विधानसभा निवडणूक निकालावर राज ठाकरे प्रथमच बोलले, ‘मनसेचे मतदान…’
Raj Thackeray Speech In MNS Melava: मनसेचे आमच्या राजू पाटील यांना त्यांच्या गावात एकही मत मिळाले नाही. त्यांच्या गावात त्यांना 1400 मते मिळत होती. परंतु आता राजू पाटील यांना एकही मत गावात मिळत होती. या निकालावर निवडून आलेल्या लोकांचाही विश्वास बसत नाही.

Raj Thackeray Speech In MNS Melava: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी पदाधिकारी मेळावा घेतला. या मेळाव्यातून त्यांनी प्रथमच विधानसभा निवडणुकीवर भाष्य केले. आतापर्यंत महाविकास आघाडीतील सर्व पक्ष निवडणूक निकालावर संशय व्यक्त करत होते. परंतु राज ठाकरे यांनी या निकालावर काहीच भाष्य केले नव्हते. त्यांचे सर्व उमेदवार पराभूत झाल्यावरही त्यांच्याकडून प्रतिक्रिया आली नव्हती. राज ठाकरे यांनी हे मौन अखेर मनसे मेळाव्यात सोडले. यावेळी त्यांनी निवडणूक निकालावर संशय व्यक्त करत महाविकास आघाडीच्या सुरात सूर मिसळला.
काय म्हणाले राज ठाकरे
मनसेचा राज्यस्तरीय मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. राज ठाकरे म्हणाले, निवडणूक निकाल लागल्यावर महाराष्ट्रात सन्नाटा पसरला. जल्लोष झाला नाही. लोकांमध्ये संभ्रम होता असा निर्णय कसा आला. माझ्याकडे एक राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी संबंधित व्यक्ती आला. तो म्हणाला, “इतना सन्नाटा क्यों है भाई…कोई तो जीता होगा.” याचा अर्थ संघातील लोकांचाही निकालावर विश्वास नाही. खरं पहिले तर काही गोष्टींवर विश्वास बसू शकत नाही.
मनसेचे आमच्या राजू पाटील यांना त्यांच्या गावात एकही मत मिळाले नाही. त्यांच्या गावात त्यांना 1400 मते मिळत होती. परंतु आता राजू पाटील यांना एकही मत गावात मिळत होती. या निकालावर निवडून आलेल्या लोकांचाही विश्वास बसत नाही. सात वेळा निवडून आलेले बाळासाहेब थोरात यांचा या निवडणुकीत पराभव होतो. अख्खा महाराष्ट्र्यास या निकालावर शॉक बसला आहे. अजित पवार यांच्या चार-पाच जागा येतील, असे वाटत असताना त्यांना ४२ जागा मिळाल्या अन् जे अनेक वर्ष महाराष्ट्रात राजकारण करत आले त्या शरद पवार यांना दहा जागा मिळतात. लोकांनी आपणास मतदान केले आहे, परंतु ते आपल्यापर्यंत आले नाही. ते मतदान कुठेतरी गायब झाले. अशा निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुका न लढवलेल्या बऱ्या.




राज ठाकरे यांनी भाजपने भूमिका कशी बदलत गेली त्याची अनेक उदाहरणे आपल्या भाषणात दिली. ते म्हणाले, या सर्वांनी आपल्या स्वार्थासाठी भूमिका बदलल्या. मी कोणत्या भूमिका बदलल्या? आता जर तुम्ही मंत्रिमंडळातील लोक बघितली तर बहुतेक शिवसेना आणि काँग्रेसचे आहेत. त्यांचे सरकार आहे. त्यांना विचारणार नाही. पण तुम्हाला सांगितले जाते राज ठाकरे यांनी भूमिका बदलली.