Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानसभा निवडणूक निकालावर राज ठाकरे प्रथमच बोलले, ‘मनसेचे मतदान…’

Raj Thackeray Speech In MNS Melava: मनसेचे आमच्या राजू पाटील यांना त्यांच्या गावात एकही मत मिळाले नाही. त्यांच्या गावात त्यांना 1400 मते मिळत होती. परंतु आता राजू पाटील यांना एकही मत गावात मिळत होती. या निकालावर निवडून आलेल्या लोकांचाही विश्वास बसत नाही.

विधानसभा निवडणूक निकालावर राज ठाकरे प्रथमच बोलले, 'मनसेचे मतदान...'
राज ठाकरे
Follow us
| Updated on: Jan 30, 2025 | 1:12 PM

Raj Thackeray Speech In MNS Melava: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी पदाधिकारी मेळावा घेतला. या मेळाव्यातून त्यांनी प्रथमच विधानसभा निवडणुकीवर भाष्य केले. आतापर्यंत महाविकास आघाडीतील सर्व पक्ष निवडणूक निकालावर संशय व्यक्त करत होते. परंतु राज ठाकरे यांनी या निकालावर काहीच भाष्य केले नव्हते. त्यांचे सर्व उमेदवार पराभूत झाल्यावरही त्यांच्याकडून प्रतिक्रिया आली नव्हती. राज ठाकरे यांनी हे मौन अखेर मनसे मेळाव्यात सोडले. यावेळी त्यांनी निवडणूक निकालावर संशय व्यक्त करत महाविकास आघाडीच्या सुरात सूर मिसळला.

काय म्हणाले राज ठाकरे

मनसेचा राज्यस्तरीय मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. राज ठाकरे म्हणाले, निवडणूक निकाल लागल्यावर महाराष्ट्रात सन्नाटा पसरला. जल्लोष झाला नाही. लोकांमध्ये संभ्रम होता असा निर्णय कसा आला. माझ्याकडे एक राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी संबंधित व्यक्ती आला. तो म्हणाला, “इतना सन्नाटा क्यों है भाई…कोई तो जीता होगा.” याचा अर्थ संघातील लोकांचाही निकालावर विश्वास नाही. खरं पहिले तर काही गोष्टींवर विश्वास बसू शकत नाही.

मनसेचे आमच्या राजू पाटील यांना त्यांच्या गावात एकही मत मिळाले नाही. त्यांच्या गावात त्यांना 1400 मते मिळत होती. परंतु आता राजू पाटील यांना एकही मत गावात मिळत होती. या निकालावर निवडून आलेल्या लोकांचाही विश्वास बसत नाही. सात वेळा निवडून आलेले बाळासाहेब थोरात यांचा या निवडणुकीत पराभव होतो. अख्खा महाराष्ट्र्यास या निकालावर शॉक बसला आहे. अजित पवार यांच्या चार-पाच जागा येतील, असे वाटत असताना त्यांना ४२ जागा मिळाल्या अन् जे अनेक वर्ष महाराष्ट्रात राजकारण करत आले त्या शरद पवार यांना दहा जागा मिळतात. लोकांनी आपणास मतदान केले आहे, परंतु ते आपल्यापर्यंत आले नाही. ते मतदान कुठेतरी गायब झाले. अशा निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुका न लढवलेल्या बऱ्या.

हे सुद्धा वाचा

राज ठाकरे यांनी भाजपने भूमिका कशी बदलत गेली त्याची अनेक उदाहरणे आपल्या भाषणात दिली. ते म्हणाले, या सर्वांनी आपल्या स्वार्थासाठी भूमिका बदलल्या. मी कोणत्या भूमिका बदलल्या? आता जर तुम्ही मंत्रिमंडळातील लोक बघितली तर बहुतेक शिवसेना आणि काँग्रेसचे आहेत. त्यांचे सरकार आहे. त्यांना विचारणार नाही. पण तुम्हाला सांगितले जाते राज ठाकरे यांनी भूमिका बदलली.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे UNCUT भाषण
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे UNCUT भाषण.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मराठी भाषेचे कौतुक, म्हणाले "मी बोलण्याचा
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मराठी भाषेचे कौतुक, म्हणाले
'ऑपरेशन टायगर'चा सपाटा, शिंदेंच्या शिलेदाराकडून ठाकरे गटाला मोठ खिंडार
'ऑपरेशन टायगर'चा सपाटा, शिंदेंच्या शिलेदाराकडून ठाकरे गटाला मोठ खिंडार.
'मेरी कुर्सी छिनी गई', मुनगंटीवार म्हणाले, 'पंतप्रधानांची खुर्ची मी..'
'मेरी कुर्सी छिनी गई', मुनगंटीवार म्हणाले, 'पंतप्रधानांची खुर्ची मी..'.
दहावीचा पेपर फुटला, परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवण्यासाठी धक्काबुक्की
दहावीचा पेपर फुटला, परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवण्यासाठी धक्काबुक्की.
अण्णा हजारे मैदानात, महायुतीतील दोन मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
अण्णा हजारे मैदानात, महायुतीतील दोन मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी.
कॉपीमुक्त अभियानाचा पहिल्याच दिवशी फज्जा, दहावीचा पहिलाच पेपर फुटला
कॉपीमुक्त अभियानाचा पहिल्याच दिवशी फज्जा, दहावीचा पहिलाच पेपर फुटला.
'मला हलक्यात घेऊ नका, जनता त्यांना..', एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार
'मला हलक्यात घेऊ नका, जनता त्यांना..', एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार.
धंगेकरांना धक्का, नव्या टीममधून डावललं; एकनाथ शिंदेंची भेट घेणं भोवलं?
धंगेकरांना धक्का, नव्या टीममधून डावललं; एकनाथ शिंदेंची भेट घेणं भोवलं?.
जरांगे देशमुख कुटुंबाच्या भेटीला, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना थेट फोन
जरांगे देशमुख कुटुंबाच्या भेटीला, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना थेट फोन.