Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navneet Rana: राणा दाम्पत्यांना दिलासा नाहीच, 29 एप्रिलला सुनावणी; तोपर्यंत कोठडीतच मुक्काम

Navneet Rana: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना आजही दिलासा मिळाला नाही.

Navneet Rana: राणा दाम्पत्यांना दिलासा नाहीच, 29 एप्रिलला सुनावणी; तोपर्यंत कोठडीतच मुक्काम
नवनीत राणा, रवी राणा यांना बेल की पुन्हा जेल?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 12:09 PM

मुंबई: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (ravi rana) यांना आजही दिलासा मिळाला नाही. राणा दाम्पत्यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी करण्यास सत्रं न्यायालयाने नकार दिला. येत्या 29 तारखेला खार पोलिसांनी दाम्पत्यांच्या आरोपावर सविस्तर निवेदन सादर करण्याचे आदेश देत सत्र न्यायालयाने पुढील सुनावणी 29 एप्रिल रोजी ठेवली आहे. त्यामुळे राणा दाम्पत्यांना येत्या 29 एप्रिलपर्यंत कोठडीत राहावं लागणार आहे. येत्या 29 एप्रिल रोजी राणा दाम्पत्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार असल्याने त्यांना जामीन मिळतो का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांचा एकेरी उल्लेख करत अपशब्द वापरल्याबद्दल आणि दोन समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य केल्याबद्दल राणा दाम्पत्यांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर वांद्रे न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

नवनीत राणा आणि रवी राणा यांना वांद्रे कोर्टाने 14 दिवसांची कोठडी सुनावल्यानंतर राणा यांचे वकील रिजवान मर्चंट यांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली. राणा यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी करण्याची मागणी रिजवान मर्चंट यांनी केली. त्याला सरकारी वकील प्रदीप घरत यांनी विरोध केला. वांद्रे कोर्टात जामिनासाठी अर्ज केलेला असताना पुन्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्याची गरज काय? असा सवाल करत माझा या सुनावणीला विरोध आहे, असं प्रदीप घरत यांनी कोर्टाला सांगितलं. त्यानंतर कोर्टाने पोलिसांना येत्या 29 तारखेपर्यंत आपलं म्हणणं सविस्तर मांडण्याचे आदेश दिले.

सत्र न्यायालयात जामिनासाठी धाव

या आधी वांद्रे कोर्टाने सरकारी वकील आणि खार पोलिसांना येत्या 27 एप्रिलपर्यंत आपलं म्हणणं मांडण्यास सांगून या प्रकरणावर 29 तारखेला सुनावणी ठेवली होती. मात्र, राणा दाम्पत्याने आज सत्र न्यायालयात धाव घेऊन जामिनासाठी अर्ज केला. परंतु, कोर्टाने खार पोलिसांना 29 तारखेपर्यंत आपलं लेखी म्हणणं मांडण्यास सांगून 29 तारखेला प्रकरणावर सुनावणी ठेवली. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.