खान्देशाच्या राजकारणात सर्वात मोठा भूकंप, जयकुमार रावल यांच्या ‘सावली’ने साथ सोडली, कामराज निकम शरद पवार गटात जाणार

खान्देशाच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. कारण माजी मंत्री तथा शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांचे अत्यंत निष्ठावान आणि उजवे हात समजले जाणारे कामराज निकम हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे कामराज निकम यांनी जयकुमार रावल यांच्या अतिशय गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे शिंदखेड्यात एकच खळबळ उडाली आहे.

खान्देशाच्या राजकारणात सर्वात मोठा भूकंप, जयकुमार रावल यांच्या 'सावली'ने साथ सोडली, कामराज निकम शरद पवार गटात जाणार
जयकुमार रावल यांच्या 'सावली'ने साथ सोडली, कामराज निकम शरद पवार गटात जाणार
Follow us
| Updated on: Jul 19, 2024 | 7:50 PM

मनेश मासोळे, Tv9 मराठी प्रतिनिधी, धुळे : खान्देशाच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. कारण माजी मंत्री तथा शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांचे कट्टर समर्थक कामराज निकम हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर आहेत, अशी माहिती समोर आली आहे. कामराज निकम हे गेल्या 20 वर्षांपासून जयकुमार रावल यांचे कट्टर समर्थक आहेत. ते रावल यांच्या पाठीमागे सावलीसारखे उभे राहिले आहेत. जयकुमार रावल यांच्या शिंदखेडा मतदारसंघात कामराज निकम यांचे मोठे काम आहे. तसेच या मतदारसंघात कामराज निकम यांचं नाव घेतलं म्हणजे जयकुमार रावल आणि जयकुमार रावल यांचं नाव घेतलं म्हणजे कामराज दादा, असं भावनिक समीकरण मतदारसंघांमधील कार्यकर्त आणि नागरिकांमध्ये आहे. पण जयकुमार रावल यांच्या अतिशय जवळचे मानले जाणारे कामराज निकम हे आता शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती मिळत आहे.

जिल्हा परिषदेवर भाजपची पहिल्यांदा सत्ता आल्यानंतर कामराज निकम यांच्या पत्नीकडे उपाध्यक्ष पदाची धुरा होती. कामराज निकम यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य आहेत. कामराज यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडे जाण्याच्या निर्णय घेतल्याने शिंदखेडा तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामराज निकम यांचा शरद पवार गटात होणारा प्रवेश हा भाजपला खान्देशातला सर्वात मोठा धक्का मानला जातोय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कामराज निकम यांचा उद्या पुणे येथे पक्षप्रवेश होणार आहे.

कामराज निकम यांचे जयकुमार रावल यांच्यावर गंभीर आरोप

कामराज निकम यांनी स्वत: आज पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली आहे. 32 वर्ष पक्षवर निष्ठा ठेवूनदेखील न्याय मिळत नाही, या भावनेतून आपण वेगळा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी त्यांनी जयकुमार रावल यांच्यावरही टीका केली. “20 वर्षांपासून जयकुमार रावल घोषणा करत आहेत. पण एक टक्कादेखील सिंचनाचं काम या तालुक्यात होऊ शकलं नाही. तालुक्यातील 100 गावांना प्यायला पाणी नाही. सलग 20 वर्ष तालुक्याचे नेतृत्व करून देखील 100 गावांना प्यायला पाणी नाही. हे जयकुमार रावल यांचं अपयश आहे”, असा आरोप कामराज निकम यांच्याकडून आमदार जयकुमार रावल यांच्यावर करण्यात आला आहे.

“आमदार जयकुमार रावल यांची मोठी दहशत आहे. ते स्वतःला राजा समजतात. मात्र राजासारखे वागत नाहीत. त्यांच्या स्वभावाला कंटाळून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपर्यंत संपूर्ण भाजप रिकामी होईल. त्यांनी अनेकांवर खोटे गुन्हे दाखल केले. येणाऱ्या काळात मी जर भाजपात गेलो तर मला आणि माझ्या मुलांना कायमस्वरूपी जेलमध्ये टाकणार अशी मला धमकी देण्यात आली आहे”, असा धक्कादायक आरोप कामराज निकम यांनी जयकुमार रावल यांच्यावर केला आहे. आमदार जयकुमार रावल यांचे अत्यंत निष्ठावान आणि उजवे हात समजले जाणारे कामराज निकम यांनीच जयकुमार रावल यांच्यावर असे गंभीर आरोप केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.