Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“रामदास कदम गडी केवडा आणि ओरडतो केवढा”; ठाकरे गटाच्या नेत्यानं रामदास कदम यांची उडवली खिल्ली

शिंदे गटावर टीका करताना ते म्हणाले की, शिंदे गटातील गद्दार आमदारांनीच शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले असल्याची टीका त्यांच्यावर करणअयात आली.

रामदास कदम गडी केवडा आणि ओरडतो केवढा; ठाकरे गटाच्या नेत्यानं रामदास कदम यांची उडवली खिल्ली
Follow us
| Updated on: Jan 16, 2023 | 10:08 PM

रत्नागिरीः मला आणि माझ्या मुलाला संपवलं असं विधान रामदास कदम वारंवार करत असतात मात्र तुम्हाला कोण संपवतो असा थेट सवाल ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे.दापोली केळशीतील सभेवेळी भास्कर जाधव यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. या सभेत बोलताना रामदास कदम गडी केवढा आणि ओरडतो केवढा असा टोला लगावत त्यांची खिल्ली उवडवण्यात आली.

ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी आज रामदास कदम यांच्यासह त्यांचा मुलावरही जोरदार हल्लाबोल केला. रामदास कदम यांची जीभ काळी आहे तर योगेश कदम यांच्या हातात काळा दोरा असल्याची टीका करत पिता पुत्रांची खिल्ली उडवली आहे.

भास्कर जाधव यांनी शिंदे गटावर टीका करताना कोरोना काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामाचा गौरवही केला.

तर यावेळी भाजपवरही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. एकीकडे कोरोना काळात राज्य संकटात असताना भाजप मात्र त्यावेळचे ठाकरे सरकार पडणार असल्याची वक्तव्य तासा तासाला केली जात होती.

संकटकाळात विरोधक सत्ताधाऱ्यांबरोबर खांद्याला खांदा लावून काम करत असतात तर आपल्या राज्यात मात्र संकटकाळात सरकार अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजप करत होते अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर शिंदे गटावर ठाकरे गटाकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे. त्यावरूनच आजही आमदार भास्करराव जाधव यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर निशाणा साधला.

शिंदे गटावर टीका करताना ते म्हणाले की, शिंदे गटातील गद्दार आमदारांनीच शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले असल्याची टीका त्यांच्यावर करणअयात आली.

1966 पासून शिवसेना पक्षाचं धनुष्यबाण चिन्ह देव्हाऱ्यात पुजले जात होते, मात्र 40 गद्दार शिवसेना सोडून गेले तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यात पाणी आले होते अशी भाविनक गोष्टही त्यांनी सांगितली.

उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेले खरे शिवसैनिक नाहीत तर गेलेले सर्व गद्दार आहेत. हे सांगण्यासाठीच मतदार संघात आलो आहे असंही भास्कर जाधव यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.

हींजवडी टेम्पो ट्रॅव्हल आग प्रकरण अपघात नाही घातपात
हींजवडी टेम्पो ट्रॅव्हल आग प्रकरण अपघात नाही घातपात.
नागपूर हिंसाचाराच्या आधी काय प्लॅनिंग झालं? सीसीटीव्ही फुटेज आलं समोर
नागपूर हिंसाचाराच्या आधी काय प्लॅनिंग झालं? सीसीटीव्ही फुटेज आलं समोर.
2 भागातली संचारबंदी काढली, 3 ठिकाणी शिथिलता; काय आहे नागपूरची स्थिती?
2 भागातली संचारबंदी काढली, 3 ठिकाणी शिथिलता; काय आहे नागपूरची स्थिती?.
लाडक्या बहिणींच्या पैशांवर अजित पवार स्पष्टच बोलेले
लाडक्या बहिणींच्या पैशांवर अजित पवार स्पष्टच बोलेले.
'सरड्यालाही लाज वाटेल इतका वेगानं रंग बदलला', परबांचा कायंदेंवर निशाणा
'सरड्यालाही लाज वाटेल इतका वेगानं रंग बदलला', परबांचा कायंदेंवर निशाणा.
'.. तर मग मात्र पंचाईत होईल'; सालियान प्रकरणावर उद्धव ठाकरेंचं विधान
'.. तर मग मात्र पंचाईत होईल'; सालियान प्रकरणावर उद्धव ठाकरेंचं विधान.
राज्यातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू,शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा
राज्यातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू,शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा.
औरंगजेबाच्या कबरीखाली आपणही मरावं... बच्चू कडू यांची सरकारवर नाराजी
औरंगजेबाच्या कबरीखाली आपणही मरावं... बच्चू कडू यांची सरकारवर नाराजी.
नागपूर राड्यात आणखी एक नाव समोर; कोण आहे सय्यद अली?
नागपूर राड्यात आणखी एक नाव समोर; कोण आहे सय्यद अली?.
8 जूनच्या रात्री कुठे अन् लोकेशन काय? राणेंचा आदित्य ठाकरेंना एकच सवाल
8 जूनच्या रात्री कुठे अन् लोकेशन काय? राणेंचा आदित्य ठाकरेंना एकच सवाल.