Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगावात अवकाळी पावसाची हजेरी; रब्बी पिकांचे नुकसान, शेतकरी पुन्हा संकटात

गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या वातावरणात बदल झाला असून, बदलत्या वातावरणामुळे राज्यातील अनेक भागात पावसाने (rain) हजेरी लावली आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील चाळीसगावमध्ये देखील काल मध्यरात्रीपासून विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.

जळगावात अवकाळी पावसाची हजेरी; रब्बी पिकांचे नुकसान, शेतकरी पुन्हा संकटात
महाराष्ट्रात पावसाचा मुक्काम वाढणारImage Credit source: TV 9
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 9:00 AM

जळगाव : गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या वातावरणात बदल झाला असून, बदलत्या वातावरणामुळे राज्यातील अनेक भागात पावसाने (rain) हजेरी लावली आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील चाळीसगावमध्ये देखील काल मध्यरात्रीपासून विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. या अवकाळी पावसामुळे (Untimely rain) शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन पिक काढणीच्या हंगामात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. या पावसाचा कांदा, मक्का, बाजरी, ज्वारी, गहू, हरभरा या सारख्या पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला असून, नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. अवकाळी पावसामुळे शहरात देखील अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे पहायला मिळाले. अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान झाले होते, आता अवकाळी पावसामुळे रब्बी पीक संकटात सापडले आहे.

शेतकरी संकटात

गेले वर्षभर शेतकऱ्यांच्या मागील संकटाची मालिका कायम आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीचा मोठा फटका सोयाबीन, बाजरी, कापूस यासारख्या खरीप हंगामातील पिकांना बसला होता. अतिवृष्टीमुळे पिके नष्ट झाली होती. या परिस्थितीतून सावरत शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी शेतात पेरणी केली. पिकांना वाढवले मात्र, आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला आहे. या अवकळी पावसाचा मोठा फटका हा गहू, उन्हाळी बाजरी, कांदा, हरभारा या सारख्या पिकांना बसला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

 वेधशाळेने वर्तवला होता अंदाज

संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मध्य महाराष्ट्रात काल आणि आज गारपिटीची शक्यता असल्याचं देखील सांगण्यात आलं होतं. मध्य भारतात पुर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा संगम होणार आहे त्यामुळे महाराष्ट्र, राजस्थान,गुजरात,पश्चिम मध्य प्रदेश या ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आलाय. महाराष्ट्रात ताशी 40 कि.मी वेगानं वारं वाहण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार आजही अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असेल. तसेच अनेक ठिकाणी पावसाची शक्यता देखील आहे.

संबंधित बातम्या

VIDEO | सब कहते है तुने मेरा दिल ले लिया, दत्तामामांच्या पत्नीचा गाण्यावर ठेका

मुख्यमंत्री साहेब आता शेती परवडत नाही, वाईन विक्रीची परवानगी द्या; भंडाऱ्याच्या शेतकऱ्याचे उद्धव ठाकरेंना पत्र

वारंवार हॉर्न वाजवणाऱ्या महिलेला मधलं बोट दाखवलं, पुण्यात इंजिनिअरला बेदम मारहाण

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.