Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सारथी’ला नवी मुंबईत भूखंड; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

संभाजीराजे छत्रपती हे सारथी संस्थेसाठी आग्रही होते. राज्यसभेच्या निवडणुकीतील त्यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू असताना मंत्रिमंडळात भूखंडाविषयी घेतलेल्या निर्णयानंतर ठाकरे सरकारच्या टायमिंगबद्दल चर्चा सुरू आहे.

'सारथी'ला नवी मुंबईत भूखंड; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
Uddhav ThackerayImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: May 27, 2022 | 11:35 AM

गुरुवारी (26 मे) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Meeting) सारथी (Sarathi) संस्थेच्या भूखंडासह काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. राज्य शासनाने मराठी, कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी यांच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेची (सारथी) स्थापना केली. या संस्थेला खारघर सेक्टर 37 मधील तीन हजार 500 चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. संभाजीराजे छत्रपती हे सारथी संस्थेसाठी आग्रही होते. राज्यसभेच्या निवडणुकीतील त्यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू असताना मंत्रिमंडळात भूखंडाविषयी घेतलेल्या निर्णयानंतर ठाकरे सरकारच्या टायमिंगबद्दल चर्चा सुरू आहे.

‘सारथी’ संस्थेमार्फत राज्यातील पुणे, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, लातूर, अमरावती, संभाजीनगर आणि मुंबई इथं विभागीय कार्यालय, वसतीगृहे, अभ्यासिका, ग्रंथालय, कौशल्य विकास केंद्र, सैन्य आणि पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र, ज्येष्ठ नागरिक समुपदेशन कक्ष, महिला सक्षमीकरण केंद्र इत्यादी सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. तसंच विद्यार्थ्यांसाठी 500 मुलांचं आणि 500 मुलींचं स्वतंत्र निवासी वसतिगृहदेखील विकसित करण्यात येईल. याअंतर्गत नवी मुंबई इथल्या केंद्रासाठी सिडकोच्या माध्यमातून खारघर सेक्टर 37 मधील 3500 चौरस मीटर क्षेत्रफळाचा हा भूखंड विशेष बाब म्हणून नाममात्र दराने भाडेपट्ट्याने शासनाच्या नियोजन विभागास देण्यात येणार आहे.

गुरुवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जनतेला मास्क वापरत रहा असं आवाहनही केलंय. राज्याची साप्ताहिक पॉझिटिव्हिटी 1.59 टक्के असून मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी आढळते. मुंबईत रुग्णसंख्येत 52.79 टक्के वाढ झाली असून ठाण्यामध्ये 27.92 टक्के इतकी वाढ झाली आहे. रायगड आणि पालघर जिल्ह्यात अनुक्रमे 18.52 टक्के आणि 68.75 टक्के इतकी वाढ झाली आहे.

हे सुद्धा वाचा

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी.
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण.
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप.
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा.
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?.
माझ्या नावाची अडचण असेल तर पत्र लगेच मागे घेतो..; भास्कर जाधव चिडले
माझ्या नावाची अडचण असेल तर पत्र लगेच मागे घेतो..; भास्कर जाधव चिडले.
हातात तिरंगा अन् विधानभवन परिसरातील झाडावर 'त्याचं' आंदोलन, मागणी काय?
हातात तिरंगा अन् विधानभवन परिसरातील झाडावर 'त्याचं' आंदोलन, मागणी काय?.
'सौगात ए मोदी'चं आम्ही स्वागत करतो, पण..; राऊतांनी घेतली भाजपची बाजू
'सौगात ए मोदी'चं आम्ही स्वागत करतो, पण..; राऊतांनी घेतली भाजपची बाजू.