Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काही सातबारे रामाच्या नावावर, काही विठ्ठलाच्या नावावर…वक्फची जमीन…जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

वक्फच्या जमिनी समजून घ्या. या जमिनी श्रीमंत मुसलमानांनी आपल्या समाजाच्या हितासाठी, धर्मकार्यासाठी, शिक्षणासाठी दिल्या आहेत. सरकारने कधीकाळी दिलेल्या जमिनी या नाहीत.

काही सातबारे रामाच्या नावावर, काही विठ्ठलाच्या नावावर...वक्फची जमीन...जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
jitendra awhad Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 04, 2025 | 9:13 AM

वक्फची जमीन ही कोणाचीही जमीन नाही. वक्फची जमीन ही परंपरेने दानात दिलेल्या जमिनी आहेत. आपल्याकडे काही सातबारे हे रामाच्या नावाने आहेत. काही सातबारे विठ्ठलाच्या नावावर आहेत. काही पांडुरंगाच्या नावावर आहेत. या देवस्थानाच्या जमीन आहेत. त्याची विल्हेवाट लावता येत नाही. परंतु महाराष्ट्रात देवस्थानच्या जमिनी खाल्ल्याचे देखील प्रकार आहेत. ते कोणी खाल्ले हेही सर्वांना माहिती आहे. देवस्थानच्या जमिनीची लूटमार सुरू आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, वक्फच्या जमिनी समजून घ्या. या जमिनी श्रीमंत मुसलमानांनी आपल्या समाजाच्या हितासाठी, धर्मकार्यासाठी, शिक्षणासाठी दिल्या आहेत. सरकारने कधीकाळी दिलेल्या जमिनी या नाहीत. ताजमहल वक्फची जमीन आहे. ती जमीन विकता येणार नाही. हे मी मंत्री असताना फायलीवर लिहून ठेवले होते. या प्रकरणावर मी काम केले आहे, त्यामुळे मला सर्व माहीत आहे, असे आव्हाड यांनी सांगितले.

वक्फची जमीन अशी जमीन आहे की त्याला एकदा वक्फ लागले सात बाऱ्यावरुन ते कमीच करू शकत नाही. त्याला सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलेला आहे. सरकारकडून अपेक्षा काय असते तर या जमिनी समाज हितासाठी दिलेले आहेत, त्याच्यामध्ये हेराफेरी करून जर कोणी खाण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला रोखायला पाहिजे. सरकारने हस्तक्षेप करून त्यात गोंधळ निर्माण करणे हे अभिप्रेत नाही. आपण संसदेतून बोलतो. त्याचाही भान राहिले त्यांना राहिला नाही. त्यांचा धर्म द्वेष इतका वाढला की आपल्याला धर्मद्वेषा विष पेरायला सगळी माध्यम पण कमी पडाली, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.

हे सुद्धा वाचा

गडकरी यांचे केले कौतूक

नितीन गडकरी यांनी शिवाजी महाराजांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, गडकरी योग्य बोलले. कारण ते पुस्तके वाचतात. जे पुस्तकच वाचत नाही त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? इतिहास असे सांगतो अफजलखानाचा वध झाल्यानंतर जेव्हा मासाहेबांना समजले की अफजलखानाला संपला. तेव्हा त्यांनी सांगितले त्याच्या धर्मानुसार त्याचा विधी व्हायला हवा. आपले वैर संपले. त्यामुळे त्याची कबर येथे सन्मानाने योग्य विधी करून केली. परंतु आपल्याला राजकारण करायचे आहे. आपल्याला हिंदू मुसलमान वाद पेटवायचे आहे, असा आरोप आव्हाड यांनी केला.

त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय
त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय.
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी.
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात.
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले...
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले....
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका.
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल.
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत.
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा.
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?.
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार.