या सुनावणीला कशी बाधा येईल याचा प्रयत्न म्हणूनच हा खोटा निर्णय देण्यात आल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. हा आरोप करताना त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

निवडणूक आयोगाचा निकाल आमच्याच बाजूने येईल असे काही केंद्राचे मंत्री, भाजपची मंडळी आणि मिंधे गटाचे आमदार सांगत होते ते कशाच्या आधारे ? त्यांना माहित होते की आमचा गुलाम तिथे बसला आहे. बाकी संस्था तर केव्हाच गुलाम झाल्या आहेत. सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स सारख्या गुलाम संस्थांमध्ये आता आणखी एका संस्थेची भर पडली आहे. आतापर्यंतच्या इतिहासात चिन्ह गोठवण्याचा निर्णय झाला होता. पण. पक्ष आणि चिन्हच देऊन टाकले ते कशाच्या आधारावर ? आमदारांच्या आधारावर असा अरविंद सावंत यांनी केला.

हे सुद्धा वाचा

मग निर्णय कुणाच्या आधारे ?

आमदारांच्या आधारावर हा निर्णय दिला गेला. मग, उद्धव ठाकरे यांच्यासोबत बाकीचे आमदार आहेत त्यांचे काय ? विधानसभेचे १५ आमदार, विधान परिषदेचे १२ आमदार, लोकसभेतील ५ खासदार, राज्यसभेतील ३ खासदार यांची मते ग्राह्य धरायची नाही का ? मग, आमचे पराभूत झालेले उमेदवार आहेत त्यांची मते कुणाची ? ती त्यांची की शिवसेनेची ? यांनाही मिळालेली मतेसुद्धा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेऊन दिलेली मते आहेत. ती मते ग्राह्य धरली नाहीत मग निर्णय कुणाच्या आधारे घेतला गेला.

निवडणूक आयोगाने आणखी नवीन विषय काढला. प्रतिज्ञापत्र द्यायला लावली. सदस्य संख्या मागितली. त्यांच्या फॉरमॅटमध्ये सादर करायला लावली. आम्ही २० लाख अर्ज दिले. ते खिजगणतीत नाही. त्यांचे ४ लाख पण प्रतिज्ञापत्र नाहीत. मुंबईतील विभागप्रमुख हे प्रतिनिधी सदस्य आहेत. ते सगळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. त्याची दखल घेतली नाही.

धादांत खोटे बोलून ‘ही’ फसवणूक

आमची निवड लोकशाही पद्धतीने केली नाही. कार्यकारिणीची अहवाल सादर केला नाही असे निवडणूक आयोग म्हणते. पण, शिवसेना सचिव अनिल देसाई यांनी ४ एप्रिल २०१८ ला राष्ट्रीय कार्यकारिणीचे इतिवृत्त निवडणूक आयोगाला सादर केले. त्याची व्हिडिओ क्लिप आहे. मग हे सगळे पुरावे गेले कुठे ? आमच्याशी धादांत खोटे बोलून ही फसवणूक केली आहे. सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला कशी बाधा आणता येईल यासाठी ही चाल खेळली गेली आहे. शुक्रवारी संध्याकाळी निर्णय दिला. शनिवार, रविवार आम्ही न्यायालयात जाऊ श्नर नाही याची काळजी घेण्यात अली. दोन दिवस त्यांना आनंद साजरा करू द्या. कोणत्या मुद्यावर हा निर्णय दिला याची माहिती व्हायलाय हवी. निवडणूक आयुक्तांनी आपल्या पदाचा गैरवापर केला आहे. गुलाम असेच वागणार, असा टोलाही खासदार अरविंद सावंत यांनी लगावला.

2 भागातली संचारबंदी काढली, 3 ठिकाणी शिथिलता; काय आहे नागपूरची स्थिती?
2 भागातली संचारबंदी काढली, 3 ठिकाणी शिथिलता; काय आहे नागपूरची स्थिती?.
लाडक्या बहिणींच्या पैशांवर अजित पवार स्पष्टच बोलेले
लाडक्या बहिणींच्या पैशांवर अजित पवार स्पष्टच बोलेले.
'सरड्यालाही लाज वाटेल इतका वेगानं रंग बदलला', परबांचा कायंदेंवर निशाणा
'सरड्यालाही लाज वाटेल इतका वेगानं रंग बदलला', परबांचा कायंदेंवर निशाणा.
'.. तर मग मात्र पंचाईत होईल'; सालियान प्रकरणावर उद्धव ठाकरेंचं विधान
'.. तर मग मात्र पंचाईत होईल'; सालियान प्रकरणावर उद्धव ठाकरेंचं विधान.
राज्यातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू,शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा
राज्यातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू,शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा.
औरंगजेबाच्या कबरीखाली आपणही मरावं... बच्चू कडू यांची सरकारवर नाराजी
औरंगजेबाच्या कबरीखाली आपणही मरावं... बच्चू कडू यांची सरकारवर नाराजी.
नागपूर राड्यात आणखी एक नाव समोर; कोण आहे सय्यद अली?
नागपूर राड्यात आणखी एक नाव समोर; कोण आहे सय्यद अली?.
8 जूनच्या रात्री कुठे अन् लोकेशन काय? राणेंचा आदित्य ठाकरेंना एकच सवाल
8 जूनच्या रात्री कुठे अन् लोकेशन काय? राणेंचा आदित्य ठाकरेंना एकच सवाल.
तुम्ही काय करणार आहे? स्वत:ला काय समजता तुम्ही? अंबादास दानवे भडकले
तुम्ही काय करणार आहे? स्वत:ला काय समजता तुम्ही? अंबादास दानवे भडकले.
'ओ अनिल परब..आम्हाला हलक्यात घेऊ नका'; चित्रा वाघ सभागृहात कडाडल्या
'ओ अनिल परब..आम्हाला हलक्यात घेऊ नका'; चित्रा वाघ सभागृहात कडाडल्या.