AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bombay High Court : सैनिकांसाठी स्वहितापेक्षा राष्ट्रहित मोठे; सेवा कार्यकाळ वाढून देण्याची लेफ्टनंट कर्नलची मागणी न्यायालयाने फेटाळली

आपल्या दिव्यांग मुलाच्या उपचारासाठी मुंबईमधील (MUMBAI) सेवा कार्यकाळ वाढून द्यावा, अशी मागणी करणारी एक याचिका एका लेफ्टनंट कर्नलने मुंबई उच्च न्यायालयात (High Court) दाखल केली होती. मात्र न्यायालयाने (Court) ही याचिका फेटाळून लावली आहे.

Bombay High Court : सैनिकांसाठी स्वहितापेक्षा राष्ट्रहित मोठे; सेवा कार्यकाळ वाढून देण्याची लेफ्टनंट कर्नलची मागणी न्यायालयाने फेटाळली
मुंबई उच्च न्यायालयImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jul 19, 2022 | 8:54 AM

मुंबई : आपल्या दिव्यांग मुलाच्या उपचारासाठी मुंबईमधील (MUMBAI) सेवा कार्यकाळ वाढून द्यावा, अशी मागणी करणारी एक याचिका एका लेफ्टनंट कर्नलने मुंबई उच्च न्यायालयात (High Court) दाखल केली होती. मात्र न्यायालयाने (Court) ही याचिका फेटाळून लावली आहे. ही याचिका फेटाळून लावताना सैनिकांसाठी राष्ट्रहित हे स्वहितापेक्षा मोठे असल्याने असं करता येणार नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. याचिकाकर्त्या लेफ्टनंट कर्नल यांचा मोठा मुलगा हा दिव्यांग आहे. त्याच्यावर मुंबईमध्ये उपचार सुरू आहेत. माझा मुलगा हा शंभर टक्के दिव्यांग असून, त्याच्यावर केवळ मुंबईमध्येच उपचार होऊ शकतात, त्यामुळे माझा मुंबईमधील सेवा कार्यकाळ वाढून द्यावा अशी मागणी करणारी याचिका त्यांनी हायकोर्टात दाखल केली होती. मात्र ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. एका सैनिकासाठी राष्ट्रहित हे स्वहितापेक्षा मोठे असते असं न्यायालयाने म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

याचिकाकर्ते लेफ्टनंट कर्नल यांचा मोठा मुलगा हा शंभर टक्के दिव्यांग आहे. त्याच्या उपचारासाठी आपल्याला मुंबईमधील कार्यकाळ वाढून देण्यात यावा अशी मागणी त्यांनी लष्कराला केली होती. मात्र लष्करी सचिव शाखेच्या तोफखाना विभागाने त्यांची ही मागणी अमान्य केली. त्यानंतर त्यांनी याविरोधात हायकोर्टात धाव घेतली. मात्र हायकोर्टाने देखील त्यांची ही याचिका फेटाळून लावली आहे. लेफ्टनंट कर्नल यांच्यावतीने अॅड क्रांती एल.सी. व कौस्तुभ गिध यांनी युक्तीवाद केला. खंडपीठाने दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकल्यानंतर ही याचिका फेटाळून लावली.

हे सुद्धा वाचा

न्यायालयाने काय म्हटले

खंडपीठाने आदेश देतान असे नमदू केले की, भारताचे सैनिक जिवाची कोणतीही पर्वा न करता देश सेवा करतात याचा आम्हा देशवासीयांना अभिमान आहे. सैनिकांसाठी स्वहितापेक्षा राष्ट्रहीत महत्त्वाचे असते.एका सैनिकासाठी देशाचे संरक्षण करणे हेच प्रथम कर्तव्य असते. त्यामुळे याचिकाकर्त्याने राष्ट्रहिताचा विचार करावा असे म्हणत न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.

बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी पाकिस्तान हादरलं! पाकच्या नौदल तळाजवळ बॉम्ब
बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी पाकिस्तान हादरलं! पाकच्या नौदल तळाजवळ बॉम्ब.
ऑपरेशन सिंदूर अजून... मोदी सरकारचं मोठं वक्तव्य, आता पुढची पाऊलं काय?
ऑपरेशन सिंदूर अजून... मोदी सरकारचं मोठं वक्तव्य, आता पुढची पाऊलं काय?.
पाकिस्तानात स्फोटांची मालिका; 10 शहरांमध्ये 12 बॉम्बस्फोट
पाकिस्तानात स्फोटांची मालिका; 10 शहरांमध्ये 12 बॉम्बस्फोट.
मुरिदकेच्या हल्ल्याचा आवाज... परदेशी पत्रकाराचा दावा, सांगितलं वास्तव
मुरिदकेच्या हल्ल्याचा आवाज... परदेशी पत्रकाराचा दावा, सांगितलं वास्तव.
त्यांचा सल्ला ऐकायला हवा होता; अमित ठाकरेंनी व्यक्त केली खंत
त्यांचा सल्ला ऐकायला हवा होता; अमित ठाकरेंनी व्यक्त केली खंत.
जिथं कसाबला दिलं होतं प्रशिक्षण, तो ट्रेनिंग कॅम्प भारताकडून उद्ध्वस्त
जिथं कसाबला दिलं होतं प्रशिक्षण, तो ट्रेनिंग कॅम्प भारताकडून उद्ध्वस्त.
बिथरलेलं पाकडे गप्प बसेना, भारतीयांना केलं टार्गेट, कुठं सापडली मिसाईल
बिथरलेलं पाकडे गप्प बसेना, भारतीयांना केलं टार्गेट, कुठं सापडली मिसाईल.
पाकला दणका अन् चीनची तंतरली, आधी पाकला मदत आता म्हणताय, जरा संयमानं...
पाकला दणका अन् चीनची तंतरली, आधी पाकला मदत आता म्हणताय, जरा संयमानं....
हम अल्लाह के, कसम खाते है की... अल कायदाकडून भारताला टोकाची धमकी
हम अल्लाह के, कसम खाते है की... अल कायदाकडून भारताला टोकाची धमकी.
Rain Update आजही मुंबईकरांची तारांबळ उडणार? हवामान खात्याचा अंदाज काय?
Rain Update आजही मुंबईकरांची तारांबळ उडणार? हवामान खात्याचा अंदाज काय?.