AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video – संजय राठोडचा राजीनामा घेतलात तर मग मलिकांचा का नाही? फडणवीसांचा ठाकरे सरकारवर तीव्र हल्ला

नबाव मलिक थेट जेलमध्ये आहेत. त्यामुळं नवाब मलिकांना वाचविण्याचं कारण काय, त्यांच्यामागे नेमके कोण आहेत. कोणाच्या दबावाखाली नवाब मलिक यांना वाचविलं जात आहे. हे प्रश्न आम्ही विचारणारच आहोत, असा घणाघास देवेंद्र फडणवीस यांनी केला.

Video - संजय राठोडचा राजीनामा घेतलात तर मग मलिकांचा का नाही? फडणवीसांचा ठाकरे सरकारवर तीव्र हल्ला
मुंबई येथील अधिवेशनात सभागृहाबाहेर बोलताना देवेंद्र फडणवीस.Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 03, 2022 | 1:00 PM

मुंबई : एखादा मंत्री जेलमध्ये आहे. तरीही त्यांचा राजीनामा घेतला जात नाही, अशाप्रकारची भयानक परिस्थिती महाराष्ट्रात तयार झाली आहे. मंत्र्यांवरील आरोप साधासुधा नाही. रिमांड आर्डरमध्ये ही केस कशी आहे, हे लिहिलं गेलं आहे. मुंबई बाँब स्फोटाच्या (Mumbai Bomb Blast) आरोपींकडून कवडीमोल भावात जमीन विकत घ्यायची. ती जमीन तिसऱ्याच व्यक्तीची जमीन मालकाला एक पैसा द्यायचा नाही. त्या जमिनीचा कब्जा मिळवून दिल्याबद्दल दाऊदची बहीण हसिना पारकर हिला पंचावन्न लाख रुपये द्यायचे. हे पैसे कुठे वापरले गेले, असा सवाल करत मुंबई बाँबस्फोटाकरिता हा पैसा वापरला गेला असल्याचा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. मुंबई येथे विधानसभेचे अधिवेशन ( Assembly Session) सुरू आहे.

मलिकांना वाचविण्याचे कारण काय

देवेंद्र फडणवीस म्हणाले, हे सगळ प्रकरण उघडकीस आलं. मंत्री जेलमध्ये गेले. तरीही हे सरकार त्यांच्या पाठीशी उभं राहत असेल, तर हे दाऊत समर्पित सरकार आहे. असंच आम्हाला म्हणावं लागेल. म्हणून नवाब मलिक यांचा राजीनामा झाला पाहिजे, अशी मागणी भाजपनं लावून धरली. संजय राठोड जेलमध्ये गेले नव्हते तरी तुम्ही नैतिकतेच्या आधारावर त्यांचा राजीनामा घेतला. इथं नबाव मलिक थेट जेलमध्ये आहेत. त्यामुळं नवाब मलिकांना वाचविण्याचं कारण काय, त्यांच्यामागे नेमके कोण आहेत. कोणाच्या दबावाखाली नवाब मलिक यांना वाचविलं जात आहे. हे प्रश्न आम्ही विचारणारच आहोत.

पाहा व्हिडीओ

सरकारला विचारला जाब

नवाब मलिकांबाबत आम्ही सरकारला जाब विचारला आहे. सरकार पड काढतंय. नवाब मलिक यांचा राजीनामा कुठल्याही परिस्थितीत झालाच पाहिजे. महाराष्ट्रात पहिल्यांदा असं होत आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला. राज्य सरकारवर तीव्र हल्ला चढविला.

राज्यपाल येताच शिवाजी महाराजांच्या वक्तव्यावर आमदारांची घोषणाबाजी

राज्यपाल कोश्यारींचे ते भाषण जे सभागृहात होऊ शकलं नाही, वाचा संपूर्ण भाषण जशास तसं

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाचा धक्का; मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल नाकारला

भारत - पाकिस्तान अटारी सीमेवरील दरवाजे पुन्हा उघडले
भारत - पाकिस्तान अटारी सीमेवरील दरवाजे पुन्हा उघडले.
LPG Gas : मे महिन्याच्या सुरुवातीलाच Good News... गॅस सिलिंडर स्वस्त
LPG Gas : मे महिन्याच्या सुरुवातीलाच Good News... गॅस सिलिंडर स्वस्त.
रायगडचं पालकमंत्रिपद गावगुंडाकडे नको, राऊतांचा नाव न घेता गोगावलेंना
रायगडचं पालकमंत्रिपद गावगुंडाकडे नको, राऊतांचा नाव न घेता गोगावलेंना.
चुन चुन के नंतर मारा,आधी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या; संजय राऊत बरसले
चुन चुन के नंतर मारा,आधी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या; संजय राऊत बरसले.
अखेर सत्य उघड! पहलगाम हल्ल्याचा कट पाकिस्तानचाच? एनआयएचा अहवाल तयार
अखेर सत्य उघड! पहलगाम हल्ल्याचा कट पाकिस्तानचाच? एनआयएचा अहवाल तयार.
हंडाभर पाण्यासाठी वणवण पायपीट; इगटपुरीत भीषण पाणी टंचाई
हंडाभर पाण्यासाठी वणवण पायपीट; इगटपुरीत भीषण पाणी टंचाई.
एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी
एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी.
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.