AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vidhan Parishad Election : ही दोस्ती तुटायची नाय…म्हणता…म्हणता, तुझं तू बघ, माझं मी बघतो? विधान परिषदेत शिवसेनेचा सावध पवित्रा

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संजय राऊत यांचा विजय, तर संजय पवार पराभूत झाले. त्यामुळे संजय पवार यांच्या पराभवाचे खापर संजय राऊत यांनी अपक्षांवर फोडल्याने महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

Vidhan Parishad Election : ही दोस्ती तुटायची नाय...म्हणता...म्हणता, तुझं तू बघ, माझं मी बघतो? विधान परिषदेत शिवसेनेचा सावध पवित्रा
ही दोस्ती तुटायची नाय...म्हणता...म्हणता, तुझं तू बघ, माझं मी बघतो? विधान परिषदेत शिवसेनेचा सावध पवित्राImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 3:37 PM

मुंबई : राज्यसभा निवडणुकीतला (Rajyasabha Election) पराभव हा शिवसेनेच्या (Shivsena) इतका जिव्हारी लागलाय की आता शिवसेनेने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी (Vidhan Parishad Election) सावध पविक्षा घेतलाय. गेल्या काही वर्षात आमचा फेविकॉलचा जोड आहे, कधीच तुटणार नाही म्हणाऱ्या आघाडीतला  जोड हा आता कुठेतरी सैल होताना दिसत आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला झालेला दगाफटका पाहता आता विधान परिषद निवडणुकीत आप, आपलं बघा असे सूर निघताना दिसू लागल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. राज्यसभा निवडणुकीतील अनुभवाने दुखावले गेलेल्या शिवसेनेचा महाविकास आघाडीतील मित्र पक्ष काँग्रेस-NCP ला हा सूचक संदेश आहे. मात्र आता शिवसेनेच्या भूमिकेमुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संजय राऊत यांचा विजय, तर संजय पवार पराभूत झाले. त्यामुळे संजय पवार यांच्या पराभवाचे खापर संजय राऊत यांनी अपक्षांवर फोडल्याने महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

शिवसेना सावध भूमिकेत

आता 20 जूनला होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना सावध झालीय.  10 जागांसाठी होत असलेल्या निवडणूकित महाविकास आघाडीचे 6, भाजपचे 5 आणि भाजप निकटवर्तीय अपक्ष 1 असे एकूण 12 उमेदवार रिंगणात आहेत.  शिवसेनेने 2, राष्ट्रवादी काँग्रेसने 2 आणि काँग्रेसने 2 उमेदवार उभे केले आहेत. आता या निवडणुकीत विजयासाठी 27 मतांचा कोटा शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून येण्यासाठी पक्षाची कट टू कट मतं आहेत. 10 वी जागा निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपची पुन्हा सर्व भिस्त पुन्हा एकदा अपक्षांवर असणार आहे. त्यात हे मतदान पूर्णपणे गोपनीय असल्याने राज्यसभा निवडणूकीनंतर आता विधान परिषद निवडणुकीत उत्कंठा आणि रंगत वाढली आहे. गोपनीय मतदान असल्याने महाविकास आघाडी आणि भाजप पुन्हा एकदा एकमेकांची मते फोडण्याचा प्रयत्न करताना दिसून येणार आहे.

शिवसेना काँग्रेसची साथ सोडणार?

यावेळी काँग्रेसला आपला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी आणखी 10 मतांची गरज आहे काँग्रेसकडे असलेल्या 44 आमदाऱ्यांच्या ताकदीवर त्यांचा 1 उमेदवार सहज निवडून येईल. 44 मतांतून पहिल्या पसंतीची 27 मते पहिल्या उमेदवाराला गेल्यानंतर पक्षाची 17 मते शिल्लक राहतात. त्यामुळे आता काँग्रेसला इतर मतांची गरज भासणार आहे. मात्र शिवसेने साथ न दिल्यास काँग्रेसच्या उमेदवाराची अडचण होऊ शकते. दुसरीकडे राज्यसभा निवडणुकीत भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आल्याने भाजपचा आत्मविश्वास द्विगुणीत झालाय. महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांची मते मिळवण्याची भाजपची व्यूहरचना यशस्वी ठरलीय, त्यामुळे आता काँग्रेसच्या गोटातलं टेन्शन वाढलं आहे. त्यातच आता शिवसेनेची ही भूमिका आघाडीसाठी वेगळी ठरणार का? हे येणारे काही दिवसच सांगतील.

टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.
पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले
पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले.
मोठी बातमी! भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्धवस्त
मोठी बातमी! भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्धवस्त.