AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ते’ बोलताहेत मग आमचे मुख्यमंत्री गप्प का..? हिवाळी अधिवेशनात सीमावादावरून सरकारला घेरले…

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील गावांवर दावा केला होता. त्यानंतर त्यांनी बेळगाव सीमावादावरून ट्विट केल्यानंतर महाराष्ट्रातील वाहनांवर कर्नाटकात तोडफोड केली.

'ते' बोलताहेत मग आमचे मुख्यमंत्री गप्प का..? हिवाळी अधिवेशनात सीमावादावरून सरकारला घेरले...
Follow us
| Updated on: Dec 20, 2022 | 9:57 PM

नागपूरः हिवाळी अधिवेशन सुरू होण्याआधीपासूनच विरोधकांनी सरकारला कोणत्या मुद्यावरून घेरायचं हा निश्चिय केला होता. त्यामुळेच पहिल्या दिवसांपासून भाजपच्या मंत्र्यांची बेताल वक्तव्य, सीमावाद यावरून जोरदार टीका करण्यात येत होती. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सीमावादावरून टीका करताना एकनाथ शिंदे यांचे सरकार म्हणजे गद्दारांचे सरकार आहे. ज्या लोकांनी बंडखोरी करून सरकार स्थापन केले आहे. त्या लोकांचे हे सरकार घटनाबाह्य सरकार असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील गावांवर दावा केला होता. त्यानंतर त्यांनी बेळगाव सीमावादावरून ट्विट केल्यानंतर महाराष्ट्रातील वाहनांवर कर्नाटकात तोडफोड केली.

त्यानंतरही आपल्या मुख्यमंत्र्यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही. त्याविषयावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, देशात प्रथमच एका राज्याचा मुख्यमंत्री दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना घाबरत आहे अशी टीका त्यांनी त्यांच्यावर केली.

सीमावादावरून एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करताना आदित्य ठाकरे यांनी ज्या चाळीस आमदारांनी बंडखोरी केली होती. त्यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला आहे. त्यामुळे आता सरकारकडून आदित्य ठाकरे यांच्या टीकेला कशा पद्धतीने उत्तर देणार हे थोड्याच दिवसात कळणार आहे.

आदित्य ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पद यांनी हे मिळवले असले तरी ते घटनाबाह्य पद त्यांनी बळकावले असल्याचे म्हटले आहे. त्याबरोबच हे सरकार राज्यासाठी काम करत नसून हे मुख्यमंत्री त्यांच्या 40 गद्दांरासाठी काम करत आहे असल्याची टीका त्यांनी केली आहे.

पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक.
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?.
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर.
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?.
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'.
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?.
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय.
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल.
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान.
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?.