‘2 हजार रुपयांच्या दंडासाठी आम्हाला दोन दिवस वाढवून द्या’, ठाकरे आणि राऊतांची कोर्टाकडे मागणी

विशेष कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडली. राहुल शेवाळे मानहानी प्रकरणात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना कोर्टाकडून प्रत्येकी 2 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या दंडाची रक्कम भरण्यासाठी तारीख संपली असल्याने दोन्ही नेत्यांनी कोर्टाकडे दोन दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली. यावरुन कोर्टात चांगलंच घमासान झालं.

'2 हजार रुपयांच्या दंडासाठी आम्हाला दोन दिवस वाढवून द्या', ठाकरे आणि राऊतांची कोर्टाकडे मागणी
संजय राऊत आणि उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Jul 23, 2024 | 8:34 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना प्रत्येकी 2 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हे पैसे जमा करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडून विशेष कोर्टात दोन दिवसांचा कालावधी वाढवण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. ही मागणी विशेष कोर्टाने मान्य केली आहे. पण या मुद्द्यावरूनही कोर्टात दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद झाला. अखेर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्याने विशेष कोर्टाने दंड भरण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी वाढवून दिला.

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी युक्तिवाद केला की, आम्हाला 14 जूनला याबाबतचा आदेश प्राप्त झाला. पण त्याचवेळी कोर्टाचं कॅश काउंटर हे पुढच्या दोन दिवसांसाठी बंद होतं. आम्ही आपल्या बाजूने दंड भरण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. पण दंडाची रक्कम भरली गेली नाही. यानंतर दंडाची रक्कम भरण्याचा कालावधी संपल्यानंतर 10 दिवसांनी कॅश काउंटवर असलेल्या अधिकाऱ्यांनी पैसे घेण्यास विरोध केला. त्यामुळे दंडाची रक्कम भरण्यासाठी कमीतकमी दोन दिवसांची मुदत द्यावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली.

ठाकरे गटाच्या वकिलांच्या युक्तिवादाला राहुल शेवाळे यांच्या वकील चित्रा साळुंखे यांनी विरोध केला. ठाकरे गटाच्या उदासीन मानसिकतेमुळेच दंडाची रक्कम भरली गेली नाही. ठाकरे आणि राऊतांची मुद्दाम उशिर करण्याची रणनीती आखली आहे, असा युक्तिवाद शेवाळेंच्या वकिलांनी केला. कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना दंडात्मक रक्कम दोन दिवसांत भरण्यासाठी परवानगी दिली. दोन्ही नेत्यांनी दंडात्मक रक्कम भरण्यास का उशिर झाला याबाबत केलेलं स्पष्टीकरण पाहता त्यांनी जाणूनबुजून विलंब केलेला नसल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे त्यांचा विलंब माफीचा आर्ज मान्य करण्यात येत असल्याचं न्यायालयाने म्हटलं.

नेमकं प्रकरण काय?

शिवसेनेचं मुखपत्र मानलं जाणाऱ्या सामना वृत्तपत्रात आपल्या बदनामीचा मजकूर छापण्यात आल्याचा आरोप करत राहुल शेवाळे यांनी कोर्टात धाव घेतली आहे. राहुल शेवाळे यांनी कोर्टात मानहानीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणाची सुनावणी माझगाव मॅजिस्ट्रेट कोर्टात सुरु आहे. कोर्टाने या प्रकरणात ठाकरे आणि राऊतांची मुक्तता करण्यास स्पष्ट नकार दिला होता. तसेच त्यांना कोर्टात सुनावणीसाठी हजर राहण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आला होता. याबाबतचा आदेश 26 ऑक्टोबर 2023 ला देण्यात आला होता.

खंरतर नियमानुसार दोन्ही नेत्यांनी मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या आदेशाला तातडीने वरिष्ठ कोर्टात आव्हान देणं अपेक्षित होतं. त्यासाठी आदेशानंतर 84 दिवसांचा कालावधी असतो. पण ठाकरे आणि राऊतांना तेच करण्यात उशिर झाला. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी याप्रकरणी विशेष कोर्टात धाव घेतली. यावेळी विशेष कोर्टाने मॅजिस्ट्रेट कोर्टाचा निर्णय रद्द करण्यासाठी जी याचिका दाखल केली तिला उशिर झाल्याचा मुद्दा नमूद करत 2 हजार रुपयांचा दंड सुनावला होता. याबाबत दंडाचा आदेश 13 जूनला देण्यात आला होता. पण तरीही ठाकरे आणि राऊतांकडून दंडात्मक पैसे भरण्यात आले नाहीत. आता त्यांना कोर्टाच्या आदेशानुसार पुढच्या दोन दिवसात पैसे भरणं अनिवार्य आहे. दरम्यान, या प्रकरणात आता पुढील सुनावणी 31 जुलैला होईल.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.