AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashatra BJP : भाकरी फिरली, ‘या’ गोष्टी अंगलट आल्या, महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाची 5 कारणे कोणती?

Lok Sabha Election Results 2024 : देशाच्या सत्तेचा महामार्ग उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्रातून जातो. दिल्लीचे तख्त राखण्याचे काम महाराष्ट्र करतो, हे राज्यातील निकालांनी दाखवून दिले. राज्यात सर्वाधिक नुकसान भारतीय जनता पक्षाचे झाले आहे. महाराष्ट्रात भाजपच्या पराभवाची काय आहे कारण..

Maharashatra BJP : भाकरी फिरली, 'या' गोष्टी अंगलट आल्या, महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाची 5 कारणे कोणती?
Follow us
| Updated on: Jun 05, 2024 | 3:17 PM

उत्तर प्रदेशातून सत्तेचा महामार्ग जात असला तरी महाराष्ट्र दिल्लीचे तख्त राखतो हे पुन्हा एकदा मतांच्या आकड्यांनी दाखवून दिले आहे. उत्तर प्रदेश पाठोपाठ दुसरे महत्वाचे राज्य, महाराष्ट्राने भाजपला हाबाडा दिला. राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. त्यातील 9 जागाच भाजपला पदरात पाडून घेता आल्या. 2019 मध्ये राज्यात 25 जागा लढवत 23 जागा मिळवून भाजपने भीम पराक्रम केला होता. पण यंदा सत्तेचे गणित जुळवताना मतांची वजाबाकी केव्हा झाली हे भाजपच्या धुरणींच्या लक्षात आले नाही.

ईडी-सीबीआय कारवाई

ईडी-सीबीआय या संस्थांचा घरगडी असल्यासारखा वापर होत असल्याचा आरोप अनेकदा विरोधकांनी केला. शिवसेना, राष्ट्रवादी यांच्या नेत्यांच्या मागे राज्यात ईडी-सीबीआयचा ससेमिरा लावण्यात आल्याचे आरोप झाले. दस्तूरखुद्दा शरद पवारांनी मुंबईत केलेल्या खास आंदोलनामुळे मात्र केंद्रीय संस्थांच्या तोंडचे पाणी पळाले होते. विरोधकांना जेरीस आणण्यासाठी या संस्थांचा वापर झाल्याचा आरोप करण्यात आला.

हे सुद्धा वाचा

ऑपरेशन लोटस

मोठे बहुमत असताना भाजपला विरोधी बाकांवर बसावे लागले होते. त्यातच भाजपने ऑपरेशन लोटस चालवले. अगोदर शिवसेनेला सुरुंग लावला. सुरत, आसाम ते गोवामार्ग हे नाट्य अवघ्या देशाने पाहिले. एका गटासोबत घरोबा करत सत्तांतर घडविले. तर काही दिवसांनी राष्ट्रवादीचा गड फोडला. या फोडाफोडीच्या राजकारणाला महाराष्ट्रात थारा नसल्याचे मतातून दिसून आले.

मराठा फॅक्टरचा फटका

मराठवाड्यातील आठ जागांचे निकाल समोर ठेवत मराठा फॅक्टरचा मोठा फटका भाजपला बसल्याचे राजकीय विश्लेषक प्रा. गणेश मोहिते यांनी स्पष्ट केले. राज्यातील सुडाचे राजकारण सुद्धा जनतेच्या पचनी पडल नसल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राचा डीएनए हा वेगळा आहे. सर्वसामावेश आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा महाराष्ट्राचा स्वभाव आहे. भाजपच्या गेल्या काही वर्षांतील राजकारणाने त्याला छेद दिला. जनतेने मत पेटीतून ही नाराजी जाहीर केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांच्या संतापाचा कडेलोट

पत्रकार आणि तज्ज्ञांच्या मते, शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष केल्याचा मोठा फटका भाजपला बसला. केंद्रातील सरकारने तीन महिन्याला दोन हजारांची मदत सुरु केली असली तरी करामुळे खत, बियाणं, शेती आवजारं आणि इतर साहित्य महाग झाले. त्यातच कांदा, कापूस, सोयाबीन आणि इतर शेतीमालाला योग्य भाव मिळाला नाही. तर निर्यातीसंबंधीचे तळ्यातमळ्यातील धोरणाने भाजपने शेतकऱ्यांची नाराजी ओढावून घेतली.

काँग्रेसला हलक्यात घेणे नडले

काँग्रेस गिणतीतच नाही, असे भाजपचे गृहितक त्यांना नडले. काँग्रेस नावालाच उरली आहे, हा समजही बहुधा नडला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना फोडून काँग्रेसला दे धक्का देण्याच्या प्रयोगातून काहीच हाती लागले नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो आणि नंतर न्याय यात्रा काढून प्रत्यक्ष जनतेशी संवाद साधला. 50 जागांवर पण काँग्रेस निवडून येणार नाही, हा भाजपचा दावा जागा जिंकून काँग्रेसने खोडून काढला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर.
प्रवाशांनी केलं असं काही.., वैतागलेल्या चालकाने बस चालवण्यास दिला नकार
प्रवाशांनी केलं असं काही.., वैतागलेल्या चालकाने बस चालवण्यास दिला नकार.
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.