Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चार-पाच तास वाहतूक कोंडी, प्रवासी हैराण, पोलीसही हतबल, अखेर मनसे आमदाराकडून पुढाकार

कल्याण शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी मनसेचे आमदार राजू पाटील हे स्वत:हून रस्त्यावर उतरले आहेत (MNS MLA Raju Patil working for Kalyan Shil road traffic).

चार-पाच तास वाहतूक कोंडी, प्रवासी हैराण, पोलीसही हतबल, अखेर मनसे आमदाराकडून पुढाकार
Follow us
| Updated on: Oct 28, 2020 | 8:43 PM

ठाणे : कल्याण शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मनसेने ‘इच्छा तिथे मार्ग’ हे घोषवाक्य घेत आजपासून (28 ऑक्टोबर) ‘वाहतूक सौजन्य सप्ताह’ सुरु केला आहे. या आठवड्याभरात मनसेने नेमलेले 30 वॉर्डन कल्याण शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचे काम पार पाडणार आहेत. सत्ताधाऱ्यांकडून काही उपाययोजना केली जात नसल्याने मनसेने ‘इच्छा तिथे मार्ग’ हे घोषवाक्य घेऊन वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेतला आहे (MNS MLA Raju Patil working for Kalyan Shil road traffic).

कल्याण शीळ रस्त्यावर वाहतूक कोंडीमुळे प्रवासी चार ते पाच तास अडकून राहतात. रेल्वे सेवा बंद असल्याने रस्ते वाहतुकीवर मोठा ताण आला आहे. अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली या भागातून हजारो चाकरमानी ठाणे, नवी मुंबई, मुंबईला कामाला जातात. त्यांचा जास्त वेळ हा शीळ रस्त्यावर वाहतूक कोंडीतच जातो.

कल्याण शीळ रस्त्याचे सहा पदरी काँक्रिटीकरण सुरु आहे. या कामाच्या कंत्राटदाराकडून सुरक्षिततेचे योग्य नियम पाळले जात नाहीत. त्याचा प्रवासी आणि वाहन चालकांना मोठा फटका बसत आहे (MNS MLA Raju Patil working for Kalyan Shil road traffic).

कल्याण शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी मनसेचे आमदार राजू पाटील हे स्वत:हून रस्त्यावर उतरले होते. त्यांनी वाहतूक कोंडी प्रकरणी वाहतूक पोलिसांना चांगले फैलावर घेतले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्या मनुष्यबळ कमी आहे, वॉर्डनची संख्या कमी आहे, मागणी करुन ही वॉर्डन मिळत नाही, अशी अडचण पोलिसांनी सांगितली होती.

कल्याण शीळ रस्त्यावर अवजड वाहनांना पोलीस वाहन चालकाकडून पैसे घेऊन सोडतात. त्यामुळेही वाहतूक कोंडीत भर पडते. या घटनेचा पर्दापाश करण्यासाठी मनसेने एका गाडीचा पाठलाग करुन चालकाकडून हे सत्य वदवून घेतले होते. त्याचा व्हिडीओ मनसेने सोशल मीडियावर व्हायरल केला होता.

पोलिसांकडे मनुष्यबळाची कमतरता पाहता मनसेने वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मनसेचे या रस्त्यावर आजपासून ‘वाहतूक सौजन्य सप्ताह’ सुरु केला आहे. या सप्ताहात मनसेच्यावतीने 30 वॉर्डन शीळ ते पलावा दरम्यान वाहतूक सुरळीत करण्याचे काम करतील. हे वॉर्डन सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत वाहतूक सुरळीत करण्याचे काम करणार असल्याचे मनसेचे पदाधिकारी चिन्मय मडके यांनी सांगितलं.

संबंधित बातमी : कल्याण-शीळ फाट्यावर 6-6 तास कोंडी, दोन दिवसात ट्रॅफिक सुरळीत करा, मनसेचा अल्टिमेटम

त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
'ते डबडं कुठं पुरून ठेवलंय...', औरंगजेब कबरीवरून जरांगेंची CM वर टीका
'ते डबडं कुठं पुरून ठेवलंय...', औरंगजेब कबरीवरून जरांगेंची CM वर टीका.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?.
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे....
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे.....
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?.
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच.
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा.