Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार का? राज्याचे संयमी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मोठं विधान

राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू होईल की काय? अशी भीती सर्वसामान्य जनतेला सतावतेय (Rajesh Tope on Lockdown).

राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार का? राज्याचे संयमी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मोठं विधान
Follow us
| Updated on: Mar 15, 2021 | 3:37 PM

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात काल (14 मार्च) तब्बल 16 हजार 620 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. बाधितांचा आकडा वाढू लागल्याने अनेक शहरांमध्ये निर्बंध घालण्यात आले आहेत. तरीही कोरोना रुग्णांचा आकडा दररोज वाढतोय. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू होईल की काय? अशी भीती सर्वसामान्य जनतेला सतावतेय. दरम्यान, राज्यात खरंच लॉकडाऊन लागू होईल का? या प्रश्नाचं उत्तर आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे (Rajesh Tope on Lockdown).

लॉकडाऊनबाबत आरोग्यमंत्री काय म्हणाले?

“टॅकिंग, ट्रेसिंग, टेस्टिंग या तीन सूत्रांवर काम करतोय. सर्व सामाजिक, शासकीय कामांना निर्बंध घातले आहेत. काही ठिकाणी नाईट कर्फ्यू , लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन हा काही पर्याय नाही. आम्ही लॉकडाऊन करणार नाही. मुंबई आणि राज्यात लॉकडाऊन लावण्याचे कारण नाही. पण शिस्त लावण्यासाठी कठोर निर्बंध लावणार”, अशी भूमिका राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे (Rajesh Tope on Lockdown).

‘राज्यात 30 लाख लोकांना लसी दिल्या’

“कोरोना रूग्ण संख्या वाढतेय. संसर्ग वाढतोय, ही वाढ मागच्या तुलनेत कमी आहे. मृत्यूदर कमी होतोय, संसर्ग मात्र वाढतोय. सध्या रूग्णालयात बेड उपलब्ध आहे. लसीकरणाच प्रमाण वाढविण्याची गरज आहे. आतापर्यंत 30 लाख लोकांपर्यंत लसीकरण झाले आहे”, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

वृद्धांनी लस घ्या, आरोग्यमंत्र्यांचं आवाहन

“लसीचा पुरवठा व्यवस्थित होतोय. राज्यात रोज सव्वा लाख लोकांना लस दिली जात आहे. खासगी रूग्णालयात लसीकरण मोठ्या प्रमाणात करण्याचे आदेश दिले आहेत. 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटाच्या नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावं. कारण त्यांना जर कोरोना झाला तर त्यांची तब्येत गंभीर होण्याची शक्यता असते. त्यामुळे लवकरात लवकर या वयोगटातील लोकांनी लसीकरण करून घ्यावे”, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं.

हेही वाचा : पोलीस आयुक्त बदलणार की गृहमंत्री?; वाझेप्रकरणी मोठ्या घडामोडींची शक्यता बळावली

करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल.
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?.
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, 31 तारखेला मुंबईत थर्ड डिग्री?
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, 31 तारखेला मुंबईत थर्ड डिग्री?.
वडिलांचं अफेअर अन्.., दिशाच्या मृत्यूचं कारण समोर; क्लोजर रिपोर्ट काय?
वडिलांचं अफेअर अन्.., दिशाच्या मृत्यूचं कारण समोर; क्लोजर रिपोर्ट काय?.
देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, कोण आहे सुग्रीव कराड?
देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, कोण आहे सुग्रीव कराड?.