AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra MLC Election : गणपत गायकवाड यांना एक न्याय आणि देशमुख, मलिक यांना वेगळा न्याय कसा?; विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले

Maharashtra MLC Election Voting begins : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान सुरु आहे. क्रॉस वोटिंगची भीती सर्वच पक्षांना सतावत आहे. त्यातच भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांना विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी तुरुंगबाहेर आणण्यात येत असल्याने राजकारण तापले आहे.

Maharashtra MLC Election : गणपत गायकवाड यांना एक न्याय आणि देशमुख, मलिक यांना वेगळा न्याय कसा?; विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले
गणपत गायकवाड यांच्या मतदानावरुन राजकारण तापले
Follow us
| Updated on: Jul 12, 2024 | 11:45 AM

युद्धात आणि प्रेमातच नाही तर राजकारणात पण सर्व काही माफ असते, याचा प्रत्यय या विधान परिषद निवडणुकीतून आला आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान सुरु झाले आहे. 12 उमेदवार रिंगणात आहे. सर्वच पक्षांना क्रॉस वोटिंगची भीती सतावत आहेत. त्यातच भाजपने एक नामी शस्त्र बाहेर काढले आहे. उल्हानगर पोलीस ठाण्यात गोळीबार करणारे आमदार गणपत गायकवाड यांना या निवडणुकीसाठी तुरुंगाबाहेर येत आहेत. त्यावरुन राजकारण तापले आहे. त्यांनी भाजपसह महायुतीवर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या या खेळीवर चांगलेच तोंडसूख घेतले आहे.

हा तर सत्तेचा दुरुपयोग

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकाराला तीव्र विरोध केला. हा सत्तेचा दुरुपयोग आहे. न्याय व्यवस्थेवर आपण बोलू शकत नाही. गणपत गायकवाड यांनी स्वतः गोळी झाडली हे सगळ्यांनी पाहिलं. निवडणूक आयोग बायस आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.निवडणूक आयोग त्यांच्या घराचा गडी आहे, असं झाले हे तर. सत्तेचा वापर केला जात आहे. उघड्या डोळ्याने हे सगळे पाहत आहेत. निवडणूक अधिकाऱ्याला आम्ही आक्षेप नोंदवला असल्याचे दानवे यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

न्याय वेगळा कसा?

माझ्यावर खोटे आरोप करून जेल मध्ये टाकले होते. त्यावेळी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदानाची परवानगी मागितली पण मला मिळाली नाही. आश्चर्याची गोष्ट आहे गणपत गायकवाड यांच्या साठी वेगळा न्याय आणि आम्हाला वेगळा न्याय असं चित्र आहे. भाजपचा लोअर कोर्टवर दबाव असल्याचा गंभीर आरोप राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला.

महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार जिंकणार

महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार जिंकणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. विधान परिषद निवडणुकीमध्ये प्रत्येकाने जादा उमेदवार लादलेला आहे. भाजपला सुद्धा त्यांचे सर्व उमेदवार निवडून आणण्यात इतकी मत नाही. अजित पवार गट,शिंदे गटाची सुद्धा मतं नाही. महाविकास आघाडीने तीन उमेदवार उभे केले, काँग्रेसकडे त्यांचा उमेदवार निवडून आणण्यात इतकी मत नक्कीच आहेत. पण शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील आणि शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर हे उमेदवार आहेत.

महाराष्ट्राची सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आणि लोकसभेचे निकाल पाहता अनेक आमदार हे महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेले आहेत. 23 मतांचा कोठा आहे, मला पूर्ण खात्री आहे सध्याच्या परिस्थितीत महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून येतील त्याविषयी आमच्या मनात शंका नाही. स्वतः उद्धव ठाकरे,शरद पवार, जयंत पाटील आणि त्यांचे सहकारी त्यासाठी यशस्वीपणे प्रयत्न करत आहेत, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत.
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'.
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली.
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.