Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगे यांनी हात जोडले…म्हणाले, बाबांनो, ही….

प्रत्येकाने घरातून बाहेर पडायचं आहे. येत्या 10 ते 15 दिवसात तुमची सर्व कामं आटोपून घ्या. शेतीतील कामे पार पाडा. कापूस विकायचा असेल तर विकून टाका. ऊसतोड करायला चाललो असं समजूनच सर्व संसार सोबत घ्या. विंचवाचं बिऱ्हाड घेऊन यायचं आहे. बेसावध होऊन जायचं नाही, सर्व साहित्य सोबत घ्या. आपल्याला कुणावरही अवलंबून राहायचं नाहीये, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे यांनी हात जोडले...म्हणाले, बाबांनो, ही....
Manoj Jarange Patil Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 28, 2023 | 5:54 PM

मुंबई | 28 डिसेंबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई पुकारली आहे. सरकारशी अनेकदा चर्चा झाली. अनेक आश्वासने मिळाली, पण ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही. त्यामुळे मराठा समाजात अत्यवस्था पसरली आहे. त्यामुळेच मनोज जरांगे पाटील यांनी आता थेट मुंबईला धडक देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 20 जानेवारी रोजी भगवं वादळ मुंबईत धडकणार आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आज मराठा समाजाला हात जोडून विनंती केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी टीव्ही9 मराठीशी खास संवाद साधला. यावेळी त्यांनी ही विनंती केली. 200 पेक्षा अधिक लोकांनी बलिदान दिलं आहे. त्यांचं बलिदान वाया जाऊ द्यायचं नाही. अंतरवलीत लोक पायी चालत आलेत. त्यांचे श्रम वाया जाऊ देणार नाही. घराच्या बाहेर पडा. एवढीच संधी आहे. हातजोडून कळकळीची विनंती आहे. शेवटचा लढा आहे. तुम्ही पोरांना आयुष्याची प्रॉपर्टी दिली ना. तसंच हे आरक्षण आहे. ही आयुष्याची प्रॉपर्टी आहे. आरक्षण देण्यासाठी बाहेर पडा, असं कळकळीचं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं. जरांगे पाटील यांनी हातजोडून ही विनंती केली.

सुट्ट्या टाका, पण घराबाहेर पडा

तुमचं शिकलेलं पोरं एका टक्क्यामुळे घरी पडलं आहे. त्याला नोकरी मिळाली नाही. त्यामुळे आपल्याच जातीसाठी लढा. मला माहीत आहे, माझा समाज घरी बसणार नाही. काम बुडालं तरी हरकत नाही. रजा टाकली तरी हरकत नाही. 10 ते 15 दिवसात कामं उरका आणि मुंबईकडे वळा. तुमच्या साथीची गरज आहे. खांद्याला खांदा लावून उभं राहा, असं आवाहनही मनोज जरांगे यांनी केलं.

सर्वच जण सामील व्हा

मुंबईला येणाऱ्यांना गावकऱ्यांनी शिधा किंवा जास्त दिवस टिकेल एवढं वाण सामान द्यावं. आपलं लेकरू म्हणून सामान द्या. अर्धा क्विंटल, ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ घ्या, टॉर्च, मोबाईल चार्जर, कपडे, साबण, दूध पावडर, सरपण, तवा, पातेल सोबत घ्या. तुम्ही तुमच्या तयारीने या. कुणावरही अवलंबून राहू नका. ट्रकमधून येत असाल तर ट्रकच्या कप्प्यात सामान ठेवा. आपल्या वस्तुंची काळजी आपणच घ्यायची आहे. जाणाऱ्यांना वांट लावण्यासाठी सर्व गावकरी वाटं लावायला या. शेतकऱ्यांपासून श्रीमंत मराठ्यांपर्यंत सर्वजण सामील व्हा. अजून या यात्रेला नाव देणे बाकी आहे, असंही त्यांनी सांगितलं.

कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.