AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात कुणाला टोलमुक्ती? मनसेचं आंदोलन आणि फडणवीस यांचा दावा, काय खरं आणि काय खोटं?

मुंबई प्रवेशावर असलेल्या टोलदरवाढीवरुन मनसे आक्रमक झालीय. राज ठाकरे यांच्या सांगण्यानुसार मनसे नेते अविनाश जाधव यांनी उपोषण मागे घेतलं. मात्र, त्याच दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फाद्न्व्सी यांनी टोलबाबत केलेला एक दावाही चर्चेत आलाय.

राज्यात कुणाला टोलमुक्ती? मनसेचं आंदोलन आणि फडणवीस यांचा दावा, काय खरं आणि काय खोटं?
RAJ THACKAREY AND DEVENDRA FADNAVISImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Oct 08, 2023 | 11:10 PM

मुंबई : 8 ऑक्टोबर 2023 | मुंबई प्रवेशाच्या पाचही टोलनाक्यांवर दरवाढीच्या मुद्द्यावरुन मनसेनं सरकारवर टीका केलीय. मनसे नेते अविनाश जाधव दरवाढी विरोधात उपोषणाला बसले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपोषणस्थळी भेट दिली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. विशेष म्हणजे यावर बोलताना राज्याच्या कोणत्याही टोलनाक्यांवर खासगी चार चाकी वाहनांना टोल लागत नसल्याचा अजब दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय.

राज्यातल्या काही नाक्यांवर खासगी चारचाकी वाहनांना टोलमुक्ती आहे. मात्र. इतर अनेक टोलनाक्यांवर चारचाकी गाडीलाही टोल लागतो, हे वास्तव आहे. 2015 मध्ये फडणवीसांचे सरकार असताना काही टोल नाक्यांवर छोट्या वाहनांना टोलमुक्ती देण्यात आली आहे ही वस्तुस्थिती आहे. मात्र, ठराविक टोल नाक्यावर ही टोलमुक्ती आहे, राज्यात इतर टोलनाक्यावर सर्वच वाहनांकडून टोल वसूल केला जातो. त्यामुळे टोलवर केलेला खर्च आणि झालेली वसुली प्रशासनाने जाहीर केली पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी केलीय.

दहिसर टोल नाका, मुलुंडचा आनंद नगर टोल नाका, मुलुंड-ठाणे मार्गावरील टोलनाका, ठाणे- ऐरोली टोल नाका आणि सायन-पनवेल टोलनाका या पाचही टोलनाक्यांवर सरकारनं दरवाढ केलीय. मात्र, टोलच्या निमित्तानं मनसे पुन्हा सक्रीय झालीय. मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था, मराठी पाट्या, मराठी लोकांना नाकारली जाणारी घरं यानंतर मनसेनं पुन्हा एकदा टोलदरवाढीचा मुद्दा हाती घेतलाय.

हे सुद्धा वाचा

अविनाश जाधव यांच्या उपोषणानंतर राज ठकारे आक्रमक झालेत. अशा कारणामुळे माझा माणूस वाया जाऊ देणार नाही अशी टीका त्यांनी सरकारवर केलीय. एकनाथ शिंदे यांची टोलवरून जी याचिका दाखल केली होती. ती कुणाच्या सांगण्यावरून मागे घेतली असा थेट सवाल त्यांनी केलाय.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र राज्यात चार चाकी वाहनांकडून टोल घेतला जात नसल्याचं सांगितलं. यावरून सुप्रिया सुळे यांनी मलाही टोल भरावा लागतो, असा सांगत प्रशासकीय कारभारावर बोट ठेवलंय. टोलच्या संदर्भात शासनाची मानसिकता आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांची आणि शिंदे साहेबांची मानसिकता पाहिली तर टोलमुक्ती व्हावी या दिशेने आहे. परंतु सरकार चालवत असताना आणि रस्ते उभा करत असताना शेवटी आर्थिक गणित पण आहे.

मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?.
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा.
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा.
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी.
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा.
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?.
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?.
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा.
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे....
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे.....
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?.