Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समुद्राच्या बोगद्यात बुलेट ट्रेन 320 किमीच्या वेगाने धावणार, मुंबईत आल्यावर रेल्वेमंत्र्याचे महत्वाचे अपडेट

Mumbai Ahmedabad Bullet Train | बुलेट ट्रेनसाठी समुद्राच्या खाली 21 KM चा बोगदा करण्यात आला आहे. देशात समुद्रातील बोगद्यातून धावणारी ही पहिली ट्रेन असणार आहे. 21 किलोमीटर लांब बोगद्याला सुरुवात मुंबईतील एचएसआरपासून होणार आहे.

समुद्राच्या बोगद्यात बुलेट ट्रेन 320 किमीच्या वेगाने धावणार, मुंबईत आल्यावर रेल्वेमंत्र्याचे महत्वाचे अपडेट
रेल्वेमंत्री वैष्णव यांनी विक्रोळी शाफ्टमध्ये बोगद्याच्या कामासाठी प्रथम रिमोट-नियंत्रित ब्लास्टिंग केले
Follow us
| Updated on: Feb 26, 2024 | 7:18 AM

मुंबई, दि. 25 फेब्रुवारी 2024 | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेनसंदर्भात महत्वाची बातमी आली आहे. केंद्रीय रेल मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात अपडेट दिले आहे. मुंबईतील विक्रोळी आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील बुलेट ट्रेनच्या बांधकाम सुरु असलेल्या जागेवर अश्विनी वैष्णव पोहचले. त्यांनी कामाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी सांगितले की, हायस्पीड रेल कॉरिडॉरचा पहिला टप्पा जुलै-ऑगस्ट 2026 मध्ये सुरू होईल. यानंतर हळूहळू इतर टप्पे सुरू होतील. पहिला टप्पा सुरत आणि बिलीमोरा दरम्यानचा असणार आहे.

समुद्राच्या खाली 21 KM बोगदा

बुलेट ट्रेनसाठी समुद्राच्या खाली 21 KM चा बोगदा करण्यात आला आहे. देशात समुद्रातील बोगद्यातून धावणारी ही पहिली ट्रेन असणार आहे. 21 किलोमीटर लांब बोगद्याला सुरुवात मुंबईतील एचएसआरपासून होणार आहे. कल्याण सिलफाटा मार्गाने हा बोगदा जाणार आहे. यामधील 7 किलोमीटरचा भाग ठाणे क्रिकवर समुद्राच्या खाली असणार आहे. बोगदा 40 फूट रुंद असणार आहे. त्यात एक अप आणि एक डाउन लाइन असणार आहे. बोगद्यातून ही ट्रेन 320 किलोमीटर प्रती वेगाने धावणार आहे.

महाराष्ट्रातील काम का रखडले

मुंबईच्या दौऱ्यावर आलेले रेल्वेमंत्री वैष्णव यांनी विक्रोळी शाफ्टमध्ये बोगद्याच्या कामासाठी प्रथम रिमोट-नियंत्रित ब्लास्टिंग केले. यावेळी बुलेट ट्रेनचा संपूर्ण 508 किलोमीटर लांबीचा मार्ग कधी सुरु होणार? हे त्यांनी सांगितले नाही. परंतु पहिला टप्पा जुलै-ऑगस्ट 2026 मध्ये सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात या प्रकल्पास उशीर होण्याचे कारण त्यांनी सांगितले. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने या योजनेसाठी सहकार्य केले नाही. त्यांनी उद्धव ठाकरे सरकारने हे काम थांबवले नसते तर आतापर्यंत बरेच काम झाले असते, असे स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग हा देशातील एकमेव हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प आहे. जपान सरकारच्या सहाय्याने हा प्रकल्प चालवला जात आहे. बुलेट ट्रेन ताशी 320 किलोमीटरच्या वेगाने धावणार असून त्या मार्गावर 12 स्थानके असणार आहेत. दररोज 35 गाड्या धावू शकणार आहे.

त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?.
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे....
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे.....
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?.
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच.
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा.