Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sameer Wankhede : मुंबई NCB ला नवा प्रमुख मिळणार , समीर वानखेडेंचा कार्यकाळ संपणार, नेमकं कारण काय?

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) मुंबई विभागाचे प्रमुख समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचा कार्यकाळ 31 डिसेंबरला संपणार असल्याच समोर आलं आहे.

Sameer Wankhede : मुंबई NCB ला नवा प्रमुख मिळणार , समीर वानखेडेंचा कार्यकाळ संपणार, नेमकं कारण काय?
समीर वानखेडे यांची चौकशी
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 8:51 AM

मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) मुंबई विभागाचे प्रमुख समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचा कार्यकाळ 31 डिसेंबरला संपणार असल्याच समोर आलं आहे. समीर वानखेडे यांनी एनसीबीमध्ये कार्यरत राहण्यासाठी मुदतवाढ मागितली नसल्याचं समोर आलं आहे. एनसीबीनं याविषयीची माहिती दिल्याचं ट्विट एनएनआय या वृत्तसंस्थेनं केलं आहे.

समीर वानखेडेंची एनसीबीतील कामगिरी

समीर वानखेडे डेप्युटेशनवर सप्टेंबर 2020 मध्ये एनसीबीच्या मुंबई कार्यालयात रुजू झाले होते.ऑगस्ट ते डिसेंबर 2020 या कालावधीत समीर वानखेडे यांनी 96 जणांना अटक करत 28 केसेस दाखल केल्या. तर 2021 मध्ये त्यांनी 234 लोकांना अटक करत 117 केसेस दाखल केल्या आहेत. वानखेडे यांनी त्यांच्या काळात 1 हजार कोटी रुपयांचं 1791 किलो ड्रग्ज जप्त केलं तर काही संपत्ती देखील जप्त केली.

बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन वर कारवाई

समीर वानखेडेंनी एनसीबीमध्ये दाखल झाल्यानंतर पहिल्यांदा रिया चक्रवर्तीला अटक केली होती. समीर वानखे़डे यांच्याकडून त्यानंतर दीपिका पादूकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, भारती सिंग यांना सुशांत सिंगच्या मृत्यू प्रकरणात ड्रग्ज कनेक्शनवरुन चौकशीला बोलावण्यात आलं होतं.

आर्यन खान प्रकरणानंतर समीर वानखेडे वादाच्या भोवऱ्यात

समीर वानखेडे यांनी कॉर्डिलिया क्रुझवरील पार्टीवर छापा टाकत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह इतर 8 जणांना अटक केली होती. आर्यन खानच्या अटकेनंतर मोठा वाद निर्माण झाला होता. महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी आर्यन खान प्रकरण हा फर्जीवाडा आणि खंडणीचं प्रकरण असल्याचा आरोप समीर वानखेडेंवर केला होता. आर्यन खान प्रकरणातील साक्षीदारांवरुन देखील वाद निर्माण झाला होता.

वानखेडेंनी मुदतवाढ न मागितल्यानं एनसीबीतील कार्यकाळ संपणार समीर वानखेडे हे 2008 च्या बॅचचे आयआरएस ऑफिसर आहेत. ते सप्टेंबर 2020 मध्ये एनसीबीमध्ये डेप्युटेशनवर रुजू झाले होते. त्यापूर्वी ते डीआरआयमध्ये कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या वादांच्यापार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांच्याकडून मुदतवाढ मागण्यात आली नसल्याची माहिती आहे.

इतर बातम्या:

‘तुमचा वापर संपतो तेव्हा तुम्हाला च्युइंगमसारखं थुंकलं जातं’, रामदास कदमांवरुन नितेश राणेंचा शिवसेनेवर निशाणा

Omicron Variant : राज्यात ओमिक्रॉनचा फैलाव चिंताजनक, नवीन 8 रुग्ण आढळले, एकूण रुग्णांची संख्या 48 वर

Mumbai Zonal Director Sameer Wankhedes tenure to end on 31Dec

'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्रींकडून पाठराखण
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्रींकडून पाठराखण.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.
संतापजनक! स्कूलबसच्या क्लीनरकडून 2 चिमूकल्यांवर अत्याचार
संतापजनक! स्कूलबसच्या क्लीनरकडून 2 चिमूकल्यांवर अत्याचार.
मोठी बातमी, नव्या वक्फ कायद्याला तूर्तास स्थगिती... कोर्टात काय घडलं?
मोठी बातमी, नव्या वक्फ कायद्याला तूर्तास स्थगिती... कोर्टात काय घडलं?.
काड्या करणं बंद करा.., 'त्या' एका प्रश्नावरून दानवे पत्रकारांवरच भडकले
काड्या करणं बंद करा.., 'त्या' एका प्रश्नावरून दानवे पत्रकारांवरच भडकले.
केस गळतीनंतर आता नख गळती; बुलढण्यात चाललंय काय?
केस गळतीनंतर आता नख गळती; बुलढण्यात चाललंय काय?.