AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणुकीनंतर राजकीय समीकरणात बदल, मनसे आणि ठाकरे गटाचे दोन्ही माजी आमदार एकत्र, कारण…

राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले, मात्र अनेकांनी या निकालानंतर ईव्हीएमववर आक्षेप घेतला. त्यातच आता कल्याण ग्रामीण विधानसभा मतदान क्षेत्रात दोन माजी आमदारांनी पुन्हा मतमोजणीसाठी अर्ज केला आहे.

निवडणुकीनंतर राजकीय समीकरणात बदल, मनसे आणि ठाकरे गटाचे दोन्ही माजी आमदार एकत्र, कारण...
Follow us
| Updated on: Dec 01, 2024 | 9:47 AM

Kalyan Rural Assembly Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर 8 दिवस उलटले तरी सरकार स्थापन झालेले नाही. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले, मात्र अनेकांनी या निकालानंतर ईव्हीएमववर आक्षेप घेतला. त्यातच आता कल्याण ग्रामीण विधानसभा मतदान क्षेत्रात दोन माजी आमदारांनी पुन्हा मतमोजणीसाठी अर्ज केला आहे. तसेच मनसेचे राजू पाटील यांनीही पुन्हा मतमोजणीसाठी अर्ज केला आहे. त्यामुळे आता निवडणुकीनंतर मनसे आणि ठाकरे गटाचे दोन्ही माजी आमदार एकत्र आल्याने राजकीय समीकरण बदलणार का, अशी चर्चा रंगली आहे.

व्हीव्हीपॅट यंत्रातील मते पुन्हा मोजण्याची मागणी

कल्याण ग्रामीणमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सध्या या निकालाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. दोन माजी आमदार, मनसेचे राजू पाटील आणि ठाकरे गटाचे सुभाष भोईर यांनी पुन्हा मतमोजणीसाठी अर्ज दाखल केला आहे. शिंदे गटाचे राजेश मोरे यांचा या निवडणुकीत विजय झाला. या धक्कादायक विजयामुळे मतदारसंघातील निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. व्हीव्हीपॅट यंत्रातील मते पुन्हा मोजण्याची मागणी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पुढील राजकीय समीकरणे कशी बदलतील, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

राजकीय वर्तुळात खळबळ

कल्याण ग्रामीण मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. शिंदे गटाचे उमेदवार राजेश मोरे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. मात्र, ठाकरे गटाचे सुभाष भोईर आणि मनसेचे राजू पाटील यांनी या निकालाला आव्हान दिले आहे. या मतमोजणी प्रक्रियेवर संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, दोन्ही माजी आमदारांनी एकत्र येऊन ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे व्हीव्हीपॅट यंत्रातील मते पुन्हा मोजण्यासाठी अर्ज केला आहे. राजू पाटील यांनी 22 तर सुभाष भोईर यांनी 5 व्हीव्हीपॅट यंत्रांची मते मोजण्याची मागणी केली आहे. या प्रक्रियेसाठी लागणारा खर्चही त्यांनी भरला आहे.

निकालावरून वाढले प्रश्न

कल्याण ग्रामीणमध्ये ठाकरे गट आणि मनसे यांच्यात जोरदार लढत होईल, असे भाकीत वर्तवण्यात येत होते. मात्र, राजेश मोरे यांनी बाजी मारल्याने अनेक मतदार आणि राजकीय तज्ज्ञ चकित झाले. यावरून सोशल मीडियासह इतर व्यासपीठांवर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रणेबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत.

गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग.
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी.
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?.
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन.
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद.
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना.
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत...
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत....
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?.
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी.
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर.