Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त मिळाला… शिंदे-फडणवीस सरकारचा फॉर्म्युला काय? 50-50 की 40-60?

दुसऱ्या टप्प्यात शिंदे गटाचे 10 तर भाजप पक्षाचे 13 जण मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात.

मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त मिळाला... शिंदे-फडणवीस सरकारचा फॉर्म्युला काय? 50-50 की 40-60?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Dec 01, 2022 | 9:05 AM

मुंबईः राज्यातील (Maharashtra Govt) दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराची (Cabinet Expansion) तारीख जवळपास निश्चित झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. येत्या 12 आणि 13 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. पहिल्या टप्प्यात शिंदे-भाजप (Shinde BJP) युतीतील 18 मंत्र्यांना शपथ देण्यात आली होती. आता दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात 23 मंत्र्यांना शपथ दिली जाणार असल्याचं म्हटलं जातंय.

राज्य सरकारकडून यासंबंधीची अधिकृत घोषणा लवकरच होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मागील मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी न लागलेल्या महत्त्वाच्या आमदारांची नाराजी यावेळी दूर होण्याची शक्यता आहे.

फॉर्म्युला काय?

एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये महायुती झाल्यानंतर कुणाच्या वाट्याला किती मंत्रिपदं येणार, याचा फॉर्म्युलाही निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजप-शिंदे 60-40 टक्के या फॉर्म्युल्याने मंत्रिपदांचे वाटप होणार आहे, यावर दोन्ही पक्षांचे एकमत झाल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. तर दुसऱ्या50-50 या फॉर्म्युल्यानेही मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे सांगणाराही एक वर्ग आहे. नेमक्या कोणत्या फॉर्म्युल्याने यंदाचा कॅबिनेट विस्तार होईल, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

याच फॉर्म्युल्यावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा-लोकसभेच्या निवडणुकाही होणार का, यावरही महायुतीची गणितं अवलंबून आहेत..

नाराजांचं समाधान होणार?

पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार9 ऑगस्ट रोजी झाला होता. त्यावेळी 18 जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली होती. मात्र यात आमदार संजय शिरसाट, बच्चू कडू, भरत गोगावले नाराज झाले होते. आता दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात या आमदारांची नाराजी दूर केली जाण्याची शक्यता आहे.

यांच्यासह मंजुळा गावित, सदा सरवणकर, प्रकाश आबिटकर, बालाजी किणीकर, प्रताप सरनाईक, योगेश कदम आदींच्या नावाचीही चर्चा आहे.

शिंदे गटाचे 10 तर भाजप पक्षाचे 13 जण मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. भाजपकडून संजय कुटे, नितेश राणे आणि रवी राणा या तिघांची नावं मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत.

'वडिलांचं कर्तृत्व नसेल तर पराभव...', सरवणकरांचा अमित ठाकरेंना टोला
'वडिलांचं कर्तृत्व नसेल तर पराभव...', सरवणकरांचा अमित ठाकरेंना टोला.
बीडच्या सगळ्या गँगला आता सुतासारखं सरळ करणार; अजितदादांचा इशारा
बीडच्या सगळ्या गँगला आता सुतासारखं सरळ करणार; अजितदादांचा इशारा.
दादांनी महिला कार्यकर्त्याला झापलं, दादा बीडमध्ये बघा काय-काय घडलं?
दादांनी महिला कार्यकर्त्याला झापलं, दादा बीडमध्ये बघा काय-काय घडलं?.
वक्फ बोर्डाला धर्मनिरपेक्ष बनवायचे आहे - संसदीय मंत्री किरेन रिजिजू
वक्फ बोर्डाला धर्मनिरपेक्ष बनवायचे आहे - संसदीय मंत्री किरेन रिजिजू.
गंगाजल शुद्धच पण.., शिवसेनेकडून सेनाभवनासमोर बॅनरबाजी अन् मनसेला डिवचल
गंगाजल शुद्धच पण.., शिवसेनेकडून सेनाभवनासमोर बॅनरबाजी अन् मनसेला डिवचल.
लाडक्या बहिणींना 2100 मिळणार की नाही? दादांच्या सूचक वक्तव्याची चर्चा
लाडक्या बहिणींना 2100 मिळणार की नाही? दादांच्या सूचक वक्तव्याची चर्चा.
वक्फ बोर्ड विधेयकावर जलील यांनी व्यक्त केल्या भावना
वक्फ बोर्ड विधेयकावर जलील यांनी व्यक्त केल्या भावना.
मला टोप्या नका घालू, नुसता प्रेमाचा नमस्कार.., दादांचं मिश्कील वक्तव्य
मला टोप्या नका घालू, नुसता प्रेमाचा नमस्कार.., दादांचं मिश्कील वक्तव्य.
"औरंगजेब इथं गाडलाय...", राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर मनसेकडून बॅनरबाजी
चंद्राबाबू नायडूंचा वक्फ बोर्डाला पाठिंबा, पण घातली ही मोठी अट
चंद्राबाबू नायडूंचा वक्फ बोर्डाला पाठिंबा, पण घातली ही मोठी अट.