AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“हिंदुत्वाच्या पाठीत यांनी खंजीर खुपसला”; शिंदे गटाच्या नेत्यानं ठाकरे गटाच्या वर्मावर घाव घातला

आम्हाला हिंदुत्व शिकवू नका फक्त निवडणूक आली की त्यावेळेसच फक्त तुम्ही हिंदुत्वाचा विचार करता त्यामुळे त्यांनी हा विचार करू नका अशी टीकाही शिंदे गटाने त्यांच्यावर केली आहे.

हिंदुत्वाच्या पाठीत यांनी खंजीर खुपसला; शिंदे गटाच्या नेत्यानं ठाकरे गटाच्या वर्मावर घाव घातला
Follow us
| Updated on: Feb 05, 2023 | 5:56 PM

मुंबईः ठाकरे गटाचे आणि विरोधी पक्षनेते असलेले अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्ला केला होता. त्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी पलटवार करत ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. नरेश म्हस्के यांनी अंबादास दानवे व राजन विचारे यांच्यासह उद्धव ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. अंबादास दानवे यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले की, अंबादास दानवे यांची संभाजीनगरमध्ये नगरसेवक होण्याची पात्रता नाही म्हणत त्यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

तर जितेंद्र आव्हाड प्रभू रामचंद्र आणि रावण, छत्रपती शिवाजी महाराज, शाहिस्तेखान आणि औरंगजेब यांची तुलना करतात, त्या माणसांच्या मांडीला मांडी लावून हे बसतात त्यामुळे त्यांना हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही अशी खोचक टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

कटकारस्थान करणाऱ्या दाऊदबरोबर जे असताता त्याला यांच्या मंत्रिमंडळात स्थान असते असे म्हणत त्यांनी नवाब मलिक यांचे नाव घेत त्यांच्यावर टीका केली आहे.

तर ठाकरे गटाला आता शिवसेनाप्रमुख हिंदूहृदय सम्राट असं म्हणायला यांना लाज वाटते. त्यामुळे ही लोकं बाळासाहेब ठाकरे यांना वंदनीय म्हणायला लागले.

त्यामुळे त्यांनी हिंदुत्वाच्या पाठीत खंजीर खुपसला असून त्याच्याबद्दल यांनी प्रथम बोलावं असे थेट आव्हान नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाला केले आहे.

ज्या संभाजीनगरमधून विधान परिषदेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच निवडून आले आहेत. त्यांना तिकडे कोण विचारतं, आणि त्यांची नगरसेवक तरी होण्याची त्यांची पात्रता नाही अशी जहरी टीका त्यांनी अंबादास दानवे यांच्यावर केली आहे.

मलंगड यात्रेवरूनही त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाहीत म्हणून काय झालं. मलंगड यात्रेत ते येऊ शकले असते.

मात्र त्यांना घरात बसून हिंदुत्व टिकवायचं आहे. फक्त मतांकरिता हिंदुत्वाची भाषा करायची आहे अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी बॅनर लावलेले आहेत, त्यावर आमचे फोटो टाकलेले आहेत. यावर जितेंद्र आवड यांची प्रतिक्रिया घ्यावी,

त्यांचे नगरसेवक जर आम्हाला भेटत असतील त्यांना सोडून जात असेल तर त्याचा जाब त्यांना विचारावा अशी टीका करत जितेंद्र आव्हाड यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली आहे.

आम्हाला हिंदुत्व शिकवू नका फक्त निवडणूक आले त्यावेळेस हिंदुत्वाचा विचार करतात

विरोधी पक्ष नेते श्रीमलंगगड यात्रेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत.

त्यामुळे हे हिंदुत्व आमचं आहे अशी प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते राजेंद्र विचारे यांनी दिल्यानंतर बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्के यांना विचारला असता,

त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नका फक्त निवडणूक आली की त्यावेळेसच फक्त तुम्ही हिंदुत्वाचा विचार करता त्यामुळे त्यांनी हा विचार करू नका

धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वारसा पुढे घेऊन जात आहेत. विरोधकांकडे काही गोष्टी उरल्या नाहीत त्यामुळे आता टीका करतात. म्हणून आम्ही त्याकडे लक्ष देत नाही अशा शब्दात त्यांनी ठाकरे गटावर पलटवार केला आहे.

खुदा न खास्ता अगर... तणावादरम्यान मेहबूबा मुफ्तींच्या डोळ्यात पाणी अन्
खुदा न खास्ता अगर... तणावादरम्यान मेहबूबा मुफ्तींच्या डोळ्यात पाणी अन्.
संरक्षण मंत्र्यांची तिन्ही सैन्यांसोबत बैठक,भारताची पुढची रणनिती ठरणार
संरक्षण मंत्र्यांची तिन्ही सैन्यांसोबत बैठक,भारताची पुढची रणनिती ठरणार.
IPL 2025 : आयपीएलचे उर्वरित सामने रद्द होणार? BCCI लवकरच घेणार निर्णय
IPL 2025 : आयपीएलचे उर्वरित सामने रद्द होणार? BCCI लवकरच घेणार निर्णय.
पाकिस्ताननं जगाकडे मागितली भीक, युद्धासाठी कर्ज हवं? पण खरं काय?
पाकिस्ताननं जगाकडे मागितली भीक, युद्धासाठी कर्ज हवं? पण खरं काय?.
पाकला कडकी...भीक मागण्याची वेळ तरी युद्धाची खुमखुमी, जगापुढे पसरले हात
पाकला कडकी...भीक मागण्याची वेळ तरी युद्धाची खुमखुमी, जगापुढे पसरले हात.
पाकिस्तानची मोठी कबुली...ती आमची चूक, US च्या इशाऱ्यावरून घाणरडं कृत्य
पाकिस्तानची मोठी कबुली...ती आमची चूक, US च्या इशाऱ्यावरून घाणरडं कृत्य.
जल, थल, आकाश! भारताकडून पाकिस्तानवर जोरदार हल्ला सुरूच
जल, थल, आकाश! भारताकडून पाकिस्तानवर जोरदार हल्ला सुरूच.
पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलं! भारतानंतर बलुच आर्मीचा पाकवर हल्ला
पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलं! भारतानंतर बलुच आर्मीचा पाकवर हल्ला.
चोराच्या उलटा बोंबा, पाकचा माज उतरेना, म्हणताय एकही अतिरेकी अड्डा नाही
चोराच्या उलटा बोंबा, पाकचा माज उतरेना, म्हणताय एकही अतिरेकी अड्डा नाही.
पाकिस्तानचा अटारी सीमेवर हल्ल्याचा प्रयत्न फसला
पाकिस्तानचा अटारी सीमेवर हल्ल्याचा प्रयत्न फसला.