AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“कर्नाटकात संकट मोचकांचा फायदा झालेला नाही”; राष्ट्रवादीच्या नेत्याने गिरीश महाजन यांचं महत्व कमी केलं

कर्नाटकच्या निवडणुकीसाठी जळगाव जिल्ह्याचे नेते गिरीश महाजन गेले होते, भाजपमध्ये गिरीश महाजन यांना संकट मोचक असं म्हटलं जातं. मात्र आमचे संकट मोचक त्या ठिकाणी जाऊनही त्यांना भाजपच्या जागा टिकवता आल्या नाहीत असा खोचक टोलाही एकनाथ खडसे यांनी त्यांना लगावला आहे.

कर्नाटकात संकट मोचकांचा फायदा झालेला नाही; राष्ट्रवादीच्या नेत्याने गिरीश महाजन यांचं महत्व कमी केलं
Follow us
| Updated on: May 13, 2023 | 6:40 PM

जळगाव : कर्नाटकसारख्या राज्यात भाजपला जोरदार धक्का बसल्याने आता महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार जुंपली आहे. कर्नाटक राज्याच्या निवडणुका जाहिर झाल्यापासून काँग्रेस आणि भाजप असा सामना रंगला होता. त्यामुळे आता निकाल लागल्यानंतर आता जोरदार वाकयुद्ध रंगले आहे. या निकाला नंतर महाविकास आघाडीच्या नेत्यानी भाजपवर सडकून टीका करत प्रचारयंत्रणेपासून ते अगदी नेतृत्वापर्यंत त्यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपवर निशाणा साधताना त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांची खिल्ली उडवली आहे.

आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यातील राजकीय वाकयुद्ध राज्याला माहिती आहे. त्यामुळे कर्नाटकच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील पक्षांकडून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे.

त्यातच जळगावमधून भाजपवर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यानी भाजपच्या नेत्यांची त्यांच्या प्रचारावरून खिल्ली उडवली आहे.

एकनाथ खडसे म्हणाले की, कर्नाटकच्या निवडणुकीसाठी जळगाव जिल्ह्याचे नेते गिरीश महाजन गेले होते, भाजपमध्ये गिरीश महाजन यांना संकट मोचक असं म्हटलं जातं. मात्र आमचे संकट मोचक त्या ठिकाणी जाऊनही त्यांना भाजपच्या जागा टिकवता आल्या नाहीत असा खोचक टोलाही एकनाथ खडसे यांनी त्यांना लगावला आहे.

त्यामुळे कर्नाटकात संकट मोचकांचा फायदा झालेला नाही अशा शब्दात त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर जहरी टीका केली आहे.

कर्नाटकातील निवडणुकीच्या निकालावरून असं दिसून येतं की, महाराष्ट्रात जर आजही निवडणुका झाल्या तर मात्र भाजपला या ठिकाणी महाराष्ट्रात प्रतिसाद मिळणार नाही आणि विरोधी पक्षाचेच सरकार महाराष्ट्रात येईल हे 100 टक्के खरं आहे असा विश्वासही त्यांनी एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला आहे.

एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केल्यानंतर त्यांच्या टीकेला गिरीश महाजन यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. गिरीश महाजन यांनी त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना ते म्हणाले की, हे खरं आहे की कर्नाटक निवडणुकीसाठी मी गेलो होतो.

आणि त्यामुळेच 10 पैकी 5 जागा आम्हाला त्या ठिकाणी मिळाल्या आहेत. त्यामुळे विरोधकांनी 50 टक्केच विजय साजरा करावा असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

माझ्यावर टीका करण्यापेक्षा एकनाथ खडसे यांनी आधी तुम्ही मुक्ताईनगर पुरते बघा एक मार्केट कमिटी तुम्ही जिंकली तर तुम्ही पोकलँडवरुन मिरवणूक काढता, एक मुख्यमंत्र्याच्या लेव्हलचा माणूस एक मार्केट कमिटी जिंकली आणि पोकलँडवर चढून नाचून राहिला असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

या सर्व राजकारणावरून असं वाटत आहे की, एकनाथ खडसे यांचे आता जिल्ह्यात फारसं महत्व राहिलेलं नाही अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

एक मार्केट कमिटी घेतली तर त्यांना असं वाटते की पुरा महाराष्ट्रात जिंकला. त्यामुळे एकनाथ खडसे तुम्ही तब्बेतीला मानवेल तेवढचं करा असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग
ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग.
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?.
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं.
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही.
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल.
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं.
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात.
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं.
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल.
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा.