AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई-ठाण्यात पावसाची बुट्टी, मात्र शाळा-कॉलेजना सुट्टी

शालेय शिक्षण मंत्र्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून आधीच आज मुंबई-ठाण्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. परंतु पावसाने उघडीप घेतल्याचं दिसत आहे

मुंबई-ठाण्यात पावसाची बुट्टी, मात्र शाळा-कॉलेजना सुट्टी
फोटो सौजन्य : @IamAmitThakkar ट्विटर अकाऊण्ट
Follow us
| Updated on: Sep 19, 2019 | 7:54 AM

मुंबई : मुंबईत काल (बुधवारी) रात्री दमदार कोसळलेल्या पावसाने आज (गुरुवार 19 सप्टेंबर) सकाळच्या सुमारास मात्र विश्रांती घेतली आहे. परंतु शालेय शिक्षण मंत्र्यांनी खबरदारी म्हणून आधीच आज मुंबई-ठाण्यातील शाळा-कॉलेजेसना सुट्टी (Mumbai School Colleges Closed) जाहीर केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक बिनपावसाच्या सुट्टीचा आनंद घेत आहेत.

येत्या 24 तासात मुंबईसह रायगड, कोकण, सिंधुदुर्ग या ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी मुंबई, ठाणे, कोकण भागातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी (Mumbai School Colleges Closed) जाहीर केली आहे. महाराष्ट्राच्या इतर भागातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्याचा निर्णय हवामानाची स्थिती पाहून जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आला आहे.

शाळा शनिवारीही खुल्या?

गेल्या आठवड्यात गौरी-गणपती आणि त्याआधीही पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळा-कॉलेजेसना सुट्टी मिळाली होती. त्यामुळे अपूर्ण राहिलेला अभ्यासक्रम भरुन काढण्यासाठी काही शाळा शनिवारीही सुरु ठेवण्याच्या तयारीत आहेत. याबाबतचा निर्णय प्रत्येक शाळेच्या व्यवस्थापनाकडून घेतला जाणार आहे.

मुंबईकरांना सावधतेचा इशारा

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रत्नागिरी परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईकरांनी समुद्राजवळ आणि पाणी साचलेल्या सखल भागात जाणं टाळावं, असं आवाहन मुंबई महापालिकेतर्फे करण्यात आलं आहे.

बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवसांत अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

कडकडाट आणि गडगडाट

मुंबईत बुधवारी रात्री मुंबई शहर आणि उपनगरातील बहुतांश भागांमध्ये विजेच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी शाळा-कॉलेजेससह ऑफिसला दांडी मारण्याची तयारी अनेकांनी केली होती. मात्र शिक्षण विभागाने सुट्टी जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांना आपसूकच आनंद झाला. तर पावसाचा जोर ओसरल्याने ऑफिसला दांडी मारण्याच्या विचारात असलेल्या मुंबईकरांचा हिरमोड झाला.

मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, पुढील 24 तासात अतिवृष्टीचा इशारा

मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे वगळले, तर फारशा कुठल्याच सखल भागात पाणी साचलेलं नाही. त्यामुळे रस्ते वाहतूक तूर्तास सुरळीत आहे. त्याचप्रमाणे पश्चिम, मध्य किंवा हार्बर रेल्वेमार्गावरील लोकल सेवेवरही कोणताही परिणाम झालेला नाही.

नाक दाबलं की तोंड उघडतं.,'सिंधू जल' स्थगितीवर काय म्हणाले अण्णा हजारे?
नाक दाबलं की तोंड उघडतं.,'सिंधू जल' स्थगितीवर काय म्हणाले अण्णा हजारे?.
1 हजार भारतीय नागरिक मायदेशी परतले, 800 पाकिस्तान्यांनी भारत सोडला
1 हजार भारतीय नागरिक मायदेशी परतले, 800 पाकिस्तान्यांनी भारत सोडला.
बदलापूर रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी! प्रवाशांचा संताप अन् एकच मागणी
बदलापूर रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी! प्रवाशांचा संताप अन् एकच मागणी.
पहलगाम हल्ल्यातल्या 'त्या' झिपलाइन ऑपरेटरला एनआयएने ताब्यात घेतलं
पहलगाम हल्ल्यातल्या 'त्या' झिपलाइन ऑपरेटरला एनआयएने ताब्यात घेतलं.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्कराने घेरलं; सुत्रांची माहिती
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्कराने घेरलं; सुत्रांची माहिती.
पर्यटकांच्या हत्येचा बदला कोणत्याही क्षणी? देशात हालचालींना वेग
पर्यटकांच्या हत्येचा बदला कोणत्याही क्षणी? देशात हालचालींना वेग.
पहलगाम हल्ल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक
पहलगाम हल्ल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक.
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार.
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.