ठाणे, कल्याणचे तारणहार उमेदवार देऊ शकले नाही, संजय राऊत यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चिमटा

Sanjay Raut: कोणाला उमेदवारी साठी पक्ष सोडायचा असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. मुंबईमध्ये शिवसेना आणि महाविकास आघाडी समोर कोणताही बंडखोर, गद्दार टिकणार नाही. मुंबईच्या सर्व सहाच्या सहा जागा महाविकास आघाडी जिंकणार आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी कोणी दुसऱ्या पक्षात जात असेल तर आम्हाला त्याचं आव्हान अजिबात वाटत नाही.

ठाणे, कल्याणचे तारणहार उमेदवार देऊ शकले नाही, संजय राऊत यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चिमटा
संजय राऊत यांचे विधान चर्चेत
Follow us
| Updated on: Apr 04, 2024 | 11:20 AM

महायुतीमध्ये अजूनही सर्व जागांवर उमेदवारी जाहीर झालेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्राबल्य असलेल्या ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदार संघाचे चित्र स्पष्ट झाले नाही. त्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना घेरले आहे. कल्याण -डोंबिवलीमध्ये अहंकार, गद्दारी आणि पैशांची मस्ती चालणार नाही, आम्ही तुमचा पराभव करू, असे आव्हान संजय राऊत यांनी महायुतीला दिले आहे. तसेच ठाणे शहराचे तारणहार उमेदवार देऊ शकले नाही, असा टोला त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.

अद्याप तुम्ही स्वतःची उमेदवारी नाही

आधी तुमची उमेदवारी जाहीर करा, कल्याण डोंबिवलीमध्ये आपण विद्यमान खासदार आहात. जी खासदारकी तुम्हाला उद्धव ठाकरे यांच्यामुळे मिळाली आहे, अद्याप तुम्ही स्वतःची उमेदवारी जाहीर करू शकला नाही. जिंकण्याची भाषा करता बच्चम जी…दिल्ली अभी दूर है… आता तुम्ही दिल्लीत पोहोचणार नाही. आमची सामान्य कार्यकर्ता वैशाली दरेकर तिथे अहंकार आणि गद्दारीचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

आगे आगे देखो होता है क्या…

ज्यांची उमेदवारी कापण्यात आली, त्यांना प्रश्न विचारा. नाशिक, रामटेक, हिंगोली, यवतमाळ, वाशिम अजून ठाणे ,कल्याण -डोंबिवलीमध्ये उमेदवार देऊ शकले नाही, जे मुख्यमंत्री स्वतःला ठाण्याचे तारणहार म्हणतात ते आपल्या भागाचे उमेदवार अद्याप जाहीर करू शकले नाही. स्वतः मुख्यमंत्री भाजपच्या दहशतीखाली आहेत. म्हणून ते अचानक कुठेतरी अदृश्य होतात, आगे आगे देखो होता है क्या…असे चिमचे संजय राऊत यांनी महायुतीवर काढले.

हे सुद्धा वाचा

कोणाला उमेदवारी साठी पक्ष सोडायचा असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. मुंबईमध्ये शिवसेना आणि महाविकास आघाडी समोर कोणताही बंडखोर, गद्दार टिकणार नाही. मुंबईच्या सर्व सहाच्या सहा जागा महाविकास आघाडी जिंकणार आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी कोणी दुसऱ्या पक्षात जात असेल तर आम्हाला त्याचं आव्हान अजिबात वाटत नाही. संजय निरुपमसंदर्भात निर्णय हा काँग्रेस पक्षाचा निर्णय आहे. काँग्रेस पक्षाने जो निर्णय घेतलेला आहे त्यावर इतर पक्षाने बोलणं उचित नाही. पक्षाविरोधात जर कोणी वेगळी भूमिका घेतली तर प्रत्येक पक्षाकडून अशा प्रकारची कारवाई केली जाते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.