जयंत पाटील यांचा टेंडरबाबत खळबळजनक दावा, सरकारवर गंभीर आरोप, Tv9 च्या कॉन्क्लेव्हमध्ये पाहा काय म्हणाले?

"लोकसभेआधी सरकारने सहा प्रकल्प काढले. त्यात टेंडर काढले. ११ हजार कोटीचं काम १५ हजार कोटीला दिले. ठरावीक लोकांनाच टेंडर दिलं जातं. सात-आठ लोकांनाच टेंडर मिळेल, असा क्रायटेरिया ठरवला जातो. तेच पैसे निवडणुकीत वापरले जात आहेत", असा धक्कादायक दावा जयंत पाटील यांनी केला.

जयंत पाटील यांचा टेंडरबाबत खळबळजनक दावा, सरकारवर गंभीर आरोप, Tv9 च्या कॉन्क्लेव्हमध्ये पाहा काय म्हणाले?
जयंत पाटील
Follow us
| Updated on: Sep 06, 2024 | 2:27 PM

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ‘टीव्ही 9 मराठी’च्या कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी होत विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत जयंत पाटील यांनी खळबळजनक दावा केला. “लोकसभेआधी सरकारने सहा प्रकल्प काढले. त्यात टेंडर काढले. ११ हजार कोटीचं काम १५ हजार कोटीला दिले. ठरावीक लोकांनाच टेंडर दिलं जातं. सात-आठ लोकांनाच टेंडर मिळेल, असा क्रायटेरिया ठरवला जातो. तेच पैसे निवडणुकीत वापरले जात आहेत. पैशाने मते विकत घेतली जातात ही त्यांची मानसिकता आहे. लोकसभेत प्रचंड पैसा वापरला. कुठून आले हे पैसे?”, असा सवाल जयंत पाटील यांनी केला. तसेच “या सरकारची निर्मितीच ही भ्रष्ट मार्गाने झाली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्माते शरद पवार यांचा पक्ष यांनी फोडला”, असा घणाघात जयंत पाटील यांनी या मुलाखतीत केला.

“सिडकोची अवस्था बरी आहे. एमएमआरडी सरप्लसमध्ये होती. ती कर्जात आहे. म्हाडाही कर्जात आहे. माझ्यावेळी आपण एमएमआरडीए आणि म्हाडाकडून पैसे घ्यायचो. आता या संस्था विक झाल्या आहेत. सरकार आर्थिकदृष्ट्या मोठे प्रकल्प करूच शकत नाही. हे सरकार फक्त घोषणा करत आहेत. बेरोजगारी मोठा प्रश्न आहे. तरुण मुलं यांचं ऐकायला तयार नाही. महागाई वाढली आहे. सामान्य लोकांना यांचा विश्वास नाही. या सर्व अनुषंगाने सव्वा लाख कोटीच्या प्रकल्पाची घोषणा केली आहे”, असं जयंत पाटील म्हणाले.

लाडकी बहीण योजनेची धडकी भरली?

विरोधकांना लाडकी बहीण योजनेची धडकी भरली, असा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय. याबाबत जयंत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. “लाडकी बहीण योजनेची धडकी भरली नाही. अर्थसंकल्पात ही योजना नाही. शेजारून कागद आला आणि ही योजना आली. विचार न करता ही योजना आणली आहे. आमचं सरकार आलं तर त्यापेक्षा चांगली योजना करू. महिलांच्या केसाला धक्का लागणार नाही, महाराष्ट्रातील महिलांकडे पाहण्याचं धाडस कुणाचं होणार नाही अशी व्यवस्था आम्ही असं करू”, असं जयंत पाटील म्हणाले.

“आज जे पैसे दिले जात आहेत, त्यातही आम्ही सुधारणा करू. या योजनेमुळे सर्व योजना बंद झाल्या आहेत. सर्व योजनांचे पैसे डायव्हर्ट होत आहे. पोलिसांचे पगार बंद होतील, डीले होतील. राज्याची अवस्था प्रचंड घोटाळ्याची होणार आहे. आर्थिक अवस्था अडचणीची होणार आहे. ८ लाख कोटी पेक्षा जास्त कर्ज आहे”, असा दावा जयंत पाटील यांनी केला.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.