AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“महाराष्ट्रातील माणसाला मुर्ख बनवण्याचं हे काम”; राष्ट्रवादीनं भाजपची पोलखोल का केली…

आंतरजातीय विवाहावर जो निर्बंध आणण्याचा जो काही प्रयत्न केला जात आहे, त्यातून सरकार जातव्यवस्था घट्ट करण्याचाही प्रयत्न या सरकारकडून केला जात असल्याची टीकाही त्यांनी केली.

महाराष्ट्रातील माणसाला मुर्ख बनवण्याचं हे काम; राष्ट्रवादीनं भाजपची पोलखोल का केली...
Follow us
| Updated on: Dec 15, 2022 | 10:09 PM

मुंबईः आपल्या राज्यातील महामानव महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर असो यांनी आपल्या घरामध्ये आंतरजातीय विवाह केला होता. आणि आंतरजातीय विवाह करण्याचा अधिकार संविधानाने प्रत्येकाला मिळाला आहे. त्यामुळे सरकारने जो नवा नियम सांगितला आहे. तो संविधानविरोधी असल्याची टीका माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. आंतरजातीय विवाहावरून राज्य सरकारवर त्यांनी जातीयवादाचा आरोप करत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

महाराष्ट्रातील या थोर महामानवांचे विचार पायदळी तुडवण्याचे काम हे सरकार करत असल्याचेही त्यांना म्हटले आहे.

आंतरजातीय, आंतरधर्मिय विवाह करताना एक महिना आधी महिलांच्या आईची परवानगी घ्यायची, त्यांना कळवायचं असे नियम लावून सरकार स्त्रियांचे अधिकारांवर लगाम लावण्याचे काम करत असल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

श्रद्धा वालकर प्रकरणावरून हे पत्रक काढले असले तरी यामागे जातीय मानसिकता घट्ट करण्याचा प्रयत्नही या सरकारकडून चालू असल्याचेही त्यांनी सांगितले.

आंतरजातीय विवाहावर जो निर्बंध आणण्याचा जो काही प्रयत्न केला जात आहे, त्यातून सरकार जातव्यवस्था घट्ट करण्याचाही प्रयत्न या सरकारकडून केला जात असल्याची टीकाही त्यांनी केली.

तर भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देव देवतांवर बोलणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिली आहे. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी टीका करताना म्हणाले की, तुम्ही कायदे नियम करा आणि सगळ्या महाराष्ट्राला जेलमध्ये टाका तुम्हीच फक्त मंत्री बाहेर राहा असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या ट्विटनंतर जी जाळपोळ झाली. त्यानंतरही बोमई जर हे ट्विट मी केले नाही, माझे ट्विटर हँडल हॅक झाले आहे असं ते सांगत असतील तर ते महाराष्ट्रातील जनतेला ते मूर्ख समजत आहेत. आणि त्याला आपले मुख्यमंत्री लगंडे समर्थन करत आहेत अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक.
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?.
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर.
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?.
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'.
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?.
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय.
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल.
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान.
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?.