AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis: एक निर्णय आणि बाळासाहेब, पवारांच्या पंक्तीत फडणवीस, सरकारमध्ये नसूनही सत्तेचा ‘रिमोट कंट्रोल’ फडणवीसांच्या हाती, विषय हार्डय समजून घ्या

सत्ता सोडताना केलेल्या दोन्ही भाषणामुळे उद्धव ठाकरेंची प्रतिमा एखाद्या राजकीय ऋषीप्रमाणे झाली होती. फडणवीसांची प्रतिमा ही सत्तापिपासू अशी होत होती. त्याला तडा देण्यासाठी फडणवीसांनी हा मास्टरस्ट्रोक खेळला आहे.

Devendra Fadnavis: एक निर्णय आणि बाळासाहेब, पवारांच्या पंक्तीत फडणवीस, सरकारमध्ये नसूनही सत्तेचा 'रिमोट कंट्रोल' फडणवीसांच्या हाती, विषय हार्डय समजून घ्या
सरकारमध्ये नसूनही सत्तेचा 'रिमोट कंट्रोल' फडणवीसांच्या हातीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 30, 2022 | 5:49 PM

मुंबई : जिथं सत्तेचा गेम तिथं कशाचाही नसतो नेम असचं काहीसं चित्र हे राज्याच्या राजकारणात दिसून आलं आहे. जिथं सर्वांना वाटत होतं की आता पुढचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे होणार, त्याचं पारडं फिरलं आणि मुख्यमंत्रिपदाची माळ ही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गळ्यात पडली. एवढच काय मी कॅबिनेटमध्येही नसेन हेही (Maharashtra Government Cabinet) फडणवीसांनीच जाहीर करून टाकलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या या निर्णयाचं आता कौतुक होत आहे. या ऐतिहासिक निर्णयानंतर फडणवीसांचं नाव हे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांच्या पंक्तीत पोहोचलं आहे. सत्ता सोडताना केलेल्या दोन्ही भाषणामुळे उद्धव ठाकरेंची प्रतिमा एखाद्या राजकीय ऋषीप्रमाणे झाली होती. फडणवीसांची प्रतिमा ही सत्तापिपासू अशी होत होती. त्याला तडा देण्यासाठी फडणवीसांनी हा मास्टरस्ट्रोक खेळला आहे, असेही बोलले जाते.

बाळासाहेब शेवटपर्यंत किंगमेकर राहिले

बाळासाहेब ठाकरे हे राज्याच्या राजकारणात नेहमी किंगमेकरच राहिले. त्यांनी कधीही कोणतेही राजकीय पद हे भूषवलं नाही. मात्र शिवसेनेचं सरकार हे नेमही त्यांच्या शब्दांवर हलायचं. बाळासाहेबांचा आदेश हे नेहमी फायनल असायचा. मुख्यमंत्री कुणीही असले तरी राज्याच्या राजकारणात बाळासाहेबांचं राजकीय वजन मोठं राहिलं आहे. तसेच चित्र आता फडणवीसांच्या या निर्णयामुळे तयार झालं आहे.

आघाडी सरकारचा रिमोट कंट्रोल पवारांकडे राहिला

बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखीच भूमिका नंतरच्या काळात दिसून आली. त्याच जोरदार गेल्या अश्यक वाटणारी सत्ता ही पवारांनी खेचून आणली. तर मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा करत मोठा मास्टरस्ट्रोक मारला. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असल्यानेच महाविकास आघाडी सरकार हे अडीच वर्षे टिकलं असेही बोलले जाते. अन्यथा तेवढा काळही हे सरकार तग धरू शकलं नसतं, असेही अनेक राजकीय जाणकार सांगतात. त्यामुळेच पवारांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करत सरकारची सुत्रं ही आपल्याकडे ठेवली होती.

मी पुन्हा येईन…ची प्रतिमाही पुसली जाणार

मागच्या निवडणुकीत फडणवीसांचं एक वाक्य सर्वात जास्त गाजलं ते म्हणजे, मी पुन्हा येईन…या वाक्यनं राज्याच्या राजकारणात धुमाकूळ घातला होता. यावर अनेक मीम्सही बनत होते.  मी पुन्हा येईन, याही फडणवीसांच्या वक्यामुळे त्यांच्या मोठ्या प्रमाणात टीका होत होती. तीही टीका आता या निर्णयाने पुसली जाणार आहे

शिंदे सरकारचा रिमोट कंट्रोल फडणवीसांकडेच

आता सरकार जरी एकनाथ शिंदे याचं स्थापन होत असले तरी या सरकारचा रिमोट कंट्रोल हा फडणवीसांकडेच असणार आहे. त्यामुळे फडणवीसांचा निर्णय ऐतिहासिक ठरला आहे. त्यांनी विरोधकांच्या टीकेलाही सणसणीत उत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री केल्याने महाविकास आघाडीतील नेत्यांकडेही आता बोलण्यासारखं फार काही नसणार आहे.

भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी.
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर.
जम्मू आणि काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी
जम्मू आणि काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी.
मी शेतकरी कर्ज माफीचं आश्वासन मी दिलं नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार
मी शेतकरी कर्ज माफीचं आश्वासन मी दिलं नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार.
युद्धाच्या भीतीनं पाकची झोप उडाली, लोक उपाशी राहू नये म्हणून एकच आदेश
युद्धाच्या भीतीनं पाकची झोप उडाली, लोक उपाशी राहू नये म्हणून एकच आदेश.
'93 हजार पाक सैनिकांचे आत्मसमर्पण...', धवननंतर आफ्रिदीला कुणी सुनावलं?
'93 हजार पाक सैनिकांचे आत्मसमर्पण...', धवननंतर आफ्रिदीला कुणी सुनावलं?.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं रिक्रिएशन; NIA चं पथक बैसरन खोऱ्यात दाखल
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं रिक्रिएशन; NIA चं पथक बैसरन खोऱ्यात दाखल.
एनआयएचे डिजी सदानंद दातेंच्या महत्वाच्या बैठका सुरू
एनआयएचे डिजी सदानंद दातेंच्या महत्वाच्या बैठका सुरू.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या बड्या मंत्र्यानं म्हटलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या बड्या मंत्र्यानं म्हटलं.
दहशतवाद्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत - मनोज जरांगे
दहशतवाद्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत - मनोज जरांगे.