Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊतांना घरचा आहेर, शिवसेनेचे भास्कर जाधव म्हणतात, राज ठाकरेंच्या भाषणाची खिल्ली नको, भाषण प्रगल्भतेनं घ्या, महाविकास आघाडीला काय केलं आवाहन?

परिपक्व राजकीय भाषण म्हणून या भाषणाकडे पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. भास्कर जाधव यांनी राज ठाकरेंच्या भाषणाबाबत दिलेली ही प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात आता चर्चेचा विषय ठरते आहे.

संजय राऊतांना घरचा आहेर, शिवसेनेचे भास्कर जाधव म्हणतात, राज ठाकरेंच्या भाषणाची खिल्ली नको, भाषण प्रगल्भतेनं घ्या, महाविकास आघाडीला काय केलं आवाहन?
bhaskar jadhav on raj thackeray speechImage Credit source: social media
Follow us
| Updated on: May 23, 2022 | 2:38 PM

रत्नागिरीराज ठाकरे यांच्या पुण्यातल्या भाषणाची खि्लली उडवू नका, त्यांना हिणवू नका, त्यांचं भाषण गांभिर्याने घ्या, असं आवाहन केलंय चक्क शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी. हे भाषण राजकीयदृष्ट्या प्रगल्भतेचे आणि वैचारिक पद्धतीचे होते, या शब्दांत त्यांनी राज ठाकरेंच्या भाषणाचे कौतुक केले आहे. सगळ्यांनीच या भाषणात राज ठाकरे यांनी उपस्थित केलेले मुद्दे हे गांभिर्याने घेण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी मांडले. त्यांच्या भाषणाचा विषय हा कुणी चेष्ठेचे करु नका असं आवाहनही महाविकास आघाडीतील नेत्यांना भास्कर जाधव यांनी केलं आहे. परिपक्व राजकीय भाषण म्हणून या भाषणाकडे पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. भास्कर जाधव यांनी राज ठाकरेंच्या भाषणाबाबत दिलेली ही प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात आता चर्चेचा विषय ठरते आहे. भास्कर जाधव यांनी अशी भूमिका का मांडली, हाही विषय महत्त्वाचा मानला जातो आहे. या मागे खरोखरच विचार पटला ही भूमिका आहे की यामागे काही राजकीय गणिते आहेत, याचा अर्थ आता राजकीय जाणकार मंडळी लावत आहेत.

राज ठाकरेंनी भाषणात काल काय मांडले

राज ठाकरेंनी पुण्यात केलेल्या भाषणात अयोध्या दौऱ्यावरुन त्यांच्याविरोधात कसा ट्रॅप लावण्यात आला, आणि त्यानंतर अयोध्या दौरा का स्थगित केला, याची सविस्तर मांडणी केली. यामागे अनेक पापुद्रे असल्याचेही त्यांनी सांगितले. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा उल्लेख करत, त्यांनी यात अप्रत्यक्षपणे भाजपाकडेही बोट केले. राणा दाम्पत्याच्या हनुमान चालिसा आंदोलनाचा उल्लेख करत मातोश्री ही काय मशीद आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. राज्यात समान नागरी कायदा लागू करावा, औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे करावे, अशी मागणी पंतप्रधानांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. मशिदीवरील भोंग्याच्या आंदोलनाला आलेले यश, आधीच्या आंदोलनांचे यशही त्यांनी यानिमित्ताने सांगितले. यापुढेही भोंग्याचे आंदोलन सुरुच राहील असे त्यांनी म्हटले आहे. राज्यात औरंगजेबाच्या कबरीवर ओवेसी नतमस्तक होतो आणि महाराष्ट्र शांत राहतो, याबाबत त्यांनी खेदही व्यक्त केला होता. अफजलखानाच्या कबरीचा झालेला विस्तार साठी त्यासाठी कोण फंडिंग करते असा सवालही त्यांनी या भाषणात उपस्थित केला होता. महाविकास आघाडीसोबत राहून बाळासाहेबांची प्रतिष्ठा शिवसेना संपवत असल्याची टीकाही त्यांनी केली होती.

हे सुद्धा वाचा

राज ठाकरे वैफल्यग्रस्त असल्याची राऊतांची टीका

या भाषणानंतर राज ठाकरे हे वैफल्यग्रस्त आहेत, त्यांना अयोध्येला जाण्यापासून कुमी रोखले होते, अशी खिल्ली उडवत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या भाषणावर टीका केली होती. अयोध्या दौऱ्याला एक खासदार विरोध करत असेल तर राज यांनी भूमिका घ्यायला हवी, अशी टीका त्यांनी केली होती. राज ठाकरे हिंदुत्ववादी ओवेसी असल्याची टीकाही राऊतांनी काल केली होती. औरंगजेबाच्या कबरीचा विषय हा केंद्र सरकारच्या हातात असल्याचे सांगत त्यांनी या कबरीबाबत निर्णय घ्यावा, असे राऊत म्हणाले होते. मातोश्रीनेच राज यांना मोठे केल्याची आठवणही त्यांनी करुन दिली होती. हिंदुत्वाची शाल यांनी कधी पांघरली असा सवालही त्यांनी केला होता. राऊतांसह आघाडीतील इतर नेतेही याबाबत राज ठाकरेंच्या सभेवर करमणूक सभा म्हणून सातत्याने टीका करीत आहेत.

पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....